शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

मीरा-भार्इंदरमध्ये दिवाळीत अनधिकृत बांधकामांचे डबलबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 02:41 IST

मीरा रोड : दिवाळीमुळे आलेले सलग सुट्यांचे दिवस मीरा-भार्इंदरमध्ये अनधिकृत चाळी, झोपड्या आणि गाळेमाफियांसाठी सुगीचे ठरले आहेत. या कालावधीत ...

मीरा रोड : दिवाळीमुळे आलेले सलग सुट्यांचे दिवस मीरा-भार्इंदरमध्ये अनधिकृत चाळी, झोपड्या आणि गाळेमाफियांसाठी सुगीचे ठरले आहेत. या कालावधीत शहरात मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे उभी राहिली. आधीच अनधिकृत बांधकामांवर कारवाई होत नसल्याच्या तक्रारी वाढत असताना आता नव्याने उभ्या होत असलेल्या बेकायदा बांधकामांना सुटीचे संरक्षण मिळाले आहे.

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना मंगळवार ते शुक्रवार असे चार दिवस दिवाळीची सुटी होती. त्याला लागूनच दुसरा सुटीचा शनिवार आणि रविवार आल्याने सलग सहा दिवस सुटीचा आनंद मिळाला. याशिवाय, बरेच अधिकारी-कर्मचारी सोमवारची रजा घेऊन रविवारपासूनच सुटीवर गेले होते. त्यामुळे सोमवारी पालिकेत शुकशुकाटच होता. गेला आठवडाभर पालिकेमध्ये दिवाळी सुटीचे वातावरण असले, तरी शहरात मात्र बेकायदा बांधकाम करणाºयांना सुगीचे दिवस आले आहेत. सलग सुट्या असल्याने पालिकेची कार्यालये बंद, तर अधिकारी-कर्मचारी रजेवर गेल्याने शहरातील झोपडपट्ट्या, औद्योगिक वसाहतींमध्ये गाळे वाढवण्याची बेकायदा बांधकामे सर्रास चालली आहेत. गाळे, चाळी, झोपड्या, खोल्या आदींपासून मोठी बांधकामेसुद्धा सर्रास बांधली गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सुटीच्या दिवशी बांधकामे चालवल्याने पालिका अधिकाºयांनीदेखील त्याकडे कानाडोळा केला. शिवाय, जागरूक नागरिकांनी तक्रारी केल्याच, तरी सुटीचे कारण पुढे करत कामावर हजर झाल्यावर बघू, असे उत्तर त्यांना देण्यात आले. अनधिकृत बांधकामांमध्ये लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्यासह कथित समाजसेवकांपासून अनेकांचे हात ओले होत असतात. अनधिकृत बांधकामांप्रकरणी लाच घेताना अनेकदा लोकप्रतिनिधी, अधिकारी रंगेहाथ पकडले गेले आहेत. यावरून त्यांचे लागेबांधे स्पष्ट होतात. त्यामुळे बेकायदा बांधकामे करताना अनेकांना सांभाळून घेतले जाते. त्यामुळेच बेकायदा बांधकामांवर ठोस कारवाई होत नाही. शिवाय, याला जबाबदार असणारे अधिकारी, लोकप्रतिनिधी मोकाटच असतात. अनधिकृत बांधकामांविरोधात काही लोकप्रतिनिधींनी पत्रकार परिषद घेऊन कारवाईची मागणी केली होती. अनेकजण तक्रारीसुद्धा करतात. पण, शहरात बेकायदा बांधकामे करण्यात भागीदारी मागण्यापासून फुटाप्रमाणे आकडेमोड केली जाते. त्यामुळे राजाश्रय लाभलेल्या या बांधकामांवर कारवाईची हिम्मत पालिका अधिकारीच काय, तर आयुक्तदेखील करत नाहीत, असे सूत्रांनी सांगितले.पालिका प्रशासन सत्ताधाºयांसमोर लाचार झाले आहे. गल्लीबोळांंमध्ये फोफावलेल्या बड्या राजकीय धेंडांच्या बांधकामांना का तोडले जात नाही, याचा लेखी खुलासा पालिका प्रशासनाने प्रत्येक प्रकरणनिहाय करावा. अनधिकृत बांधकामांना पालिकेचा आशीर्वाद आहे. अनधिकृ त बांधकामांवर प्रभाग अधिकारी कारवाई करत नसतील, तर प्रशासनही त्यांना निलंबित करून फौजदारी दावा दाखल करत नाही, हे दुर्दैव आहे.- अविनाश जाधव, ठाणे जिल्हाध्यक्ष, मनसे 

टॅग्स :thaneठाणेNavi Mumbaiनवी मुंबई