शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना अचानक पदावरून हटवले, कारण...
2
दिसायला देवकन्या, पण काम न शोभणारं; अनेक तरुणांना प्रेमाची मिठी देणारी काजल पकडली
3
लाल दहशतीचा अंत! छत्तीसगडमध्ये 210 माओवाद्यांचे आत्मसमर्पण; बस्तर नक्षलमुक्त...
4
Gujarat Cabinet Reshuffle: काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जून मोढवाडिया गुजरात सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री
5
Ajit Agarkar: शमी टीम इंडियामधून का बाहेर? रोहित- कोहली वर्ल्डकप खेळतील का? आगरकर म्हणाले.
6
विदर्भ हादरला! पतीसोबत पूजाचं बिनसलं, एक्स बॉयफ्रेंड शुभमसोबत पुन्हा प्रेमसंबंध अन् झाला भयंकर शेवट
7
IND vs AUS : कॅप्टन्सीवरून हटवण्यात आल्यावर रोहित शर्मा पहिल्यांदाच कोच गंभीर यांना भेटला अन्.... (VIDEO)
8
विराट कोहलीने क्रिकेटप्रेमीला पाकिस्तानी जर्सीवर दिली स्वाक्षरी, व्हिडीओ व्हायरल, अखेर समोर आली अशी माहिती
9
१८ कोटी घरातील माणसांच्या खात्यात वळवली; प्रशांत हिरेंसह कुटुंबीयांवर गुन्हा
10
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्त जिल्ह्यांना १३५६ कोटींची मदत; राज्य सरकारचा शासन निर्णय
11
VIDEO: महिला जीपमागे लपून काढत होती फोटो, अचानक मागून आला चित्ता अन् मग जे झालं...
12
Dhan Teras 2025: धनत्रयोदशीला 'या' शुभ मुहूर्तावर मंत्रांनी करा धन्वंतरीसह लक्ष्मी-कुबेराची विधिवत पूजा!
13
125cc Bikes: होंडा शाईन vs बजाज पल्सर; किंमत आणि फीचर्सबाबतीत कोणती चांगली?
14
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानला मोठा धक्का, रशियन राजदूताने लाईव्ह अपमान केला
15
३ वर्षांत ३९% पर्यंत परतावा! 'या' म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांना केले मालामाल; कोणते आहेत फंड?
16
“PM मोदी अन् नितीश कुमारांची जादू, बिहारमध्ये NDAचाच विजय होणार”; CM फडणवीसांना विश्वास
17
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, Facebook, Whatsapp Status च्या माध्यमातून देऊन आनंदात साजरा करा दीपावलीचा सण!
18
“गणेश नाईक कसलेले पैलवान, अंतिम तेच विजयी होतील, शिंदे हे...”; संजय राऊतांचा मोठा दावा
19
AUS vs IND ODI Series Launch Event: 'जानी दुश्मन'सोबत गप्पा मारल्या; मग ते फोटो काढायला गेले, पण... (VIDEO)
20
Dhan Teras 2025: धनत्रयोदशीला का आणि कसे करावे यमदीपदान? अकाली मृत्यू खरंच टळतो का?

स्थलांतरामुळे सात जिल्ह्यांवर वाढला ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 00:16 IST

स्थानिक यंत्रणेवर परिणाम : पोलिसांकडून दिले जाणारे परवाने थांबवले

सूर्यकांत वाघमारे।लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : लॉकडाउनमध्ये राज्यांतर्गत स्थलांतरासाठी मिळालेल्या संधीचा फायदा घेत अनेकांनी गावाकडे धाव घेतली आहे. याचा परिणाम अनेक जिल्ह्यांतील लोकसंख्येवर झाल्यामुळे तिथल्या स्थानिक यंत्रणेवर कोरोना नियंत्रणाचा ताण पडू लागला आहे. परिणामी नवी मुंबईसह मुंबईमधून सात जिल्ह्यांत जाण्यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या पोलिसांकडून थांबवण्यात आल्या आहेत.

राज्यात कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी लॉकडाउनचे आदेश निघताच जिल्ह्यांतर्गत प्रवासाला बंदी घालण्यात आली होती. परंतु महिनाभरापूर्वी पोलिसांच्या परवानगीने राज्यांतर्गत प्रवासाला अनुमती देण्यात आली. त्यानुसार नोकरी व्यवसायानिमित्ताने मुंबई, नवी मुंबईत स्थायिक असलेल्या मात्र लॉकडाउनमुळे अडचणीत सापडलेल्या कुटुंबीयांनी गावाकडे धाव घेण्यास सुरुवात केली.

शहरी भागातून गावाकडे धाव घेणाऱ्यांची संख्या वाढल्याने तिथल्या स्थानिक यंत्रणेवर ताण पडू लागला आहे. स्थलांतरितांना क्वारंटाइन करण्यासाठी जागेसह कोरोना चाचणीवर त्याचा परिणाम होत आहे. त्याशिवाय महामार्गांवरील रहदारीही वाढत आहे. त्यावर पर्याय म्हणून सात जिल्ह्यांनी नव्याने स्थलांतरितांना परवानगी न देण्याचे पोलिसांना कळवले आहे. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी तशा सूचना पोलिसांना दिल्या आहेत. त्यानुसार नवी मुंबई पोलिसांनीदेखील या जिल्ह्यातील गावांकडे जाण्यासाठी येणारे ई-पासचे अर्ज नाकारण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, भंडारा, नाशिक तसेच कोल्हापूरचा समावेश आहे. तर दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यासाठी परवानगी देण्यास सुरुवात झाली असून, दिवसाला केवळ ५० परवानग्या दिल्या जात आहेत. मंजूर अर्जांपैकी बहुतांश अर्जदार हे कुटुंबासह गावी गेले आहेत. त्यामुळे नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातून तीन लाखाहून अधिकांनी गाव गाठलेले आहे. तर लॉकडाउन सुरू असताना अथवा त्यापूर्वीच कोरोनाच्या भीतीने गाव गाठलेल्यांची संख्या लाखाच्या घरात आहे. त्यामध्ये पुणे, सातारा, कोल्हापूर यासह कोकणातील काही जिल्ह्यांतील व्यक्तींचा समावेश आहे. शिवाय मुंबई, ठाणे व कल्याण-डोंबिवली येथून गावाकडे गेलेल्यांची संख्यादेखील मोठी आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने नागरिकांनी गाव गाठल्याने मागील दोन महिन्यांत संबंधित जिल्ह्यातील लोकसंख्येत भर पडली आहे. याचा परिणाम तिथल्या यंत्रणेवर होऊ लागल्याने नव्याने येणाºयांना जिल्ह्यात प्रवेशबंदी घातल्याचे दिसून येत आहे.

राज्यांतर्गत प्रवास अर्ज अधिकच्मंजूर अर्जामध्ये नवी मुंबई आयुक्तालयांतर्गत देण्यात आलेल्या सुमारे पाच हजारई-पासचा समावेश आहे. उर्वरित अर्जांमध्ये काही प्रमाणात राज्याबाहेरील तर सर्वाधिक राज्यांतर्गत प्रवासाच्या अर्जांचा समावेश आहे.राज्याच्या विविध भागांत जाण्यास लागणाºया पाससाठी नवी मुंबई पोलिसांकडे ३१ मेपर्यंत एकूण ५ लाख ३ हजार ८०७ अर्ज आले आहेत. त्यापैकी १ लाख ३६ हजार ८९९ अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. विविध कारणांनी ३ लाख ६३ हजार ६०२ अर्ज नाकारण्यात आले असून, १ हजार ३०६ अर्जांची प्रक्रिया प्रलंबित आहे.- प्रवीणकुमार पाटील, उपायुक्त, गुन्हे शाखा