शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

बाजार समितीचा नवी मुंबईकरांच्या जीवाशी खेळ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 01:13 IST

गर्दीचा महापूर : भाजीसह फळ मार्केटमुळे शहरात कोरोनाचा स्फोट : मार्केटमध्ये पहाटे चक्काजाम

नामदेव मोरेलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे भाजीपाला व फळ मार्केट कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. अनेक प्रतिष्ठित व्यापारी व कामगारांचा मृत्यू झाल्यानंतरही मार्केटमधील गर्दी कमी केली जात नाही. दोन्ही मार्केटमध्ये गर्दीचा महापूर येत असून, सोशल डिस्टन्सिंग, मास्क व संचारबंदीचे नियम धाब्यावर बसविले जात आहेत. मार्केटमुळे शहरातही कोरोनाचा झपाट्याने फैलाव होत असून महानगरपालिका, पोलीस व बाजार समिती प्रशासनाने दोन्ही ठिकाणी कडक निर्बंध लादले नाहीत तर नवी मुंबईतील कोरोनाची स्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.            नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. प्रतिदिन १ हजारपेक्षा जास्त रुग्ण वाढत असून, ५ ते ९ जणांचा मृत्यू होत आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली आहे. महानगरपालिका व पोलीस प्रशासन शहरातील कोणत्याही दुकानासमोर पाच पेक्षा जास्त ग्राहक दिसले तर त्यांना ५ हजारपासून १५ हजारपर्यंत दंड आकारत आहेत. रोडवरून चालताना एका व्यक्तीनेही मास्क घातला नसेल तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई होत आहे; परंतु बाजार समितीच्या पाच मार्केटमध्ये प्रतिदिन ६० ते ८० हजारांची गर्दी हाेत आहे. यांमधील जवळपास २५ ते ३० हजारांची गर्दी फक्त भाजीपाला व फळ मार्केटमध्ये होत आहे. सोमवारी फळ मार्केटमध्ये तब्बल ६३६ वाहनांची आवक झाली. मार्केटमध्ये वाहने उभी करण्यासाठीही जागा नव्हती. सर्व विंगमध्ये चक्काजामची स्थिती झाली होती.            भाजीपाला मार्केटमध्येही सोमवारी ५४१ वाहनांची गर्दी झाली. मार्केटमध्ये चालण्यासाठीही जागा नव्हती. प्रत्येक विंगमध्ये अत्यंत दाटी-वाटीने व्यापर केला जात होता. डी विंगमध्ये सर्व नियम धाब्यावर बसविण्यात आले होते. सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझरचा वापर यांपैकी कोणत्याच नियमांचे पालन केले जात नव्हते. मार्केटच्या बाहेर वाहतूक पोलीस चौकी ते माथाडी भवन रोडवरही चक्काजाम झाले होते. वाहतूक ठप्प झाली होती.

डी विंगमध्ये अनधिकृत व्यापारभाजी मार्केटच्या डी विंगमध्ये सर्वाधिक गर्दी होत आहे. त्या ठिकाणी अनधिकृत किरकोळ विक्री केली जात आहे. परवाना नसणारांना पोटभाडेकरू म्हणून व्यापार करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे येथे प्रचंड गर्दी होत असून, कोरोनाचा फैलाव वाढत आहे.

आवक मर्यादित हवीबाजार समितीमध्ये गर्दी कमी करण्यासाठी प्रत्येक मार्केटमधील आवक यावर निर्बंध लादणे आवश्यक आहेत. जास्तीत जास्त माल मार्केटमध्ये न आणता थेट ग्राहकांपर्यंत पाठविणे आवश्यक आहे. २०० ते ३०० पेक्षा जास्त वाहनांना मार्केटमध्ये प्रवेश बंद करणे आवश्यक आहे. कोरोनाविषयी नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.

मनपासह पोलीस आयुक्तांचेही दुर्लक्षबाजार समितीच्या भाजीपाला व फळ मार्केटमध्ये पहाटे सहा ते नऊ या वेळेत चक्काजाम होत आहे. दोन मार्केटमध्ये २५ ते ३० हजार नागरिकांचा जमाव व्यापारासाठी एकत्र येत आहे. कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसविले जात आहेत. शहरात सर्वसामान्य नागरिक व छोट्या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाईचे आदेश देणारे मनपा आयुक्त अभिजीत बांगर व पोलीस आयुक्त बी. के. सिंह बाजार समितीमधील नियम मोडणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करत नाहीत. यामुळे नागरिकांनीही नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. नियम न पाळणारांचे गाळे सील करण्याची मागणीही होत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस