शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अक्षयतृतीयेला आंब्याचा गोडवा; आवक गेली एक लाख पेटीवर

By नामदेव मोरे | Updated: May 8, 2024 20:07 IST

कोकणसह दक्षिणेतील आंब्याचाही समावेश

नवी मुंबई : अक्षयतृतीयेमुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आंब्याची आवक वाढली आहे. बुधवारी १ लाख पेटी आंबा मार्केटमध्ये दाखल झाला आहे. कोकणातून ४७ हजार व इतर राज्यातून ५३ हजार पेट्यांची आवक झाली असून बाजारभावही नियंत्रणात आले आहेत.

आंबा हंगामामध्ये गुढीपाडवा अक्षयतृतीयेच्या मुहूर्ताला विशेष महत्व असते. फेब्रुवारीपासून आंब्याची आवक होत असली तरी गुढीपाडव्यापासून आवक वाढण्यास सुरुवात होती व अक्षय तृतीयेला आवकचा विक्रम होत असतो. गत आठवड्यात आंब्याची आवक कमी झाली होती. पण दोन दिवसांपासून पुन्हा आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी १ लाख १३ हजार व बुधवारी १ लाख १ हजार पेटी आंबा बाजार समितीमध्ये दाखल झाला आहे. कोकणातून ४७३०३ पेटी हापूस आंबा विक्रीसाठी आला आहे. दक्षीणेतील राज्यांमधून ५३८४२ पेटी आंबा विक्रीसाठी आला आहे.

बाजार समितीमध्ये हापूस ३०० ते ५०० रुपये डझन व किरकोळ मार्केटमध्ये ६०० ते १ हजार रुपये डझन दराने विक्री होत आहे. कर्नाटकमधील आंब्याला प्रतीकिलो १०० ते ११० रुपये भाव मिळत आहे. कोकणच्या हापूसचा हंगाम अंतीम टप्यात आला असल्यामुळे आता इतर राज्यातील आंब्याची आवक वाढू लागली आहे. मे अखेरीस गुजरातचा आंबा येणारहापूसची आवक यापुढे कमी होईल. मे अखेरीस गुजरातचा आंबा दाखल होईल. जुनच्या पहिल्या टप्यात जुन्नरचा आंबाही मार्केटमध्ये विक्रिसाठी येईल. यानंतर उत्तरप्रदेश व इतर ठिकाणचा आंबाही ग्राहकांना उपलब्ध होणार आहे.

अक्षयतृतीयेमुळे आंब्याची चांगली आवक होत आहे. हापूससह दक्षीणेकडील राज्यातूनही आंब्याची आवक होत आहे. बाजारभावही नियंत्रणात आहेत. मे अखेरीस गुजरात व जुनमध्ये जुन्नरच्या हापूसची आवक होईल. - बाळासाहेब बेंडे, व्यापारी प्रतिनिधी

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईMangoआंबा