शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

खारघरमध्ये आंबा महोत्सव भरवणार

By admin | Updated: April 1, 2017 23:52 IST

कितीही यशाच्या उंच शिखरावर पोहोचलात तरी आपल्या मातीशी प्रामाणिक राहा. शेतकरीपुत्र म्हणून शेतकऱ्याच्या पाठीवर मायेचा हात ठेवा

पनवेल : कितीही यशाच्या उंच शिखरावर पोहोचलात तरी आपल्या मातीशी प्रामाणिक राहा. शेतकरीपुत्र म्हणून शेतकऱ्याच्या पाठीवर मायेचा हात ठेवा, असे प्रतिपादन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी खारघर येथे केले. खारघर भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष लीना गरड यांनी आयोजित केलेल्या शेतकरीपुत्र मेळाव्यात ते बोलत होते. खारघरमध्ये २० दिवस आंबा महोत्सव आणि शेतकरी बाजार सुरू करणार असल्याची घोषणा त्यांनी या वेळी केली. खारघर सेक्टर १२ येथील गोखले स्कूलच्या मैदानात माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. या वेळी भाजपा जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल, बिना गोगरी, गीता चौधरी, विनोद ठाकूर, दिलीप जाधव, बिमान बोस, अमर उपाध्याय, प्रा. प्रीती ठोकले यांच्यासह पदाधिकारीसुद्धा उपस्थित होते.खोत म्हणाले, तीन वर्षांपूर्वी या शहरात शेतकऱ्यांचा नेता म्हणून आलो होतो आणि आज मंत्री म्हणून शेतकरी पुत्रांकडून माझा सन्मान होत आहे. हा सन्मान माझा घरचा सन्मान असून तो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या चरणी अर्पण करतो. शेतकऱ्यांचा आणि जवानांचा सन्मान करणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, असे ते या वेळी म्हणाले. मरणासन्न अवस्थेत असताना माझ्या वडिलांनी मला संदेश दिला की माझी काळजी न करता शेतकऱ्यांची काळजी घे, तोच संदेश आईनेही दिलाय, म्हणूनच बळीराजाची शपथ घेऊन, ‘जय जवान जय किसान’चा नारा मंत्रिपदाची शपथ घेताना दिला आहे. कोकणातील शेतकऱ्यांसाठी फळप्रक्रिया केंद्रांना अर्थसंकल्पात मोठी तरतूद केली आहे. भातप्रक्रिया केंद्रांना प्रोत्साहन, शेतकरी बाजार आणि आंबा महोत्सव यावर भर देण्याचा संकल्पही त्यांनी सांगितला. (प्रतिनिधी)