शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

कचरा उचलण्यासाठी यंत्रणा अपूर्ण

By admin | Updated: December 29, 2015 00:37 IST

सिडकोने अत्याधुनिक रेल्वे स्टेशन उभारून त्यांची देखभाल करण्यासाठी सफाई ठेकेदार नियुक्त केले आहेत. परंतु उचललेला कचरा टाकण्यासाठीची यंत्रणाच तयार केली नाही. साफसफाई

नवी मुंबई : सिडकोने अत्याधुनिक रेल्वे स्टेशन उभारून त्यांची देखभाल करण्यासाठी सफाई ठेकेदार नियुक्त केले आहेत. परंतु उचललेला कचरा टाकण्यासाठीची यंत्रणाच तयार केली नाही. साफसफाई करून रेल्वे पटरीजवळच कचरा जाळला जात असून, याविषयी पर्यावरणप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. देशातील सर्वात अत्याधुनिक रेल्वे स्टेशन नवी मुंबईमध्ये आहेत. वाशी, बेलापूरमध्ये रेल्वे स्टेशनच्या इमारतीमध्ये आंतरराष्ट्रीय इन्फोटेक पार्क उभारले असून, इतर सर्वच स्टेशनमध्ये व्यावसायिक संकुल तयार केले आहे. येथील साफसफाईसाठी प्रत्येक स्टेशनमध्ये ठेकेदाराची नियुक्ती केली आहे. सफाई कामगार रेल्वे स्टेशन इमारतीची साफसफाई करतात. या ठिकाणी बसलेला कचरा उचलून तो रेल्वे पटरीच्या बाजूला टाकला जातो. वास्तविक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठीची यंत्रणा असणे आवश्यक आहे. स्टेशनच्या बाहेरील कचरा कुंडीत टाकला तरी महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून तो डंपिंग ग्राउंडवर टाकला जाईल. परंतु असे न करता सर्व कचरा रेल्वे पटरीजवळ जाळला जात आहे. कचरा जाळल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. पावसाळ्यात वाढलेले गवत सुकले असून, त्याला आग लागण्याचीही शक्यता आहे. सानपाडा रेल्वे स्टेशनमध्ये रोज सायंकाळी कचऱ्याला आग लावली जात आहे. सिडकोने या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य यंत्रणा करावी अन्यथा पर्यावरण विभागाकडे तक्रार करण्याचा इशारा रेल्वे स्टेशन इमारतीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी दिला आहे.