शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
4
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
5
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
6
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
7
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
8
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
9
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
10
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
11
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
12
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
13
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
14
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
15
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
16
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
17
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
18
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
19
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
20
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
Daily Top 2Weekly Top 5

स्थलांतरामुळे सात जिल्ह्यांवर वाढला ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 00:16 IST

स्थानिक यंत्रणेवर परिणाम : पोलिसांकडून दिले जाणारे परवाने थांबवले

सूर्यकांत वाघमारे।लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : लॉकडाउनमध्ये राज्यांतर्गत स्थलांतरासाठी मिळालेल्या संधीचा फायदा घेत अनेकांनी गावाकडे धाव घेतली आहे. याचा परिणाम अनेक जिल्ह्यांतील लोकसंख्येवर झाल्यामुळे तिथल्या स्थानिक यंत्रणेवर कोरोना नियंत्रणाचा ताण पडू लागला आहे. परिणामी नवी मुंबईसह मुंबईमधून सात जिल्ह्यांत जाण्यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या पोलिसांकडून थांबवण्यात आल्या आहेत.

राज्यात कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी लॉकडाउनचे आदेश निघताच जिल्ह्यांतर्गत प्रवासाला बंदी घालण्यात आली होती. परंतु महिनाभरापूर्वी पोलिसांच्या परवानगीने राज्यांतर्गत प्रवासाला अनुमती देण्यात आली. त्यानुसार नोकरी व्यवसायानिमित्ताने मुंबई, नवी मुंबईत स्थायिक असलेल्या मात्र लॉकडाउनमुळे अडचणीत सापडलेल्या कुटुंबीयांनी गावाकडे धाव घेण्यास सुरुवात केली.

शहरी भागातून गावाकडे धाव घेणाऱ्यांची संख्या वाढल्याने तिथल्या स्थानिक यंत्रणेवर ताण पडू लागला आहे. स्थलांतरितांना क्वारंटाइन करण्यासाठी जागेसह कोरोना चाचणीवर त्याचा परिणाम होत आहे. त्याशिवाय महामार्गांवरील रहदारीही वाढत आहे. त्यावर पर्याय म्हणून सात जिल्ह्यांनी नव्याने स्थलांतरितांना परवानगी न देण्याचे पोलिसांना कळवले आहे. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी तशा सूचना पोलिसांना दिल्या आहेत. त्यानुसार नवी मुंबई पोलिसांनीदेखील या जिल्ह्यातील गावांकडे जाण्यासाठी येणारे ई-पासचे अर्ज नाकारण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, भंडारा, नाशिक तसेच कोल्हापूरचा समावेश आहे. तर दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यासाठी परवानगी देण्यास सुरुवात झाली असून, दिवसाला केवळ ५० परवानग्या दिल्या जात आहेत. मंजूर अर्जांपैकी बहुतांश अर्जदार हे कुटुंबासह गावी गेले आहेत. त्यामुळे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातून तीन लाखाहून अधिकांनी गाव गाठलेले आहे. तर लॉकडाउन सुरू असताना अथवा त्यापूर्वीच कोरोनाच्या भीतीने गाव गाठलेल्यांची संख्या लाखाच्या घरात आहे. त्यामध्ये पुणे, सातारा, कोल्हापूर यासह कोकणातील काही जिल्ह्यांतील व्यक्तींचा समावेश आहे. शिवाय मुंबई, ठाणे व कल्याण-डोंबिवली येथून गावाकडे गेलेल्यांची संख्यादेखील मोठी आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने नागरिकांनी गाव गाठल्याने मागील दोन महिन्यांत संबंधित जिल्ह्यातील लोकसंख्येत भर पडली आहे. याचा परिणाम तिथल्या यंत्रणेवर होऊ लागल्याने नव्याने येणाºयांना जिल्ह्यात प्रवेशबंदी घातल्याचे दिसून येत आहे.

राज्यांतर्गत प्रवास अर्ज अधिकच्मंजूर अर्जामध्ये नवी मुंबई आयुक्तालयांतर्गत देण्यात आलेल्या सुमारे पाच हजारई-पासचा समावेश आहे. उर्वरित अर्जांमध्ये काही प्रमाणात राज्याबाहेरील तर सर्वाधिक राज्यांतर्गत प्रवासाच्या अर्जांचा समावेश आहे.राज्याच्या विविध भागांत जाण्यास लागणाºया पाससाठी नवी मुंबई पोलिसांकडे ३१ मेपर्यंत एकूण ५ लाख ३ हजार ८०७ अर्ज आले आहेत. त्यापैकी १ लाख ३६ हजार ८९९ अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. विविध कारणांनी ३ लाख ६३ हजार ६०२ अर्ज नाकारण्यात आले असून, १ हजार ३०६ अर्जांची प्रक्रिया प्रलंबित आहे.- प्रवीणकुमार पाटील, उपायुक्त, गुन्हे शाखा