शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

स्मृती उद्यानात पालापाचोळा जाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 22:47 IST

कळंबोलीमधील प्रकार; प्रदूषण पसरविणाऱ्या ठेकेदारावर कारवाईची मागणी

कळंबोली : उद्यानामधील पालापाचोळ्यातून खतनिर्मिती करणे आवश्यक आहे; परंतु ठेकेदाराकडून येथील कचरा जाळून प्रदूषण केले जात आहे. स्वच्छ भारत अभियानाला हरताळ फासून प्रदूषण निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.उद्यानामधील पालापाचोळा जमा करण्याची जबाबदारी उद्यानाची देखभाल करीत असलेल्या ठेकादाराची आहे. यापासून खत तयार करता येते; पण ते न करता त्याच ठिकाणी जाळण्याचा प्रकार होत आहे. कळंबोली सेक्टर २ ई येथील स्मृती उद्यानात गुरुवारी ५ वाजता ठेकेदाराच्या देखभाल करणाºया कामगारांकडून पालापाचोळ्याचे दहा ते पंधरा ढीग करून ते पेटवून दिले. त्यामुळे संपूर्ण उद्यान धुरात हरवले होते. त्याचबरोबर बाजूला असलेल्या एलआयजीतील रहिवाशांना त्याचा त्रास झाला. या कारणाने पर्यावरणाला मोठ्या प्रमाणावर हानी पोहोचत आहे. विशेष म्हणजे, हा पालापाचोळा झाडांच्या खाली जाळण्यात आल्याने वृक्षांनाही हानी पोहोचली. या प्रकारांमुळे नियमांना छेद बसत असून, पर्यावरण संवर्धनाचा प्रश्न निर्माण होत आहे. उद्यानांची स्वच्छता, वृक्षांची छाटणी करताना वा अन्य वेळी मोठ्या प्रमाणावर झाडांचा पालापाचोळा पसरतो. मात्र, असा पालापाचोळा जमा करण्यासाठी सिडकोकडे कोणत्याही प्रकारची व्यवस्थाच उपलब्ध करून दिलेली नाही. पालापाचोळा जमा करायचा कसा आणि कुठे, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.प्रदूषण नियंत्रणासाठी पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी उच्च न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी कचरा जाळण्यास बंदी घातली आहे; पण यांचा विसर सिडको देखभालीकरिता दिलेल्या ठेकादाराला याबाबत विसर पडला आहे. महिन्यातील दोन ते तीन वेळेस असा पालापाचोळा एकत्रित करून जाळला जात आहे. याकडे सिडको तसेच महापालिका आरोग्य विभाग लक्ष देणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.