शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'व्होट क्रॉसिंग'वर सर्वात मोठा दावा
2
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
3
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
4
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
5
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
6
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
7
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
8
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
9
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
10
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
11
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
12
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
13
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
14
Thane Fraud: पोलिसालाही ‘तो’ शेअर्स महागात, कोट्यवधीचा ऑनलाइन डल्ला
15
IPS Archit Chandak : देशसेवेचं स्वप्न! तब्बल ३५ लाखांचं पॅकेज नाकारलं अन् पहिल्याच प्रयत्नात IPS, पत्नीही आहे IAS
16
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
17
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
18
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
19
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
20
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या

मराठा समाजाला वर्षानुवर्ष आरक्षणापासून वंचित ठेवले, नरेंद्र पाटील यांचा आरोप :

By नामदेव मोरे | Updated: March 23, 2024 18:06 IST

माथाडी चळवळही अडचणीत आल्याची खंत

नवी मुंबई : मराठा समाजाला वर्षानुवर्ष आरक्षणापासून वंचीत ठेवण्यात आले. यामुळे ग्रामीण भागातील गरीब समाजबांधवांचे नुकसान झाले. मराठा आरक्षणाच्या चळवळीमध्ये माथाडी कामगारांचे महत्वाचे योगदान राहिले आहे. भविष्यातही समाजाच्या प्रश्नांसाठीच्या आंदोलनामध्ये कामगारांचा सहभाग असेल असे मत माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केले आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील माथाडी भवनमध्ये अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त कामगारांच्या मेळाव्याचे आयाेजन केले होते. यावेळी नरेंद्र पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अण्णासाहेब पाटील यांनी मराठा महासंघाच्या माध्यमातून लढा उभारला होता. २२ मार्च १९८२ ला आर्थिक निकषावर आरक्षण देण्याच्या मागणीसाठी विधीमंडळावर मोर्चा काढला. सरकारने मागणीची दखल घेतली नसल्यामुळे दुसऱ्यादिवशी अण्णासाहेबांनी प्राणाची आहुती दिली. मराठा आरक्षणासाठी हौतात्म्य पत्करले. वेळेत आरक्षण न दिल्यामुळे ग्रामीण भागातील गरीब मराठा समाजाचे नुकसान झाले. मराठा आरक्षणासाठीच्या प्रत्येक लढ्यात माथाडी कामगारांनी योगदान दिले आहे व पुढेही योगदान दिले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

अण्णासाहेब पाटील यांनी संघर्ष करून माथाडी कायदा करण्यास सरकारला भाग पाडले. परंतु आता माथाडी कायदा अडचणीत आला आहे. कामगारांची पिळवणूक करणाऱ्या खंडणीखोर संघटना तयार झाल्या आहेत. कायदा व संघटना टिकविण्यासाठी भविष्यात संघर्ष करावा लागणार असल्याचेही नरेंद्र पाटील यांनी स्पष्ट केले. आमदार शशिकांत शिंदे यांनीही माथाडी कायदा टिकविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. सर्वांनी एकजुट होवून लढा द्यावा लागणार आहे. बाजार समितीचे अधिकार कमी केले जात आहेत. कायदा कमकुवत केला जात असून सर्वांनी एक होण्याची वेळ आली असल्याचे सांगितले. यावेळी अण्णासाहेब पाटील पुण्यतिथीनिमित्त आयोजित प्रश्नमंजुशा स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी एकनाथ जाधव, चंद्रकांत पाटील, दिलीप खोंड, आनंद पाटील, रविकांत पाटील, भारतीताई पाटील, रमेश पाटील, पोपटराव देशमुख व इतर मान्यवर उपस्थित होते.

अधिकारी पैसे घेतल्याशिवाय काम करत नाहीतमाथाडी बोर्डातील अधिकारी अडवणुकीचे काम करत आहेत. पैसे घेतल्याशिवाय सर्वसामान्य कामगारांची कामे केली जात नाहीत. पैसा फेको व तमाशा देखो अशी स्थिती सुरू असल्याचा आरोप नरेंद्र पाटील यांनी केला. जे पैसे देणार त्यांच्या बाजूने निर्णय देण्याचा प्रकार गंभीर असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई