शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

स्थलांतरामुळे सात जिल्ह्यांवर वाढला ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 00:16 IST

स्थानिक यंत्रणेवर परिणाम : पोलिसांकडून दिले जाणारे परवाने थांबवले

सूर्यकांत वाघमारे।लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : लॉकडाउनमध्ये राज्यांतर्गत स्थलांतरासाठी मिळालेल्या संधीचा फायदा घेत अनेकांनी गावाकडे धाव घेतली आहे. याचा परिणाम अनेक जिल्ह्यांतील लोकसंख्येवर झाल्यामुळे तिथल्या स्थानिक यंत्रणेवर कोरोना नियंत्रणाचा ताण पडू लागला आहे. परिणामी नवी मुंबईसह मुंबईमधून सात जिल्ह्यांत जाण्यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या पोलिसांकडून थांबवण्यात आल्या आहेत.

राज्यात कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी लॉकडाउनचे आदेश निघताच जिल्ह्यांतर्गत प्रवासाला बंदी घालण्यात आली होती. परंतु महिनाभरापूर्वी पोलिसांच्या परवानगीने राज्यांतर्गत प्रवासाला अनुमती देण्यात आली. त्यानुसार नोकरी व्यवसायानिमित्ताने मुंबई, नवी मुंबईत स्थायिक असलेल्या मात्र लॉकडाउनमुळे अडचणीत सापडलेल्या कुटुंबीयांनी गावाकडे धाव घेण्यास सुरुवात केली.

शहरी भागातून गावाकडे धाव घेणाऱ्यांची संख्या वाढल्याने तिथल्या स्थानिक यंत्रणेवर ताण पडू लागला आहे. स्थलांतरितांना क्वारंटाइन करण्यासाठी जागेसह कोरोना चाचणीवर त्याचा परिणाम होत आहे. त्याशिवाय महामार्गांवरील रहदारीही वाढत आहे. त्यावर पर्याय म्हणून सात जिल्ह्यांनी नव्याने स्थलांतरितांना परवानगी न देण्याचे पोलिसांना कळवले आहे. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी तशा सूचना पोलिसांना दिल्या आहेत. त्यानुसार नवी मुंबई पोलिसांनीदेखील या जिल्ह्यातील गावांकडे जाण्यासाठी येणारे ई-पासचे अर्ज नाकारण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, भंडारा, नाशिक तसेच कोल्हापूरचा समावेश आहे. तर दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यासाठी परवानगी देण्यास सुरुवात झाली असून, दिवसाला केवळ ५० परवानग्या दिल्या जात आहेत. मंजूर अर्जांपैकी बहुतांश अर्जदार हे कुटुंबासह गावी गेले आहेत. त्यामुळे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातून तीन लाखाहून अधिकांनी गाव गाठलेले आहे. तर लॉकडाउन सुरू असताना अथवा त्यापूर्वीच कोरोनाच्या भीतीने गाव गाठलेल्यांची संख्या लाखाच्या घरात आहे. त्यामध्ये पुणे, सातारा, कोल्हापूर यासह कोकणातील काही जिल्ह्यांतील व्यक्तींचा समावेश आहे. शिवाय मुंबई, ठाणे व कल्याण-डोंबिवली येथून गावाकडे गेलेल्यांची संख्यादेखील मोठी आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने नागरिकांनी गाव गाठल्याने मागील दोन महिन्यांत संबंधित जिल्ह्यातील लोकसंख्येत भर पडली आहे. याचा परिणाम तिथल्या यंत्रणेवर होऊ लागल्याने नव्याने येणाºयांना जिल्ह्यात प्रवेशबंदी घातल्याचे दिसून येत आहे.

राज्यांतर्गत प्रवास अर्ज अधिकच्मंजूर अर्जामध्ये नवी मुंबई आयुक्तालयांतर्गत देण्यात आलेल्या सुमारे पाच हजारई-पासचा समावेश आहे. उर्वरित अर्जांमध्ये काही प्रमाणात राज्याबाहेरील तर सर्वाधिक राज्यांतर्गत प्रवासाच्या अर्जांचा समावेश आहे.राज्याच्या विविध भागांत जाण्यास लागणाºया पाससाठी नवी मुंबई पोलिसांकडे ३१ मेपर्यंत एकूण ५ लाख ३ हजार ८०७ अर्ज आले आहेत. त्यापैकी १ लाख ३६ हजार ८९९ अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. विविध कारणांनी ३ लाख ६३ हजार ६०२ अर्ज नाकारण्यात आले असून, १ हजार ३०६ अर्जांची प्रक्रिया प्रलंबित आहे.- प्रवीणकुमार पाटील, उपायुक्त, गुन्हे शाखा