शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
4
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
5
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
6
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
7
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
8
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
9
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
10
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
11
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
12
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
14
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
15
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
16
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
17
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
18
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
19
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
20
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती

मीरा-भार्इंदरमध्ये दिवाळीत अनधिकृत बांधकामांचे डबलबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 02:41 IST

मीरा रोड : दिवाळीमुळे आलेले सलग सुट्यांचे दिवस मीरा-भार्इंदरमध्ये अनधिकृत चाळी, झोपड्या आणि गाळेमाफियांसाठी सुगीचे ठरले आहेत. या कालावधीत ...

मीरा रोड : दिवाळीमुळे आलेले सलग सुट्यांचे दिवस मीरा-भार्इंदरमध्ये अनधिकृत चाळी, झोपड्या आणि गाळेमाफियांसाठी सुगीचे ठरले आहेत. या कालावधीत शहरात मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे उभी राहिली. आधीच अनधिकृत बांधकामांवर कारवाई होत नसल्याच्या तक्रारी वाढत असताना आता नव्याने उभ्या होत असलेल्या बेकायदा बांधकामांना सुटीचे संरक्षण मिळाले आहे.

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना मंगळवार ते शुक्रवार असे चार दिवस दिवाळीची सुटी होती. त्याला लागूनच दुसरा सुटीचा शनिवार आणि रविवार आल्याने सलग सहा दिवस सुटीचा आनंद मिळाला. याशिवाय, बरेच अधिकारी-कर्मचारी सोमवारची रजा घेऊन रविवारपासूनच सुटीवर गेले होते. त्यामुळे सोमवारी पालिकेत शुकशुकाटच होता. गेला आठवडाभर पालिकेमध्ये दिवाळी सुटीचे वातावरण असले, तरी शहरात मात्र बेकायदा बांधकाम करणाºयांना सुगीचे दिवस आले आहेत. सलग सुट्या असल्याने पालिकेची कार्यालये बंद, तर अधिकारी-कर्मचारी रजेवर गेल्याने शहरातील झोपडपट्ट्या, औद्योगिक वसाहतींमध्ये गाळे वाढवण्याची बेकायदा बांधकामे सर्रास चालली आहेत. गाळे, चाळी, झोपड्या, खोल्या आदींपासून मोठी बांधकामेसुद्धा सर्रास बांधली गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सुटीच्या दिवशी बांधकामे चालवल्याने पालिका अधिकाºयांनीदेखील त्याकडे कानाडोळा केला. शिवाय, जागरूक नागरिकांनी तक्रारी केल्याच, तरी सुटीचे कारण पुढे करत कामावर हजर झाल्यावर बघू, असे उत्तर त्यांना देण्यात आले. अनधिकृत बांधकामांमध्ये लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्यासह कथित समाजसेवकांपासून अनेकांचे हात ओले होत असतात. अनधिकृत बांधकामांप्रकरणी लाच घेताना अनेकदा लोकप्रतिनिधी, अधिकारी रंगेहाथ पकडले गेले आहेत. यावरून त्यांचे लागेबांधे स्पष्ट होतात. त्यामुळे बेकायदा बांधकामे करताना अनेकांना सांभाळून घेतले जाते. त्यामुळेच बेकायदा बांधकामांवर ठोस कारवाई होत नाही. शिवाय, याला जबाबदार असणारे अधिकारी, लोकप्रतिनिधी मोकाटच असतात. अनधिकृत बांधकामांविरोधात काही लोकप्रतिनिधींनी पत्रकार परिषद घेऊन कारवाईची मागणी केली होती. अनेकजण तक्रारीसुद्धा करतात. पण, शहरात बेकायदा बांधकामे करण्यात भागीदारी मागण्यापासून फुटाप्रमाणे आकडेमोड केली जाते. त्यामुळे राजाश्रय लाभलेल्या या बांधकामांवर कारवाईची हिम्मत पालिका अधिकारीच काय, तर आयुक्तदेखील करत नाहीत, असे सूत्रांनी सांगितले.पालिका प्रशासन सत्ताधाºयांसमोर लाचार झाले आहे. गल्लीबोळांंमध्ये फोफावलेल्या बड्या राजकीय धेंडांच्या बांधकामांना का तोडले जात नाही, याचा लेखी खुलासा पालिका प्रशासनाने प्रत्येक प्रकरणनिहाय करावा. अनधिकृत बांधकामांना पालिकेचा आशीर्वाद आहे. अनधिकृ त बांधकामांवर प्रभाग अधिकारी कारवाई करत नसतील, तर प्रशासनही त्यांना निलंबित करून फौजदारी दावा दाखल करत नाही, हे दुर्दैव आहे.- अविनाश जाधव, ठाणे जिल्हाध्यक्ष, मनसे 

टॅग्स :thaneठाणेNavi Mumbaiनवी मुंबई