शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

मसाला व्यापाऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे धाव

By admin | Updated: June 23, 2016 03:40 IST

एपीएमसीच्या मसाला मार्केटमधील अतिक्रमणावर महापालिकेने सुरू केलेली कारवाई थांबविण्यासाठी व्यापाऱ्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे.

नवी मुंबई : एपीएमसीच्या मसाला मार्केटमधील अतिक्रमणावर महापालिकेने सुरू केलेली कारवाई थांबविण्यासाठी व्यापाऱ्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे. एपीएमसीच्या धोरणाप्रमाणे दिलेल्या वाढीव एफएसआयच्या कक्षेत बसणारी बांधकामे नियमित करावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. मंजूर एफएसआयव्यतिरिक्त बांधलेल्या पोटमाळ्यांना व इतर बांधकामांविषयी मात्र काहीही आश्वासन दिले नसल्याने त्याला अभय दिले जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या मसाला व्यापाऱ्यांनी मोठ्याप्रमाणात अनधिकृत बांधकाम केले आहे. व्यापाऱ्यांचे अतिक्रमण पाडण्याचे आदेश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत. पालिकेने ३१ व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांचे गाळे सील केले आहेत. पालिकेच्या धडक कारवाईमुळे व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. मार्केटमधील अनधिकृत बांधकामांना अभय देणाऱ्यांवरही कारवाईची मागणी होवू लागली आहे. पालिका आयुक्त कारवाईवर ठाम असल्यामुळे व्यापाऱ्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धाव घेतली आहे. व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, आमदार नरेंद्र पाटील, मोहन गुरनानी, नवी मुंबईचे माजी उपमहापौर अनिल कौशिक व इतर पदाधिकारी उपस्थित होते. महापालिकेने सुरू केलेल्या कारवाईविषयी मुख्यमंत्र्यांना माहिती देण्यात आली. एपीएमसीने वाढीव एफएसआय मंजूर केला आहे. यामुळे व्यापाऱ्यांनी केलेले बांधकाम नियमित करता येवू शकते असे निदर्शनास आणून दिले. मुख्यमंत्र्यांनी याविषयी माहिती घेवून मंजूर नकाशाप्रमाणे व एफएसआयच्या कक्षेत बसणारे बांधकाम नियमित करण्याविषयी कार्यवाही सुरू करण्यात यावी असे आश्वासन दिले असल्याचे समजते. परंतु वाढीव एफएसआयपेक्षा जास्त असलेल्या बांधकामांविषयी कोणतेही आश्वासन दिलेले नाही. अनधिकृत बांधकाम वाचविण्यासाठी व्यापाऱ्यांची धडपड सुरू आहे. न्यायालयापासून राजकीय स्तरावर या संकटातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांनी वाढीव एफएसआयच्या कक्षेतील बांधकामाविषयी सकारात्मक दृष्टिकोन जाहीर केला असला तरी पोटमाळे व इतर बांधकामांविषयी काहीच आश्वासन न दिल्याने कारवाईचे संकट अद्याप टळलेले नाही. वास्तवीक नियमापेक्षाही दुप्पट बांधकाम अनेक व्यापाऱ्यांनी केले असून त्यावर कारवाईचे संकट कायम आहे. महापालिका प्रशासन नक्की काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, ३१ गाळ्यांचे सील काढण्यासाठी व्यापाऱ्यांनी न्यायालयातही धाव घेतली आहे. सील काढण्यासाठी परवानगी दिल्याची चर्चा मार्केटमध्ये आहे. परंतु बुधवारी सायंकाळपर्यंत कोणत्याच गाळ्याचे सील काढण्यात आले नव्हते.