शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
4
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
5
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
6
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
7
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!
8
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
9
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
10
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
11
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
12
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
13
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
14
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
15
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
16
Gold Rate Today 15 May: एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
17
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
18
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
19
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
20
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं

‘त्या’ दहा गावांतील शाळांचे स्थलांतरण, पुढील शैक्षणिक वर्षात सिडकोकडे ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 03:39 IST

आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या दहा गावांच्या स्थलांतरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळाही स्थलांतरित केल्या जाणार आहेत. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या या गावांतील जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करून पुढील शैक्षणिक वर्षात त्या सिडकोच्या ताब्यात देण्याचे निर्देश राज्य शासनाच्या ग्राम विकास आणि जलसंधारण विभागाने दिले आहेत.

नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या दहा गावांच्या स्थलांतरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळाही स्थलांतरित केल्या जाणार आहेत. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या या गावांतील जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करून पुढील शैक्षणिक वर्षात त्या सिडकोच्या ताब्यात देण्याचे निर्देश राज्य शासनाच्या ग्राम विकास आणि जलसंधारण विभागाने दिले आहेत.स्थलांतरित होणाºया दहा गावांचे पुनर्वसन आणि पुन:स्थापना योजनेअंतर्गत पुनर्वसन केले जात आहे. यापैकी पाच गावे वडघर येथे तर उर्वरित पाच गावांचे वहाळ गाव परिसरात स्थलांतरित करण्यात येत आहेत. ही गावे स्थलांतरित होणार असल्याने येथील शैक्षणिक सुविधाही स्थलांतरित केल्या जाणार आहेत. त्यानुसार सिडकोने शाळांसाठी ९ भूखंड आरक्षित ठेवले आहेत. पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या विचारात घेवून वडघर आणि वहाळ येथे प्रत्येकी ३000 चौरस मीटर क्षेत्रफळाचे दोन भूखंड आरक्षित ठेवून त्यावर शाळेची इमारतही बांधण्यात आली आहे.सध्या गावांच्या स्थलांतरणाची प्रक्रिया वेग घेत आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून या गावांतील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा बंद केल्या जाणार आहेत. तसेच सध्या तयार असलेल्या शाळांच्या इमारतीचा ताबा जिल्हा परिषदेकडून सिडकोकडे दिला जाणार आहे. या शाळेतील कर्मचारी आणि विद्यार्थी सुध्दा सिडकोकडे वर्ग केले जाणार असल्याचे ग्राम विकास व जलसंधारण विभागाच्या कार्यसन अधिकाºयांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Schoolशाळा