शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
2
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
3
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
4
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
5
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
6
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
7
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
8
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
9
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
10
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
11
Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 
12
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव
13
GST कपातीचा परिणाम; ऑक्टोबरमध्ये महागाई दर 10 वर्षांतील नीचांकी पातळीवर
14
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
15
थरारक! लग्नातच नवरदेवावर चाकूने जीवघेणा हल्ला; ड्रोनद्वारे आरोपीचा २ किमी पाठलाग केला, मग...
16
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
17
Astro Tips: दर गुरुवारी औदुंबराला पाणी घालण्याचे आध्यात्मिक आणि वैद्यकीय लाभ वाचून चकित व्हाल!
18
अरे व्वा...! या ढासू 7-सीटर SUV वर तब्बल ₹1.50 लाखांचा कॅश डिस्काउंट; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
19
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
20
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?

महाराष्ट्रात वर्षभरात 1494 बॉयलरची निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 07:41 IST

१०७ बॉयलरची केली निर्यात:अपघाताचे प्रमाण कमी करण्यातही यश

नामदेव मोरे

नवी मुंबई : उद्योगांचे हृदय म्हणून बॉयलरची ओळख आहे. बहुतांश प्रमुख उद्योगांमध्ये याचा उपयोग केला जातो. महाराष्ट्रात ४५०० बाॅयलरचा वापर सुरू असून, आता निर्मितीमध्येही राज्याने आघाडी घेतली आहे. मागील वर्षभरात तब्बल १४०४ बॉयलरची निर्मिती करण्यात आली असून, त्यामधील १०७ निर्यात करण्यात आले आहेत. 

बॉयलर उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाच्या बाष्पके विभागाच्या माध्यमातून नवी मुंबईमध्ये जगातील सर्वात मोठे बॉयलर इंडिया २०२२ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. १४ ते १६ सप्टेंबरला झालेल्या प्रदर्शनामध्ये २८० पेक्षा जास्त कंपन्यांनी सहभाग घेतला होता. तीन दिवसामध्ये ३६ हजार नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट दिली. बॉयलर उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी या शिबिराचा उपयोग होईल असे मानले जात आहे. देशात १५२ वर्षापासून बॉयलरचा उपयोग सुरू आहे. कारखान्यांमध्ये बॉयलरचा वापर केला जातो. सुरुवातीला बॉयलरचे स्फोट होण्याचे प्रमाण जास्त होते. हे अपघात कमी करण्यासाठी शासनाने वेळोवेळी कायदे करून व त्रुटी कमी करून अपघात कमी करण्यावर लक्ष दिले आहे. महाराष्ट्र सरकारने कामगार विभागाच्या अखत्यारीत बाष्पके विभाग सुरू केला आहे. या विभागाच्या माध्यमातून बॉयलर उद्योगाला प्रोत्साहन देण्यापासून सुरक्षेसाठी उपाययोजना राबविल्या जात आहेत. राज्यात २००३-०४ या आर्थिक वर्षात ५५७ बॉयलरची निर्मिती केली होती. 

३० मार्गदर्शक झाली शिबिरेबॉयलर उद्योगामधील नवीन तंत्रज्ञान त्याचा सुरक्षित वापर याविषयी माहिती सर्वांना व्हावी यासाठी शासनाच्या माध्यमातून जगातील सर्वात मोठे बॉयलर प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनामध्ये बॉयलरचे मॉडेल पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. याशिवाय ३० मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन केले होते, अशी माहिती बाष्पकेचे संचालक धवल अंतापूरकर यांनी दिली. 

प्रदर्शनाचे फलितनवी मुंबईमधील सिडको प्रदर्शन केंद्रात आयोजित केलेल्या बाॅयलर प्रदर्शनामध्ये तीन दिवसांमध्ये तब्बल ३६ हजार नागरिकांनी भेट दिली. ३० चर्चासत्रांमध्ये ५५ तज्ज्ञ वक्त्यांनी मार्गदर्शन केले. या क्षेत्रातील २५०० मान्यवरांनी या चर्चासत्राचा लाभ घेतला. सहा देशांच्या वाणिज्यदूतांनी प्रदर्शनाला भेट दिली.

बॉयलर पार्कचे आश्वासनप्रदर्शनाच्या उद्घाटनाला १४ सप्टेंबरला उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित होते. त्यांनी महाराष्ट्रात बॉयलर उद्योगाला चालना देण्यासाठी सरकार प्रयत्न करेल व भविष्यात बॉयलर पार्क उभारण्यासही सहकार्य करेल, असे आश्वासन दिले आहे.

१०० पेक्षा जास्त महाराष्ट्रात विविध प्रकारच्या बॉयलरची निर्मिती करणारे कारखाने

राज्यात बॉयलर अपघाताचे प्रमाणही कमी झाले आहे. सद्यस्थितीमध्ये ०.०६ एवढे अपघाताचे प्रमाण आहे. 

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईMumbaiमुंबई