शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

मीरा-भार्इंदरमध्ये दिवाळीत अनधिकृत बांधकामांचे डबलबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 02:41 IST

मीरा रोड : दिवाळीमुळे आलेले सलग सुट्यांचे दिवस मीरा-भार्इंदरमध्ये अनधिकृत चाळी, झोपड्या आणि गाळेमाफियांसाठी सुगीचे ठरले आहेत. या कालावधीत ...

मीरा रोड : दिवाळीमुळे आलेले सलग सुट्यांचे दिवस मीरा-भार्इंदरमध्ये अनधिकृत चाळी, झोपड्या आणि गाळेमाफियांसाठी सुगीचे ठरले आहेत. या कालावधीत शहरात मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे उभी राहिली. आधीच अनधिकृत बांधकामांवर कारवाई होत नसल्याच्या तक्रारी वाढत असताना आता नव्याने उभ्या होत असलेल्या बेकायदा बांधकामांना सुटीचे संरक्षण मिळाले आहे.

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना मंगळवार ते शुक्रवार असे चार दिवस दिवाळीची सुटी होती. त्याला लागूनच दुसरा सुटीचा शनिवार आणि रविवार आल्याने सलग सहा दिवस सुटीचा आनंद मिळाला. याशिवाय, बरेच अधिकारी-कर्मचारी सोमवारची रजा घेऊन रविवारपासूनच सुटीवर गेले होते. त्यामुळे सोमवारी पालिकेत शुकशुकाटच होता. गेला आठवडाभर पालिकेमध्ये दिवाळी सुटीचे वातावरण असले, तरी शहरात मात्र बेकायदा बांधकाम करणाºयांना सुगीचे दिवस आले आहेत. सलग सुट्या असल्याने पालिकेची कार्यालये बंद, तर अधिकारी-कर्मचारी रजेवर गेल्याने शहरातील झोपडपट्ट्या, औद्योगिक वसाहतींमध्ये गाळे वाढवण्याची बेकायदा बांधकामे सर्रास चालली आहेत. गाळे, चाळी, झोपड्या, खोल्या आदींपासून मोठी बांधकामेसुद्धा सर्रास बांधली गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सुटीच्या दिवशी बांधकामे चालवल्याने पालिका अधिकाºयांनीदेखील त्याकडे कानाडोळा केला. शिवाय, जागरूक नागरिकांनी तक्रारी केल्याच, तरी सुटीचे कारण पुढे करत कामावर हजर झाल्यावर बघू, असे उत्तर त्यांना देण्यात आले. अनधिकृत बांधकामांमध्ये लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्यासह कथित समाजसेवकांपासून अनेकांचे हात ओले होत असतात. अनधिकृत बांधकामांप्रकरणी लाच घेताना अनेकदा लोकप्रतिनिधी, अधिकारी रंगेहाथ पकडले गेले आहेत. यावरून त्यांचे लागेबांधे स्पष्ट होतात. त्यामुळे बेकायदा बांधकामे करताना अनेकांना सांभाळून घेतले जाते. त्यामुळेच बेकायदा बांधकामांवर ठोस कारवाई होत नाही. शिवाय, याला जबाबदार असणारे अधिकारी, लोकप्रतिनिधी मोकाटच असतात. अनधिकृत बांधकामांविरोधात काही लोकप्रतिनिधींनी पत्रकार परिषद घेऊन कारवाईची मागणी केली होती. अनेकजण तक्रारीसुद्धा करतात. पण, शहरात बेकायदा बांधकामे करण्यात भागीदारी मागण्यापासून फुटाप्रमाणे आकडेमोड केली जाते. त्यामुळे राजाश्रय लाभलेल्या या बांधकामांवर कारवाईची हिम्मत पालिका अधिकारीच काय, तर आयुक्तदेखील करत नाहीत, असे सूत्रांनी सांगितले.पालिका प्रशासन सत्ताधाºयांसमोर लाचार झाले आहे. गल्लीबोळांंमध्ये फोफावलेल्या बड्या राजकीय धेंडांच्या बांधकामांना का तोडले जात नाही, याचा लेखी खुलासा पालिका प्रशासनाने प्रत्येक प्रकरणनिहाय करावा. अनधिकृत बांधकामांना पालिकेचा आशीर्वाद आहे. अनधिकृ त बांधकामांवर प्रभाग अधिकारी कारवाई करत नसतील, तर प्रशासनही त्यांना निलंबित करून फौजदारी दावा दाखल करत नाही, हे दुर्दैव आहे.- अविनाश जाधव, ठाणे जिल्हाध्यक्ष, मनसे 

टॅग्स :thaneठाणेNavi Mumbaiनवी मुंबई