शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
5
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
6
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
7
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
8
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
9
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
10
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
11
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
12
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
13
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
14
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
15
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
16
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
17
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
18
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
19
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
20
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा

दक्षिणेतील आंब्याची एपीएमसीत दादागिरी! कोकणच्या हापूसची आवक झाली कमी

By नामदेव मोरे | Updated: April 14, 2023 06:18 IST

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून कोकणच्या हापूस आंब्याची आवक कमी झाली असून दक्षिणेकडील राज्यातील आवक वाढली आहे.

नवी मुंबई :

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून कोकणच्या हापूस आंब्याची आवक कमी झाली असून दक्षिणेकडील राज्यातील आवक वाढली आहे. मुंबई बाजार समितीमध्ये बदामी, लालबाग, तोतापुरी, गोळा आंब्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली आहे. पुढील एक महिना  कोकणपेक्षा दक्षिणेकडील आंब्याचे वर्चस्व कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

मुंबई कृषी  उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी कोकणातून २६२९३ पेट्या हापूस आंब्याची आवक झाली आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळमधून ४५०७० पेट्यांची आवक झाली आहे. कोकणातून ६०४ टन व दक्षिणेकडून ७८५ टन आंब्याची आवक झाली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड परिसरातून एप्रिल महिन्यात आवक कमीच राहण्याची शक्यता आहे. मे महिन्यातही अपेक्षित आवक होणार नसल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. कोकणच्या हापूसला बाजार समितीमध्ये ३०० ते १ हजार रुपये डझन व किरकोळ मार्केटमध्ये ७०० ते १६०० रुपये डझन दराने हापूस विकला जात आहे. 

आंब्यांचे दर (प्रति किलाे)बदामी    ८०लालबाग    ५०तोतापुरी    ४०गोळा     ४० किरकोळ मार्केटमध्ये १०० ते १५० रुपये किलो दराने आंबे उपलब्ध आहेत. कर्नाटकी हापूसला होलसेल मार्केटमध्ये ८० ते १५० रुपये व किरकोळ मार्केटमध्ये १२५ ते २५० रुपये भाव मिळत आहे. यावर्षी हापूसचे पीक कमी प्रमाणात असल्यामुळे यापुढेही दक्षिणेकडील आंब्याचे बाजारपेठेवरील वर्चस्व कायम राहण्याची शक्यता आहे. 

कोकणातून प्रतिदिन २५ ते ३० हजार पेट्यांची आवक सुरू आहे. पुढील एक महिना कोकणातील आवक कमीच राहण्याची शक्यता आहे.  दक्षिणेकडील राज्यांमधून ४० ते ४५ हजार पेट्यांची आवक सुरू आहे. - संजय पानसरे, संचालक, बाजार समिती

टॅग्स :Mangoआंबा