शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

खारघरमध्ये आंबा महोत्सव भरवणार

By admin | Updated: April 1, 2017 23:52 IST

कितीही यशाच्या उंच शिखरावर पोहोचलात तरी आपल्या मातीशी प्रामाणिक राहा. शेतकरीपुत्र म्हणून शेतकऱ्याच्या पाठीवर मायेचा हात ठेवा

पनवेल : कितीही यशाच्या उंच शिखरावर पोहोचलात तरी आपल्या मातीशी प्रामाणिक राहा. शेतकरीपुत्र म्हणून शेतकऱ्याच्या पाठीवर मायेचा हात ठेवा, असे प्रतिपादन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खारघर येथे केले. खारघर भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष लीना गरड यांनी आयोजित केलेल्या शेतकरीपुत्र मेळाव्यात ते बोलत होते. खारघरमध्ये २० दिवस आंबा महोत्सव आणि शेतकरी बाजार सुरू करणार असल्याची घोषणा त्यांनी या वेळी केली. खारघर सेक्टर १२ येथील गोखले स्कूलच्या मैदानात माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. या वेळी भाजपा जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल, बिना गोगरी, गीता चौधरी, विनोद ठाकूर, दिलीप जाधव, बिमान बोस, अमर उपाध्याय, प्रा. प्रीती ठोकले यांच्यासह पदाधिकारीसुद्धा उपस्थित होते.खोत म्हणाले, तीन वर्षांपूर्वी या शहरात शेतकऱ्यांचा नेता म्हणून आलो होतो आणि आज मंत्री म्हणून शेतकरी पुत्रांकडून माझा सन्मान होत आहे. हा सन्मान माझा घरचा सन्मान असून तो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या चरणी अर्पण करतो. शेतकऱ्यांचा आणि जवानांचा सन्मान करणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, असे ते या वेळी म्हणाले. मरणासन्न अवस्थेत असताना माझ्या वडिलांनी मला संदेश दिला की माझी काळजी न करता शेतकऱ्यांची काळजी घे, तोच संदेश आईनेही दिलाय, म्हणूनच बळीराजाची शपथ घेऊन, ‘जय जवान जय किसान’चा नारा मंत्रिपदाची शपथ घेताना दिला आहे. कोकणातील शेतकऱ्यांसाठी फळप्रक्रिया केंद्रांना अर्थसंकल्पात मोठी तरतूद केली आहे. भातप्रक्रिया केंद्रांना प्रोत्साहन, शेतकरी बाजार आणि आंबा महोत्सव यावर भर देण्याचा संकल्पही त्यांनी सांगितला. (प्रतिनिधी)