शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
2
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
4
प्रेमात वेडा होऊन पाकिस्तानात पोहोचला! तुरुंगवास भोगून आता अलीगडचा 'बादल बाबू' पुन्हा भारतात येणार!
5
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
6
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
7
शाब्बास पोरी! प्रेक्षकांच्या लाडक्या इंदूने घेतलं हक्काचं घर, कांची शिंदेंने शेअर केले फोटो
8
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांनी टीका
9
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
10
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
11
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
12
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
13
पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर 
14
चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ
15
महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
16
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
17
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
18
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
19
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
20
India U19 Squad For ICC Men’s U19 World Cup : तोच पॅटर्न! अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

कांदा-बटाटा मार्केटमध्ये व्यापारी-माथाडी संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2021 05:15 IST

५० किलोपेक्षा जास्त वजनाची गोण उचलण्यास विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा-बटाटा मार्केटमध्ये ५० किलोपेक्षा जास्त वजनाची गोण उचलण्यास माथाडी कामगारांनी नकार दिल्यामुळे व्यापाऱ्यांनी मार्केट बंद केले. जवळपास  पाच तास मार्केटमधील  व्यवहार ठप्प झाले होते. बाजार समिती सभापतींनी  कामगार  व व्यापारी प्रतिनिधींची चर्चा करून हा प्रश्न सोडविण्यासाठी समितीची नियुक्ती केल्यानंतर मार्केट पूर्ववत सुरू करण्यात आले. 

बाजार समितीमध्ये कोणत्याही गोणीचे वजन ५० किलोपेक्षा जास्त असू नये असा नियम  केंद्र शासनाने केला आहे. कांदा-बटाटा मार्केटमध्ये काही गोणींमध्ये ५० पेक्षा जास्त किलो माल भरला जात आहे. कामगारांच्या आरोग्यासाठी केंद्र शासनाच्या नियमांचे पालन करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने केली आहे.  परंतु यानंतरही अंमलबजावणी होत नसल्याने कामगारांनी नाराजी व्यक्त केली होती. यापूर्वी एक दिवस बंदही केला होता. गुरुवारी तीन ठिकाणी जादा वजन आल्यामुळे कामगारांनी निदर्शनास आणून दिले. वारंवार या विषयावरून मतभेद होत असल्यामुळे संतापलेल्या व्यापाऱ्यांनी मार्केट बंदचे आवाहन केले. सकाळी दहा वाजता कांदा मार्केट बंद करण्यात आले.     व्यापारी व माथाडी कामगारांमध्ये झालेल्या मतभेदावर तोडगा काढण्यासाठी सभापती अशोक डक यांनी तातडीची बैठक बोलावली. या बैठकीमध्ये व्यापाऱ्यांनी या नियमांची राज्यातील सर्व बाजार समितीमध्ये अंमलबजावणी व्हावी फक्त मुंबईमध्ये सक्ती करू नये अशी भूमिका मांडली. व्यापाऱ्यांची अडवणूक होऊ नये अशी मागणीही केली. कामगार प्रतिनिधींनी आरोग्याच्या दृष्टीने गोणीचे वजन जास्त नसावे व नियमांचे पालन करावे अशी भूमिका मांडली. अखेर आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली समिती गठीत करण्यात आली असून पुढील आठ दिवसात समितीने योग्य तोडगा काढावा, असे निश्चित केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 

कांदा-बटाटा मार्केटमध्ये निर्माण झालेला प्रश्न सोडविण्यासाठी सभापतींनी तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत व्यापारी व कामगार प्रतिनिधींनी चर्चा करून समिती गठीत केली आहे. सदर समिती हा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी सर्वांशी चर्चा करून निर्णय घेणार आहे. - अशोक वाळुंज, संचालक कांदा-बटाटा मार्केट 

कृषिमालाची गोण ५० किलोपेक्षा जास्त वजनाची नसावी असा केंद्र शासनाचा नियम आहे. या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी माथाडी संघटनेने केली आहे. कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने जास्त वजनाची गाेण नसावी  यासाठी अनेक महिन्यांपासून पाठपुरावा सुरू आहे. - चंद्रकांत पाटील, माथाडी नेते

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती