शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

बाजार समितीचा नवी मुंबईकरांच्या जीवाशी खेळ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 01:13 IST

गर्दीचा महापूर : भाजीसह फळ मार्केटमुळे शहरात कोरोनाचा स्फोट : मार्केटमध्ये पहाटे चक्काजाम

नामदेव मोरेलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे भाजीपाला व फळ मार्केट कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. अनेक प्रतिष्ठित व्यापारी व कामगारांचा मृत्यू झाल्यानंतरही मार्केटमधील गर्दी कमी केली जात नाही. दोन्ही मार्केटमध्ये गर्दीचा महापूर येत असून, सोशल डिस्टन्सिंग, मास्क व संचारबंदीचे नियम धाब्यावर बसविले जात आहेत. मार्केटमुळे शहरातही कोरोनाचा झपाट्याने फैलाव होत असून महानगरपालिका, पोलीस व बाजार समिती प्रशासनाने दोन्ही ठिकाणी कडक निर्बंध लादले नाहीत तर नवी मुंबईतील कोरोनाची स्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.            नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. प्रतिदिन १ हजारपेक्षा जास्त रुग्ण वाढत असून, ५ ते ९ जणांचा मृत्यू होत आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली आहे. महानगरपालिका व पोलीस प्रशासन शहरातील कोणत्याही दुकानासमोर पाच पेक्षा जास्त ग्राहक दिसले तर त्यांना ५ हजारपासून १५ हजारपर्यंत दंड आकारत आहेत. रोडवरून चालताना एका व्यक्तीनेही मास्क घातला नसेल तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई होत आहे; परंतु बाजार समितीच्या पाच मार्केटमध्ये प्रतिदिन ६० ते ८० हजारांची गर्दी हाेत आहे. यांमधील जवळपास २५ ते ३० हजारांची गर्दी फक्त भाजीपाला व फळ मार्केटमध्ये होत आहे. सोमवारी फळ मार्केटमध्ये तब्बल ६३६ वाहनांची आवक झाली. मार्केटमध्ये वाहने उभी करण्यासाठीही जागा नव्हती. सर्व विंगमध्ये चक्काजामची स्थिती झाली होती.            भाजीपाला मार्केटमध्येही सोमवारी ५४१ वाहनांची गर्दी झाली. मार्केटमध्ये चालण्यासाठीही जागा नव्हती. प्रत्येक विंगमध्ये अत्यंत दाटी-वाटीने व्यापर केला जात होता. डी विंगमध्ये सर्व नियम धाब्यावर बसविण्यात आले होते. सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझरचा वापर यांपैकी कोणत्याच नियमांचे पालन केले जात नव्हते. मार्केटच्या बाहेर वाहतूक पोलीस चौकी ते माथाडी भवन रोडवरही चक्काजाम झाले होते. वाहतूक ठप्प झाली होती.

डी विंगमध्ये अनधिकृत व्यापारभाजी मार्केटच्या डी विंगमध्ये सर्वाधिक गर्दी होत आहे. त्या ठिकाणी अनधिकृत किरकोळ विक्री केली जात आहे. परवाना नसणारांना पोटभाडेकरू म्हणून व्यापार करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे येथे प्रचंड गर्दी होत असून, कोरोनाचा फैलाव वाढत आहे.

आवक मर्यादित हवीबाजार समितीमध्ये गर्दी कमी करण्यासाठी प्रत्येक मार्केटमधील आवक यावर निर्बंध लादणे आवश्यक आहेत. जास्तीत जास्त माल मार्केटमध्ये न आणता थेट ग्राहकांपर्यंत पाठविणे आवश्यक आहे. २०० ते ३०० पेक्षा जास्त वाहनांना मार्केटमध्ये प्रवेश बंद करणे आवश्यक आहे. कोरोनाविषयी नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.

मनपासह पोलीस आयुक्तांचेही दुर्लक्षबाजार समितीच्या भाजीपाला व फळ मार्केटमध्ये पहाटे सहा ते नऊ या वेळेत चक्काजाम होत आहे. दोन मार्केटमध्ये २५ ते ३० हजार नागरिकांचा जमाव व्यापारासाठी एकत्र येत आहे. कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसविले जात आहेत. शहरात सर्वसामान्य नागरिक व छोट्या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाईचे आदेश देणारे मनपा आयुक्त अभिजीत बांगर व पोलीस आयुक्त बी. के. सिंह बाजार समितीमधील नियम मोडणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करत नाहीत. यामुळे नागरिकांनीही नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. नियम न पाळणारांचे गाळे सील करण्याची मागणीही होत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस