शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

माथेरानच्या रोपवेचे काम लवकरच लागणार मार्गी

By admin | Updated: April 10, 2017 06:02 IST

येथील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला महत्त्वाकांक्षी रोपवे प्रकल्प लवकरच मार्गी लागणार असल्याने

मुकुंद रांजणे / माथेरानयेथील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला महत्त्वाकांक्षी रोपवे प्रकल्प लवकरच मार्गी लागणार असल्याने पर्यटकांना ही पर्वणीच ठरणार आहे. त्यामुळे स्थानिकांच्या व्यवसायात भर पडण्याबरोबरच सर्वसामान्य मोलमजुरांना देखील आगामी काळ सुगीचा ठरणार आहे. यामुळे येथील स्थानिक नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.मागील काळात या अत्यावश्यक प्रकल्पात खोडा घालण्याचे काम काही संस्थांनी, तसेच तालुक्यातीलचकाही राजकीय मंडळींनी केले होते. मात्र, या सर्वच विरोधांना तिलांजली देत येथील सामाजिक, राजकीय मंडळींनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे आता अल्पावधीतच रोपवेचे काम मार्गी लागणार असल्याने स्थानिकांसह पर्यटकांमध्ये एकूणच आनंदाचे वातावरण दिसत आहे. या प्रकल्पाची लांबी ३३०० मीटर इतकी असून, उंची ८५० मीटर इतकी असणार आहे. या प्रकल्पासाठी जवळपास दोनशे कोटी रु पये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे सदरचा रोपवे हा आशिया खंडातील सर्वात मोठा रोपवे ठरणार असल्याचे बोलले जात आहे.हा मार्ग कर्जत येथील भिवपुरी (डिकसळ) येथून माधवजी पॉइंटपर्यंत येणार आहे.टाटा समूहांच्या माध्यमातून हे काम मार्गी लागणार असून, याबाबत मुंबई महानगर विकास प्राधिकरण हे यासाठी तांत्रिकदृष्ट्या सहकार्य करणार आहे. यासाठी मागील आठवड्यात एमएमआरडीएचे आयुक्त मदान व अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांच्या कार्यालयात याविषयी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यामध्ये मुंबईच्या घाटकोपर - नवी मुंबईसह भिवपुरी - माथेरान रोपवे प्रकल्प पुढील तीन महिन्यांत मार्गी लागतील याची सविस्तर माहिती दिली. माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांच्या विनंतीवरून गेल्या वर्षी मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण दराडे यांनी रोपवेसंदर्भात टाटा कंपनीचे अधिकारी हर्षवर्धन गजभिये व कपूर यांच्यासोबत मंत्रालयात बैठक आयोजित केली होती. त्यावेळी सहा महिन्यांची मुदत मागितली होती. आता सर्व परवानग्या प्राप्त झाल्याने लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याची टाटा कंपनीकडून सांगण्यात आले.रायगड जिल्ह्यातील हा प्रथमच एवढा मोठा प्रकल्प उभा राहात असून माथेरानचे खरे वैभव पर्यटकांच्या दृष्टिक्षेपात येणार आहे. हा प्रवास करताना या माध्यमातून माथेरानच्या चतु:सीमेकडील पॉइंट्सची नयनरम्य दृश्ये न्याहाळता येतील, तसेच पर्यटकांची पैसा व वेळेची बचत होऊन पर्यटन व्यवसाय एकंदरीतच वृद्धिंगत होईल, असे जाणकारांचे मत आहे.माथेरानकरांची प्रतीक्षा संपलीगेल्या वीस वर्षांपासून माथेरानकर प्रतीक्षेत होते. तो प्रकल्प आता मार्गी लागणार असल्याने एक उत्तम पर्यायी मार्गाची व्यवस्था या निमित्ताने होणार आहे.केंद्र सरकारकडून परवानग्या येणे बाकी होते. आता सर्व परवानग्या प्राप्त झाल्याने लवकरच कामाला सुरु वात होणार असल्याची टाटा कंपनीकडून सांगण्यात आले. हा प्रकल्प पूर्ण होण्यास दीड वर्षाचा कालावधी लागणार असून पुढील तीन महिन्यांत कामाला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे.रोपवेच्या माध्यमातून येथे वाहतुकीची एक पर्यायी व्यवस्था होणार आहे. त्यामुळे साहजिकच पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होऊन सर्वांचीच उत्पन्नाच्या बाबतीत प्रगती होईल. हा प्रकल्प मार्गी लागल्यावर प्रथमत: स्थानिक भूमिपुत्रांना यामध्ये कामावर समाविष्ट केल्यास बेरोजगार मुलांना रोजगार उपलब्ध होईल.-प्रेरणा सावंत, नगराध्यक्षा, माथेरान नगरपरिषद