शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅपिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
2
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
3
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
4
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
5
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
6
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
7
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
8
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
9
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
10
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
11
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
12
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
13
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
14
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
15
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
16
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
17
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
18
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
19
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
20
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट

मराठा समाजाला वर्षानुवर्ष आरक्षणापासून वंचित ठेवले, नरेंद्र पाटील यांचा आरोप :

By नामदेव मोरे | Updated: March 23, 2024 18:06 IST

माथाडी चळवळही अडचणीत आल्याची खंत

नवी मुंबई : मराठा समाजाला वर्षानुवर्ष आरक्षणापासून वंचीत ठेवण्यात आले. यामुळे ग्रामीण भागातील गरीब समाजबांधवांचे नुकसान झाले. मराठा आरक्षणाच्या चळवळीमध्ये माथाडी कामगारांचे महत्वाचे योगदान राहिले आहे. भविष्यातही समाजाच्या प्रश्नांसाठीच्या आंदोलनामध्ये कामगारांचा सहभाग असेल असे मत माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केले आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील माथाडी भवनमध्ये अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त कामगारांच्या मेळाव्याचे आयाेजन केले होते. यावेळी नरेंद्र पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अण्णासाहेब पाटील यांनी मराठा महासंघाच्या माध्यमातून लढा उभारला होता. २२ मार्च १९८२ ला आर्थिक निकषावर आरक्षण देण्याच्या मागणीसाठी विधीमंडळावर मोर्चा काढला. सरकारने मागणीची दखल घेतली नसल्यामुळे दुसऱ्यादिवशी अण्णासाहेबांनी प्राणाची आहुती दिली. मराठा आरक्षणासाठी हौतात्म्य पत्करले. वेळेत आरक्षण न दिल्यामुळे ग्रामीण भागातील गरीब मराठा समाजाचे नुकसान झाले. मराठा आरक्षणासाठीच्या प्रत्येक लढ्यात माथाडी कामगारांनी योगदान दिले आहे व पुढेही योगदान दिले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

अण्णासाहेब पाटील यांनी संघर्ष करून माथाडी कायदा करण्यास सरकारला भाग पाडले. परंतु आता माथाडी कायदा अडचणीत आला आहे. कामगारांची पिळवणूक करणाऱ्या खंडणीखोर संघटना तयार झाल्या आहेत. कायदा व संघटना टिकविण्यासाठी भविष्यात संघर्ष करावा लागणार असल्याचेही नरेंद्र पाटील यांनी स्पष्ट केले. आमदार शशिकांत शिंदे यांनीही माथाडी कायदा टिकविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. सर्वांनी एकजुट होवून लढा द्यावा लागणार आहे. बाजार समितीचे अधिकार कमी केले जात आहेत. कायदा कमकुवत केला जात असून सर्वांनी एक होण्याची वेळ आली असल्याचे सांगितले. यावेळी अण्णासाहेब पाटील पुण्यतिथीनिमित्त आयोजित प्रश्नमंजुशा स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी एकनाथ जाधव, चंद्रकांत पाटील, दिलीप खोंड, आनंद पाटील, रविकांत पाटील, भारतीताई पाटील, रमेश पाटील, पोपटराव देशमुख व इतर मान्यवर उपस्थित होते.

अधिकारी पैसे घेतल्याशिवाय काम करत नाहीतमाथाडी बोर्डातील अधिकारी अडवणुकीचे काम करत आहेत. पैसे घेतल्याशिवाय सर्वसामान्य कामगारांची कामे केली जात नाहीत. पैसा फेको व तमाशा देखो अशी स्थिती सुरू असल्याचा आरोप नरेंद्र पाटील यांनी केला. जे पैसे देणार त्यांच्या बाजूने निर्णय देण्याचा प्रकार गंभीर असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई