शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
4
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
7
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
10
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
11
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
12
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
13
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
14
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
15
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
16
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
17
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
18
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
19
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

दक्षिणेतील आंब्याची एपीएमसीत दादागिरी! कोकणच्या हापूसची आवक झाली कमी

By नामदेव मोरे | Updated: April 14, 2023 06:18 IST

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून कोकणच्या हापूस आंब्याची आवक कमी झाली असून दक्षिणेकडील राज्यातील आवक वाढली आहे.

नवी मुंबई :

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून कोकणच्या हापूस आंब्याची आवक कमी झाली असून दक्षिणेकडील राज्यातील आवक वाढली आहे. मुंबई बाजार समितीमध्ये बदामी, लालबाग, तोतापुरी, गोळा आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली आहे. पुढील एक महिना  कोकणपेक्षा दक्षिणेकडील आंब्याचे वर्चस्व कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

मुंबई कृषी  उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी कोकणातून २६२९३ पेट्या हापूस आंब्याची आवक झाली आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळमधून ४५०७० पेट्यांची आवक झाली आहे. कोकणातून ६०४ टन व दक्षिणेकडून ७८५ टन आंब्याची आवक झाली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड परिसरातून एप्रिल महिन्यात आवक कमीच राहण्याची शक्यता आहे. मे महिन्यातही अपेक्षित आवक होणार नसल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. कोकणच्या हापूसला बाजार समितीमध्ये ३०० ते १ हजार रुपये डझन व किरकोळ मार्केटमध्ये ७०० ते १६०० रुपये डझन दराने हापूस विकला जात आहे. 

आंब्यांचे दर (प्रति किलाे)बदामी    ८०लालबाग    ५०तोतापुरी    ४०गोळा     ४० किरकोळ मार्केटमध्ये १०० ते १५० रुपये किलो दराने आंबे उपलब्ध आहेत. कर्नाटकी हापूसला होलसेल मार्केटमध्ये ८० ते १५० रुपये व किरकोळ मार्केटमध्ये १२५ ते २५० रुपये भाव मिळत आहे. यावर्षी हापूसचे पीक कमी प्रमाणात असल्यामुळे यापुढेही दक्षिणेकडील आंब्याचे बाजारपेठेवरील वर्चस्व कायम राहण्याची शक्यता आहे. 

कोकणातून प्रतिदिन २५ ते ३० हजार पेट्यांची आवक सुरू आहे. पुढील एक महिना कोकणातील आवक कमीच राहण्याची शक्यता आहे.  दक्षिणेकडील राज्यांमधून ४० ते ४५ हजार पेट्यांची आवक सुरू आहे. - संजय पानसरे, संचालक, बाजार समिती

टॅग्स :Mangoआंबा