शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
2
'याचना नहीं, अब रण होगा...' कवितेने सुरुवात; आर्मीने दाखवला 'ऑपरेशन सिंदूर'चा नवा व्हिडिओ
3
Operation Sindoor : "हौसले बुलंद हो, तो..." क्रिकेटचा किस्सा ऐकवत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज, पाकचा 'खेळ खल्लास' कसा केला ते सांगितलं!
4
भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
5
जग कधीच विसरू शकणार नाही विराट कोहलीचे हे 10 कसोटी विक्रम; कुण्याही भारतीयाला जमला नाही असा पराक्रम
6
"मी विराटचे अश्रू पाहिलेत..."; 'किंग कोहली'च्या कसोटी निवृत्तीनंतर अनुष्का शर्माची भावनिक पोस्ट
7
स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर प्रतीकला दत्तक घेणार होती बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध जोडी! अभिनेत्याचा मोठा खुलासा 
8
Kangana Ranaut : "जितके संयमी, तितकेच धाडसी"; ऑपरेशन सिंदूरच्या यशाने कंगना राणौत खूश, मोदींचं केलं कौतुक
9
'युद्ध रोमँटिक चित्रपट नाही, गंभीर मुद्दा आहे', माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे सूचक विधान
10
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
11
सेव्हिंग अकाऊंटमध्ये पैसे ठेवूनही मिळेल FD इतकं व्याज; फक्त करावं लागेल 'हे' महत्त्वाचं काम
12
भारताच्या सीमेवर अवकाशातूनही करडी नजर; ISRO लॉन्च करणार RISAT-1B, काय आहे खास वैशिष्टे?
13
विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर 'हेड कोच' गौतम गंभीरचे ट्विट, सिंहाशी तुलना करत म्हणाला...
14
अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धाला अखेर पूर्णविराम; ट्रम्प आता किती टॅरिफ आकारणार?
15
Technology: तुटलेल्या केबलचे चार्जर वापरणे ताबडतोब थांबवा; होईल मोठे नुकसान!
16
एल्विशची सिस्टम हँग होणार! सापाचे विष आणि ड्रग्जच्या वापराप्रकरणात युट्यूबरला कोर्टाचा दणका
17
पाकिस्तानात आज पुन्हा भूकंपाचे धक्का; ७ दिवसांत तिसऱ्यांदा हादरली पाकची जमीन
18
सचिन वर्सेस विराट; कसोटीत कोण ठरलं भारी! इथं पाहा खास रेकॉर्ड
19
एका झटक्यात सोन्याच्या दरात २००० रुपयांपेक्षा अधिक घसरण; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
20
Mehraj Malik : "रेशनचा मोठा तुटवडा; दुकानांमध्ये पीठ, तांदूळ, साखर उपलब्ध नाही, जनतेमध्ये भीतीचं वातावरण"

कांदा-बटाटा मार्केटमध्ये व्यापारी-माथाडी संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2021 05:15 IST

५० किलोपेक्षा जास्त वजनाची गोण उचलण्यास विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा-बटाटा मार्केटमध्ये ५० किलोपेक्षा जास्त वजनाची गोण उचलण्यास माथाडी कामगारांनी नकार दिल्यामुळे व्यापाऱ्यांनी मार्केट बंद केले. जवळपास  पाच तास मार्केटमधील  व्यवहार ठप्प झाले होते. बाजार समिती सभापतींनी  कामगार  व व्यापारी प्रतिनिधींची चर्चा करून हा प्रश्न सोडविण्यासाठी समितीची नियुक्ती केल्यानंतर मार्केट पूर्ववत सुरू करण्यात आले. 

बाजार समितीमध्ये कोणत्याही गोणीचे वजन ५० किलोपेक्षा जास्त असू नये असा नियम  केंद्र शासनाने केला आहे. कांदा-बटाटा मार्केटमध्ये काही गोणींमध्ये ५० पेक्षा जास्त किलो माल भरला जात आहे. कामगारांच्या आरोग्यासाठी केंद्र शासनाच्या नियमांचे पालन करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने केली आहे.  परंतु यानंतरही अंमलबजावणी होत नसल्याने कामगारांनी नाराजी व्यक्त केली होती. यापूर्वी एक दिवस बंदही केला होता. गुरुवारी तीन ठिकाणी जादा वजन आल्यामुळे कामगारांनी निदर्शनास आणून दिले. वारंवार या विषयावरून मतभेद होत असल्यामुळे संतापलेल्या व्यापाऱ्यांनी मार्केट बंदचे आवाहन केले. सकाळी दहा वाजता कांदा मार्केट बंद करण्यात आले.     व्यापारी व माथाडी कामगारांमध्ये झालेल्या मतभेदावर तोडगा काढण्यासाठी सभापती अशोक डक यांनी तातडीची बैठक बोलावली. या बैठकीमध्ये व्यापाऱ्यांनी या नियमांची राज्यातील सर्व बाजार समितीमध्ये अंमलबजावणी व्हावी फक्त मुंबईमध्ये सक्ती करू नये अशी भूमिका मांडली. व्यापाऱ्यांची अडवणूक होऊ नये अशी मागणीही केली. कामगार प्रतिनिधींनी आरोग्याच्या दृष्टीने गोणीचे वजन जास्त नसावे व नियमांचे पालन करावे अशी भूमिका मांडली. अखेर आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली समिती गठीत करण्यात आली असून पुढील आठ दिवसात समितीने योग्य तोडगा काढावा, असे निश्चित केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 

कांदा-बटाटा मार्केटमध्ये निर्माण झालेला प्रश्न सोडविण्यासाठी सभापतींनी तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत व्यापारी व कामगार प्रतिनिधींनी चर्चा करून समिती गठीत केली आहे. सदर समिती हा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी सर्वांशी चर्चा करून निर्णय घेणार आहे. - अशोक वाळुंज, संचालक कांदा-बटाटा मार्केट 

कृषिमालाची गोण ५० किलोपेक्षा जास्त वजनाची नसावी असा केंद्र शासनाचा नियम आहे. या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी माथाडी संघटनेने केली आहे. कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने जास्त वजनाची गाेण नसावी  यासाठी अनेक महिन्यांपासून पाठपुरावा सुरू आहे. - चंद्रकांत पाटील, माथाडी नेते

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती