शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गांजा विक्रेत्यांचा मोर्चा एमआयडीसीकडे

By admin | Updated: September 17, 2016 02:26 IST

अमली पदार्थ विरोधी पथकाच्या धडक मोहिमांनंतर शहरातील गांजामाफियांचे धाबे दणाणले आहे. जूनपासून २१ जणांना गजाआड केल्यानंतर अनेकांनी व्यवसाय बंद केले

नामदेव मोरे , नवी मुंबई अमली पदार्थ विरोधी पथकाच्या धडक मोहिमांनंतर शहरातील गांजामाफियांचे धाबे दणाणले आहे. जूनपासून २१ जणांना गजाआड केल्यानंतर अनेकांनी व्यवसाय बंद केले आहेत. काही सराईत विक्रेत्यांनी एमआयडीसीत आश्रय घेतला आहे. बोनसरीसह तुर्भे स्टोअर्सला खुलेआम विक्री सुरू असून, स्थानिक पोलिसांचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. शहरातील तरुणाईला अमली पदार्थांच्या जाळ्यात अडकविणाऱ्या मृत्यूच्या सौदागरांविरोधात ‘लोकमत’ने आवाज उठविल्यानंतर अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी कारवाईचा धडाका सुरू केला. जूनमध्ये या विभागाची धुरा त्यांच्याकडे आल्यानंतर शहरात २० वर्षांतील विक्रमी कारवाई करून दाखविली आहे. परंतु स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये अधिकारी व कर्मचारी अवैध व्यवसायांविरोधात ठोस कारवाई करत नसल्यामुळे अमली पदार्थमुक्त नवी मुंबई मोहिमेला खीळ बसत आहे. शहरातील टारझन, अशोक पांडेसह पनवेलच्या राणीला गजाआड केल्यानंतर अनेक गांजामाफियांचे धाबे दणाणले आहे. नागरी वस्तीतील बहुतांश सर्व अड्डे बंद झाले आहेत. परंतु अमली पदार्थांना असलेली मागणी व प्रचंड आर्थिक उलाढाल यामुळे अनेक गुंडांचा हा पूर्ण वेळ व्यवसाय झाला आहे. त्यांनी आता एमआयडीसीमध्ये बस्तान बसविण्यास सुरवात केली आहे. एक महिन्यापूर्वी ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये एपीएमसीमध्ये आढळलेला इकबाल तुंडा आता बोनसरी गावच्या प्रवेशद्वारावर गांजा विकत आहे. पोलिसांच्या कारवाईची भीती असल्यामुळे जवळ जास्त साठा ठेवत नाही. रोडवर उभा राहून नेहमीच्या ग्राहकांनाच त्याची विक्री करत आहे. कोणी ओळखीच्या व्यक्तीने पाहिलेच तर आता मी गांजा विक्री बंद केली आहे. कधीतरी घर चालविण्यासाठी दोन चार पुड्या विकत असल्याचे तो सांगतो. एपीएमसी, नेरूळ, सीबीडी, तळोजामधील अनेक गांजा अड्ड्यांवर धाड पडली आहे. यामुळे आता तुर्भे स्टोअर्सच्या लालबत्ती परिसर, बोनसरी गाव व एमआयडीसीतील इतर गांजा विक्रेत्यांचा भाव वधारला आहे. पूर्वी ८० ते १०० रुपयांना विकली जाणारी पुडी आता १२० रुपयांना विकली जात आहे. गांजा विक्रीतील धोका वाढला आहे. तुम्ही नियमित ग्राहक असल्यामुळे तुमच्यासाठी रिस्क घेत असल्याचे सांगून जादा पैसे वसूल केले जात आहेत. अ‍ॅक्टिव्हावरून एक जण एमआयडीसीतील गांजा विके्रत्यांना रोज सकाळी गांजा पुरवठा करतो. मागणी असेल त्याप्रमाणे पुरवठा सुरू आहे. बोनसरीमधील अनेक नागरिकांना अ‍ॅक्टिव्हाचा नंबरही पाठ झाला आहे. गांजा विक्री कुठे सुरू आहे व कोण करते याची सर्व माहिती नागरिकांना आहे. मग स्थानिक पोलिसांना त्याची माहिती कशी नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलीस दुर्लक्ष करत असल्यामुळेच अवैध व्यवसाय सुरू असल्याचेही नागरिक खुलेआम बोलू लागले आहेत.