शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
2
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
3
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
4
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
5
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
6
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
7
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
8
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
9
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
10
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
11
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
12
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."
13
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
14
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
15
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
16
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
17
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
18
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
20
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!

स्थलांतरित शाळा समस्यांचे माहेरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 00:43 IST

पाण्याचा प्रश्न गंभीर; विमानतळबाधित गावांतील जिल्हा परिषदेच्या शाळा

- अरुणकुमार मेहत्रेकळंबोली : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी सिडकोकडून दहा गावांचे पुनर्वसन करण्यात आले. त्यासोबतच सात गावांतील जिल्हा परिषदेच्या शाळेचेही करंजाडे येथे सिडकोने स्थलांतर केले. एकाच इमारतीत ही शाळा भरते. सुरुवातीला शाळेला लागणाऱ्या सोयी सुविधा सिडकोकडून पुरवण्यात आल्या. मात्र, सद्यस्थितीत सिडको व पंचायत समितीच्या दुर्लक्षामुळे स्थलांतरित शाळा समस्यांचे माहेरघर बनले आहे.पाण्याअभावी शाळेतील स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी नियमित साफसफाईही होत नसल्याने ७०० विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत उपाययोजना करण्याची मागणी पालकांसह जनहित सामाजिक संस्थेने सिडको तसेच गटविकास अधिकारी, पंचायत समिती पनवेल यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रकल्पासाठी सिडकोने पनवेल तालुक्यातील दहा गावांची जागा संपादित केली. ही गावे पुन:स्थापना केलेल्या जागेत स्थलांतर करण्यात आली. गावासोबतच येथील जि.प. शाळाही सिडकोने करंजाडे सेक्टर आर २ येथे तीन मजली इमारतीत केली. या इमारतीत चिंचपाडा, डुंगी, कोळी, मोठे ओवळे, वडघर, कोपर, वाघवली पाडा या सहा गावांतील शाळा एकत्रित भरवली जाते.सुरुवातीला शाळेसाठी सिडकोकडून सोयी सुविधा पुरवण्यात आल्या; परंतु सद्यपरिस्थितीत शाळेची देखभाल दुरुस्ती, स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. शाळेतील स्वच्छतागृहाची अवस्था बिकट झाली आहे. येथील नळ तुटले आहेत. पाणी नसल्याने या ठिकाणी दुर्गंधी सुटली आहे. पिण्याचे पाणी असलेल्या टाकीची सफाई न झाल्याने त्यात मोठ्या प्रमाणात अळ्यांची उत्पत्ती झाली आहे.शाळेच्या इमारती परिसरात ठिकठिकाणी कचरा साठला आहे, तसेच बांधकामाचे साहित्यही अस्ताव्यस्त पडले आहे. पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण घेत असलेल्या ७०० विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.सिडकोने ही इमारत पनवेल पंचायत समितीकडे हस्तांतरित केली आहे. सोयी सुविधा व मेंटेनन्स करण्याकरिता सिडकोकडून दहा लाख रुपयाचे अनुदानही देण्यात आले आहे; परंतु याकडे सिडको तसेच पंचायत समिती दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप चिंचपाडा येथील जनहित सामाजिक संस्थेने केला आहे. याबाबत सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक व पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे तक्रार करून शाळेतील गैरसोयी दूर करण्याची मागणी केली आहे.तीन महिन्यांपासून सफाई कामगार नाहीशाळेतील साफसफाई करण्याकरिता कर्मचाºयाची नियुक्ती करण्यात आली होती; परंतु गेल्या तीन महिन्यांपासून सफाई कामगार नसल्यानेही शाळा परिसर अस्वच्छ झाल्याचे पालकांचे म्हणणे आहे. लवकरच या ठिकाणी सफाई कामगार नेमावा, अशी मागणी पालकांकडून जोर धरत आहे.लहान मुलांची तहान टँकरवरसिडकोकडून पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात आली आहे; परंतु पाणी येत नसल्याने टँकर मागवून लहान मुलांची तहान भागवली जाते. लहान मुलांना दिला जाणारा पोषण आहार शिजवण्याकरिताही पाणी टँकरने मागवले जाते. टँकरने आणलेले पाणी फिल्टर असेलच असे नाही, यामुळे लहान मुलांना आजार जडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.शाळेच्या विविध समस्यांबाबत पालक तसेच सामाजिक संस्थेने कळवले आहे. मुख्यध्यापकांची तातडीने बैठक घेऊन या संदर्भात सूचना करण्यात आल्या आहेत. लवकरच सर्व समस्यांचे निरसन केले जाईल. विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल.- डी. एन तेटगुरे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, पनवेल