शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
3
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
4
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
5
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
6
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
7
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
8
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
9
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
10
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
11
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
12
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
13
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
14
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
15
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
16
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
17
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
18
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
19
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
20
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव

स्थलांतरित शाळा समस्यांचे माहेरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 00:43 IST

पाण्याचा प्रश्न गंभीर; विमानतळबाधित गावांतील जिल्हा परिषदेच्या शाळा

- अरुणकुमार मेहत्रेकळंबोली : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी सिडकोकडून दहा गावांचे पुनर्वसन करण्यात आले. त्यासोबतच सात गावांतील जिल्हा परिषदेच्या शाळेचेही करंजाडे येथे सिडकोने स्थलांतर केले. एकाच इमारतीत ही शाळा भरते. सुरुवातीला शाळेला लागणाऱ्या सोयी सुविधा सिडकोकडून पुरवण्यात आल्या. मात्र, सद्यस्थितीत सिडको व पंचायत समितीच्या दुर्लक्षामुळे स्थलांतरित शाळा समस्यांचे माहेरघर बनले आहे.पाण्याअभावी शाळेतील स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी नियमित साफसफाईही होत नसल्याने ७०० विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत उपाययोजना करण्याची मागणी पालकांसह जनहित सामाजिक संस्थेने सिडको तसेच गटविकास अधिकारी, पंचायत समिती पनवेल यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रकल्पासाठी सिडकोने पनवेल तालुक्यातील दहा गावांची जागा संपादित केली. ही गावे पुन:स्थापना केलेल्या जागेत स्थलांतर करण्यात आली. गावासोबतच येथील जि.प. शाळाही सिडकोने करंजाडे सेक्टर आर २ येथे तीन मजली इमारतीत केली. या इमारतीत चिंचपाडा, डुंगी, कोळी, मोठे ओवळे, वडघर, कोपर, वाघवली पाडा या सहा गावांतील शाळा एकत्रित भरवली जाते.सुरुवातीला शाळेसाठी सिडकोकडून सोयी सुविधा पुरवण्यात आल्या; परंतु सद्यपरिस्थितीत शाळेची देखभाल दुरुस्ती, स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. शाळेतील स्वच्छतागृहाची अवस्था बिकट झाली आहे. येथील नळ तुटले आहेत. पाणी नसल्याने या ठिकाणी दुर्गंधी सुटली आहे. पिण्याचे पाणी असलेल्या टाकीची सफाई न झाल्याने त्यात मोठ्या प्रमाणात अळ्यांची उत्पत्ती झाली आहे.शाळेच्या इमारती परिसरात ठिकठिकाणी कचरा साठला आहे, तसेच बांधकामाचे साहित्यही अस्ताव्यस्त पडले आहे. पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण घेत असलेल्या ७०० विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.सिडकोने ही इमारत पनवेल पंचायत समितीकडे हस्तांतरित केली आहे. सोयी सुविधा व मेंटेनन्स करण्याकरिता सिडकोकडून दहा लाख रुपयाचे अनुदानही देण्यात आले आहे; परंतु याकडे सिडको तसेच पंचायत समिती दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप चिंचपाडा येथील जनहित सामाजिक संस्थेने केला आहे. याबाबत सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक व पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे तक्रार करून शाळेतील गैरसोयी दूर करण्याची मागणी केली आहे.तीन महिन्यांपासून सफाई कामगार नाहीशाळेतील साफसफाई करण्याकरिता कर्मचाºयाची नियुक्ती करण्यात आली होती; परंतु गेल्या तीन महिन्यांपासून सफाई कामगार नसल्यानेही शाळा परिसर अस्वच्छ झाल्याचे पालकांचे म्हणणे आहे. लवकरच या ठिकाणी सफाई कामगार नेमावा, अशी मागणी पालकांकडून जोर धरत आहे.लहान मुलांची तहान टँकरवरसिडकोकडून पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात आली आहे; परंतु पाणी येत नसल्याने टँकर मागवून लहान मुलांची तहान भागवली जाते. लहान मुलांना दिला जाणारा पोषण आहार शिजवण्याकरिताही पाणी टँकरने मागवले जाते. टँकरने आणलेले पाणी फिल्टर असेलच असे नाही, यामुळे लहान मुलांना आजार जडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.शाळेच्या विविध समस्यांबाबत पालक तसेच सामाजिक संस्थेने कळवले आहे. मुख्यध्यापकांची तातडीने बैठक घेऊन या संदर्भात सूचना करण्यात आल्या आहेत. लवकरच सर्व समस्यांचे निरसन केले जाईल. विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल.- डी. एन तेटगुरे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, पनवेल