शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा.…’’, प्रसिद्ध व्यावसायिकाने राज ठाकरेंना डिवचले  
2
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
3
ऑपरेशन सिंदूर: पाकिस्तान सीमेवर भारत एकाचवेळी तीन देशांशी लढत होता; उप लष्करप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट  
4
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
5
IND vs ENG: बॅटने कहर केल्यानंतर आता बॉलने इतिहास रचण्याची संधी, जाडेजाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष!
6
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक
7
चीनच्या डावपेचात अडकला भारत? EV तयार करणाऱ्या कंपन्यांनी हात वर केले, आता पुढे काय?
8
विराट-रोहितच्या संदर्भात आली मोठी अपडेट; टीम इंडियाच्या चाहत्यांचा पुन्हा होणार 'मूड ऑफ'
9
श्रेया, भाऊ कोहिनूर हिरे पण 'तो' भंगारवाला? शरद उपाध्येंची ६ वर्षांपूर्वीची 'ती' पोस्ट व्हायरल
10
Ashadhi Ekadashi Vrat 2025: आषाढी एकादशीला 'अशी' करा विधिवत पूजा; जाणून घ्या नियम आणि शुभ मुहूर्त!
11
पाकिस्तानचा पाय आणखी खोलात! मायक्रोसॉफ्टने २५ वर्षांनी सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का!
12
पुणे बलात्कार प्रकरण: आरोपी तरुणीला आधीपासूनच ओळखत होता; पोलिसांकडून दोघांची चौकशी
13
राजकीय शेरेबाजी करणाऱ्यांना तालिका सभाध्यक्षपदी बसण्याचा अधिकार आहे का?; विरोधकांचा सवाल
14
"किती सुंदर व्यक्त झालायेस डॉक्टर, तू एक...", निलेश साबळेंच्या पोस्टवर प्रवीण तरडे काय म्हणाले?
15
रणबीरच्या 'रामा'ची RRRमधल्या रामचरणशी तुलना, 'रामायण'च्या टीझरनंतर चाहते म्हणतात- "प्रभू श्री रामांच्या भूमिकेसाठी..."
16
होम लोन घेण्याचा विचार करताय? ३ सरकारी बँकांनी कमी केले व्याजदर; पाहा कोणत्या बँकेत मिळतंय स्वस्त कर्ज
17
लेखः 'हिंदी सक्ती' टळली, पण त्याने मराठी भाषेवर आलेलं संकट टळेल? नेमकं कोण चुकतंय?
18
Ashadhi Ekadashi 2025: धर्मशास्त्रानुसार कसा करावा आषाढी एकादशीचा उपास? व्रतनियम वाचा!
19
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
20
हृदयद्रावक! खेळताना प्लास्टिकचा बॉल गिळला; दीड वर्षांच्या लेकीचा पालकांसमोर तडफडून मृत्यू

स्मृती उद्यानात पालापाचोळा जाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 22:47 IST

कळंबोलीमधील प्रकार; प्रदूषण पसरविणाऱ्या ठेकेदारावर कारवाईची मागणी

कळंबोली : उद्यानामधील पालापाचोळ्यातून खतनिर्मिती करणे आवश्यक आहे; परंतु ठेकेदाराकडून येथील कचरा जाळून प्रदूषण केले जात आहे. स्वच्छ भारत अभियानाला हरताळ फासून प्रदूषण निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.उद्यानामधील पालापाचोळा जमा करण्याची जबाबदारी उद्यानाची देखभाल करीत असलेल्या ठेकादाराची आहे. यापासून खत तयार करता येते; पण ते न करता त्याच ठिकाणी जाळण्याचा प्रकार होत आहे. कळंबोली सेक्टर २ ई येथील स्मृती उद्यानात गुरुवारी ५ वाजता ठेकेदाराच्या देखभाल करणाºया कामगारांकडून पालापाचोळ्याचे दहा ते पंधरा ढीग करून ते पेटवून दिले. त्यामुळे संपूर्ण उद्यान धुरात हरवले होते. त्याचबरोबर बाजूला असलेल्या एलआयजीतील रहिवाशांना त्याचा त्रास झाला. या कारणाने पर्यावरणाला मोठ्या प्रमाणावर हानी पोहोचत आहे. विशेष म्हणजे, हा पालापाचोळा झाडांच्या खाली जाळण्यात आल्याने वृक्षांनाही हानी पोहोचली. या प्रकारांमुळे नियमांना छेद बसत असून, पर्यावरण संवर्धनाचा प्रश्न निर्माण होत आहे. उद्यानांची स्वच्छता, वृक्षांची छाटणी करताना वा अन्य वेळी मोठ्या प्रमाणावर झाडांचा पालापाचोळा पसरतो. मात्र, असा पालापाचोळा जमा करण्यासाठी सिडकोकडे कोणत्याही प्रकारची व्यवस्थाच उपलब्ध करून दिलेली नाही. पालापाचोळा जमा करायचा कसा आणि कुठे, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.प्रदूषण नियंत्रणासाठी पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी उच्च न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी कचरा जाळण्यास बंदी घातली आहे; पण यांचा विसर सिडको देखभालीकरिता दिलेल्या ठेकादाराला याबाबत विसर पडला आहे. महिन्यातील दोन ते तीन वेळेस असा पालापाचोळा एकत्रित करून जाळला जात आहे. याकडे सिडको तसेच महापालिका आरोग्य विभाग लक्ष देणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.