शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

व्यापाऱ्यांची बैठक ते पंतप्रधानांची सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 23:31 IST

मंदा म्हात्रे यांचा व्यस्त दिनक्रम : बाजार समितीमधील विविध घटकांशीही संवाद

नवी मुंबई : सीबीडीमधील गौरव या निवासस्थानी जमलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत आमदार मंदा म्हात्रे यांच्या दिवसाची सुरुवात झाली. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजी व्यापाऱ्यांची बैठक, मार्केटमधील विविध घटकांशी संवाद, माथाडी कामगार संघटनेची पत्रकार परिषद व नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमधील खारघर येथील सभा, असा पूर्णपणे धावपळीमध्ये दिनक्रम पार पडला. दिवसभर कार्यकर्त्यांचा व नागरिकांनी केलेला प्रत्येक फोन स्वत: घेऊन मतदारसंघातील घडामोडींचा व प्रचाराचा आढावा घेणे सुरूच असल्याचे पाहावयास मिळाले.

निवडणूक काळात प्रत्येक दिवस व क्षण महत्त्वाचा असतो. उमेदवारांना सदैव दक्ष राहावे लागते. बेलापूरच्या भाजप उमेदवार आमदार मंदा म्हात्रे यांचा दिवसही सकाळी लवकर सुरू झाला. दिवसभर मतदारसंघामध्ये कोण कुठे प्रचार करणार आहे. मतदारांची यादी व दिवसभरातील प्रचाराविषयी सर्वांना प्रत्यक्ष व फोनवरून सूचना करून १० वाजता बाजार समितीमधील भाजी मार्केटच्या व्यापाºयांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थिती लावली. पाच वर्षांमध्ये विस्तारित भाजी मार्केटचा प्रश्न सोडविता आल्याविषयी समाधान व्यक्त केले. भविष्यात बाजार समिती हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मार्केट बनविण्याचे आश्वासन दिले. विरोधी पक्षातील उमेदवाराच्या धोरणांचा सडकून समाचार घेतला. मराठी कार्ड वापरण्याचा प्रयत्न करणारे स्वत: ओबीसी असल्याचे सांगून महापालिकेची निवडणूक लढल्याची टीकाही केली. पश्चिम महाराष्ट्रासह व देशाच्या विविध भागातून आलेल्या नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य यापूर्वी दिल्याचे सांगितले. व्यापाºयांशी संवाद साधून ११.३० वाजता माथाडी संघटनेच्या पत्रकार परिषदेला उपस्थिती दर्शवून कामगारांच्या पाठीशी सदैव ठामपणे उभे असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. माथाडी कायदा अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले.

एपीएमसीमधील व्यापारी, संघटनांचे प्रतिनिधी, माथाडी भवनमध्ये विविध कामगार संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून मंदा म्हात्रे महत्त्वाच्या कार्यकर्त्यांसह दुपारी पुन्हा गौरव या निवासस्थानाकडे रवाना झाल्या. मतदारसंघातून आलेल्या कार्यकर्त्यांकडून प्रचाराविषयी माहिती घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या, कोणीही गाफील राहू नये. प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. यामुळे जमिनीवर राहून सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्यास प्राधान्य देण्याच्या सूचना देऊन खारघरमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये बैठकीसाठी कार्यकर्त्यांसह रवाना झाले. पंतप्रधानांची सभा झाल्यानंतर पुन्हा विभागनिहाय नागरिकांशी संवाद सुरू झाला. मतदारसंघामधील एनआरआय, अक्षर या गृहनिर्माण सोसायटीमधील नागरिकांशी संवाद साधला.प्रत्येक फोनला स्वत:च प्रतिसादआमदार मंदा म्हात्रे या कार्यकर्ते व सामान्य नागरिक कोणीही संपर्क साधला तरी स्वत:च फोन उचलत असतात. पहाटेपासून ते प्रचार संपेपर्यंत फोन सुरूच होता. सभेत भाषण करताना व नागरिकांशी संवाद साधताना जे फोन उचलता आले नाहीत त्या सर्वांना गाडीतून प्रवास करताना स्वत: फोन करून संवाद साधत होत्या. नागरिकांना थेट संपर्क साधता यावा, यासाठी प्रत्येक फोन नेहमीच स्वत:च उचलत असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.