शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
2
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
3
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
4
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
5
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
6
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
7
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
8
फक्त किराणाच नाही तर मॉलमध्ये शॉपिंगपासून ते सिनेमापर्यंत या गोष्टींवर भरघोस बचत; पाहा यादी
9
Video: "मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
10
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
11
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर
12
काय आहे विमानाच्या टायरजवळची 'ती' जीवघेणी जागाा, जिथे बसून १३ वर्षांचा मुलगा अफगाणिस्तानातून भारतात आला
13
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
14
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
15
GST कमी झाला आणि AC-TV च्या विक्रीत झाली जोरदार वाढ, किराणा दुकानदारांनाही 'अच्छे दिन'
16
Kuttu Atta: नवरात्री उपवासाचं कुट्टूचं पीठ ठरलं विषारी; १५० हून अधिक लोक आजारी, रुग्णालयाबाहेर रांगा!
17
Navratri 2025: नवरात्रीत मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीला पारिजाताची फुलं वाहिल्याने होणारे लाभ 
18
ट्रम्प यांना आणखी एक धक्का! फ्रान्स पॅलेस्टिनी राष्ट्राला मान्यता देणार, मॅक्रॉन यांची मोठी घोषणा
19
₹५००० च्या SIP नं कसा बनेल ₹५ कोटींचा फंड? कमालीची आहे पद्धत, एकदा समजलात तर पैशांचं टेन्शन होईल दूर
20
१२८ किलोची वजनदार पत्नी अंगावर पडून पतीचा मृत्यू; सोशल मीडियावर पुन्हा घटना व्हायरल 

महाराष्ट्रात वर्षभरात 1494 बॉयलरची निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 07:41 IST

१०७ बॉयलरची केली निर्यात:अपघाताचे प्रमाण कमी करण्यातही यश

नामदेव मोरे

नवी मुंबई : उद्योगांचे हृदय म्हणून बॉयलरची ओळख आहे. बहुतांश प्रमुख उद्योगांमध्ये याचा उपयोग केला जातो. महाराष्ट्रात ४५०० बाॅयलरचा वापर सुरू असून, आता निर्मितीमध्येही राज्याने आघाडी घेतली आहे. मागील वर्षभरात तब्बल १४०४ बॉयलरची निर्मिती करण्यात आली असून, त्यामधील १०७ निर्यात करण्यात आले आहेत. 

बॉयलर उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाच्या बाष्पके विभागाच्या माध्यमातून नवी मुंबईमध्ये जगातील सर्वात मोठे बॉयलर इंडिया २०२२ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. १४ ते १६ सप्टेंबरला झालेल्या प्रदर्शनामध्ये २८० पेक्षा जास्त कंपन्यांनी सहभाग घेतला होता. तीन दिवसामध्ये ३६ हजार नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट दिली. बॉयलर उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी या शिबिराचा उपयोग होईल असे मानले जात आहे. देशात १५२ वर्षापासून बॉयलरचा उपयोग सुरू आहे. कारखान्यांमध्ये बॉयलरचा वापर केला जातो. सुरुवातीला बॉयलरचे स्फोट होण्याचे प्रमाण जास्त होते. हे अपघात कमी करण्यासाठी शासनाने वेळोवेळी कायदे करून व त्रुटी कमी करून अपघात कमी करण्यावर लक्ष दिले आहे. महाराष्ट्र सरकारने कामगार विभागाच्या अखत्यारीत बाष्पके विभाग सुरू केला आहे. या विभागाच्या माध्यमातून बॉयलर उद्योगाला प्रोत्साहन देण्यापासून सुरक्षेसाठी उपाययोजना राबविल्या जात आहेत. राज्यात २००३-०४ या आर्थिक वर्षात ५५७ बॉयलरची निर्मिती केली होती. 

३० मार्गदर्शक झाली शिबिरेबॉयलर उद्योगामधील नवीन तंत्रज्ञान त्याचा सुरक्षित वापर याविषयी माहिती सर्वांना व्हावी यासाठी शासनाच्या माध्यमातून जगातील सर्वात मोठे बॉयलर प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनामध्ये बॉयलरचे मॉडेल पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. याशिवाय ३० मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन केले होते, अशी माहिती बाष्पकेचे संचालक धवल अंतापूरकर यांनी दिली. 

प्रदर्शनाचे फलितनवी मुंबईमधील सिडको प्रदर्शन केंद्रात आयोजित केलेल्या बाॅयलर प्रदर्शनामध्ये तीन दिवसांमध्ये तब्बल ३६ हजार नागरिकांनी भेट दिली. ३० चर्चासत्रांमध्ये ५५ तज्ज्ञ वक्त्यांनी मार्गदर्शन केले. या क्षेत्रातील २५०० मान्यवरांनी या चर्चासत्राचा लाभ घेतला. सहा देशांच्या वाणिज्यदूतांनी प्रदर्शनाला भेट दिली.

बॉयलर पार्कचे आश्वासनप्रदर्शनाच्या उद्घाटनाला १४ सप्टेंबरला उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित होते. त्यांनी महाराष्ट्रात बॉयलर उद्योगाला चालना देण्यासाठी सरकार प्रयत्न करेल व भविष्यात बॉयलर पार्क उभारण्यासही सहकार्य करेल, असे आश्वासन दिले आहे.

१०० पेक्षा जास्त महाराष्ट्रात विविध प्रकारच्या बॉयलरची निर्मिती करणारे कारखाने

राज्यात बॉयलर अपघाताचे प्रमाणही कमी झाले आहे. सद्यस्थितीमध्ये ०.०६ एवढे अपघाताचे प्रमाण आहे. 

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईMumbaiमुंबई