शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३१ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
5
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
8
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
9
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
10
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
11
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
12
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
13
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
14
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
15
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
16
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
17
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
18
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
19
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
20
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'

पालिकेच्या अर्थसंकल्पातून जनतेची दिशाभूल

By admin | Updated: March 5, 2016 02:13 IST

महापालिकेचा अर्थसंकल्प वास्तवादी नसून दिशाभूल करणारा आहे. नगररचना विभागाचे उत्पन्न गृहीत धरलेले नाही. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) मध्ये प्रचंड घोटाळा असल्याचा

नवी मुंबई : महापालिकेचा अर्थसंकल्प वास्तवादी नसून दिशाभूल करणारा आहे. नगररचना विभागाचे उत्पन्न गृहीत धरलेले नाही. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) मध्ये प्रचंड घोटाळा असल्याचा आरोप शिवसेना नगरसेवकांनी केला असून, काँगे्रसनेही उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याची टीका केली आहे. अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी आयोजित विशेष सर्वसाधारण सभेमध्ये पहिल्या दिवशी शिवसेना, भाजपासह काँगे्रस नगरसेवकांनी पालिकेच्या कारभारावर टीका केली. शिवसेनेच्या किशोर पाटकर यांनी नगररचना विभागाला मिळणाऱ्या उत्पन्नाविषयी योग्य तपशील दिला नसल्याचे निदर्शनास आणून दिले. याशिवाय कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) अंतर्गत मनपा क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांनी शहराच्या विकासासाठी हातभार लावणे आवश्यक आहे. परंतू या निधीचा वापर होत नसून यामध्ये मोठा घोटाळा आहे. या घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी किशोर पाटकर यांनी केली. काँगे्रसच्या मंदाकिनी म्हात्रे यांनीही अर्थसंकल्पातील आकडे खोटे असल्याचे निदर्शनास आणून दिले. शहरात सद्य:स्थितीमध्ये १,२०० कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. अत्यावश्यक सेवांवर जवळपास ७०० कोटी रुपये खर्च होणार आहेत. यानंतर पुढील वर्षी नवीन कामे करण्यासाठी निधी कोठून मिळणार, असा प्रश्न उपस्थित केला आहे. उपकर, सेस, एलबीटी, पाणीपुरवठा व इतर विभागांमधील त्रुटींवरही बोट ठेवले. बहादूर बिष्ट यांनी झोपडपट्टीमधील रहिवाशांसाठी काहीच सुविधा नसल्याचे मत व्यक्त केले. प्रभाग ८ मधील एकही कामाचा समावेश नसल्याचे निदर्शनास आणून दिले. करण मढवी, चेतन नाईक, रामचंद्र घरत, अशोक गुरखे यांनीही पालिकेच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्यासाठी उपाययोजना सुचविल्या. अर्थसंकल्पातील त्रुटीही निदर्शनास आणून दिल्या. ऐरोलीतील नगरसेवक संजू वाडे यांनी पालिकेतील कंत्राटी कामगारांच्या समस्यांकडे लक्ष वेधले. शहरातील आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. पालिकेच्या उपकर विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या मुलाचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. नवीन रुग्णालयांची बांधकामे पूर्ण होऊनही ती सुरू केली जात नाहीत. वाशी रुग्णालयामध्ये नर्सेसची संख्या कमी आहे. आवश्यक कर्मचारी भरले जात नाहीत. २४ तास पाणी देण्याच्या घोषणा केल्या जातात, परंतु प्रत्यक्षात तीन ते चार दिवस पाणी मिळत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीसाठी अर्थसंकल्पात ठोस तरतूद नसल्याची खंत व्यक्त केली. पालिकेने यासाठी किमान ५० लाख रुपयांची तरतूद करण्याची मागणी त्यांनी केली. डास मारायलाही कर लावाशिवसेना नगरसेवक रामदास पवळे यांनी डासांच्या उपद्रवाकडे लक्ष वेधले. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. डेंगू, मलेरियाची साथ पसरत आहे. पालिकेला पैसे कमी पडत असतील तर डासांचा बंदोबस्त करण्यासाठी स्वतंत्र कर लावा; परंतु नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करा, असा टोला मारला.अर्थसंकल्प वास्तवादी नाही. नगररचना विभागाच्या उत्पन्नाकडे दुर्लक्ष केले आहे. सीएसआरमध्ये मोठा घोटाळा झाला आहे. या घोटाळ्याची चौकशी होणे आवश्यक आहे. - किशोर पाटकर, नगरसेवक, शिवसेनाअर्थसंकल्प फसवणूक करणारा आहे. शहरात सद्य:स्थितीमध्ये १,२०० कोटीची कामे सुरू आहेत. याशिवाय पुढील वर्षभरात ७०० कोटी अत्यावश्यक सेवांवर खर्च करावे लागणार आहेत. १,९०० कोटी यासाठीच गेल्यानंतर नवीन कामांसाठी निधी कोठून उपलब्ध होणार. - मंदाकिनी म्हात्रे, नगरसेविका, राष्ट्रवादी