शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाजाला वर्षानुवर्ष आरक्षणापासून वंचित ठेवले, नरेंद्र पाटील यांचा आरोप :

By नामदेव मोरे | Updated: March 23, 2024 18:06 IST

माथाडी चळवळही अडचणीत आल्याची खंत

नवी मुंबई : मराठा समाजाला वर्षानुवर्ष आरक्षणापासून वंचीत ठेवण्यात आले. यामुळे ग्रामीण भागातील गरीब समाजबांधवांचे नुकसान झाले. मराठा आरक्षणाच्या चळवळीमध्ये माथाडी कामगारांचे महत्वाचे योगदान राहिले आहे. भविष्यातही समाजाच्या प्रश्नांसाठीच्या आंदोलनामध्ये कामगारांचा सहभाग असेल असे मत माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केले आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील माथाडी भवनमध्ये अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त कामगारांच्या मेळाव्याचे आयाेजन केले होते. यावेळी नरेंद्र पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अण्णासाहेब पाटील यांनी मराठा महासंघाच्या माध्यमातून लढा उभारला होता. २२ मार्च १९८२ ला आर्थिक निकषावर आरक्षण देण्याच्या मागणीसाठी विधीमंडळावर मोर्चा काढला. सरकारने मागणीची दखल घेतली नसल्यामुळे दुसऱ्यादिवशी अण्णासाहेबांनी प्राणाची आहुती दिली. मराठा आरक्षणासाठी हौतात्म्य पत्करले. वेळेत आरक्षण न दिल्यामुळे ग्रामीण भागातील गरीब मराठा समाजाचे नुकसान झाले. मराठा आरक्षणासाठीच्या प्रत्येक लढ्यात माथाडी कामगारांनी योगदान दिले आहे व पुढेही योगदान दिले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

अण्णासाहेब पाटील यांनी संघर्ष करून माथाडी कायदा करण्यास सरकारला भाग पाडले. परंतु आता माथाडी कायदा अडचणीत आला आहे. कामगारांची पिळवणूक करणाऱ्या खंडणीखोर संघटना तयार झाल्या आहेत. कायदा व संघटना टिकविण्यासाठी भविष्यात संघर्ष करावा लागणार असल्याचेही नरेंद्र पाटील यांनी स्पष्ट केले. आमदार शशिकांत शिंदे यांनीही माथाडी कायदा टिकविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. सर्वांनी एकजुट होवून लढा द्यावा लागणार आहे. बाजार समितीचे अधिकार कमी केले जात आहेत. कायदा कमकुवत केला जात असून सर्वांनी एक होण्याची वेळ आली असल्याचे सांगितले. यावेळी अण्णासाहेब पाटील पुण्यतिथीनिमित्त आयोजित प्रश्नमंजुशा स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी एकनाथ जाधव, चंद्रकांत पाटील, दिलीप खोंड, आनंद पाटील, रविकांत पाटील, भारतीताई पाटील, रमेश पाटील, पोपटराव देशमुख व इतर मान्यवर उपस्थित होते.

अधिकारी पैसे घेतल्याशिवाय काम करत नाहीतमाथाडी बोर्डातील अधिकारी अडवणुकीचे काम करत आहेत. पैसे घेतल्याशिवाय सर्वसामान्य कामगारांची कामे केली जात नाहीत. पैसा फेको व तमाशा देखो अशी स्थिती सुरू असल्याचा आरोप नरेंद्र पाटील यांनी केला. जे पैसे देणार त्यांच्या बाजूने निर्णय देण्याचा प्रकार गंभीर असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई