शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

कळंबोलीतील मालधक्का हरवला धुळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 23:39 IST

कळंबोली येथील मालधक्क्यावर सिमेंटीकरण नसल्याने धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे माथाडी कामगारांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे.

पनवेल : कळंबोली येथील मालधक्क्यावर सिमेंटीकरण नसल्याने धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे माथाडी कामगारांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही रेल्वेकडून उपाययोजना केल्या जात नसल्याने मंगळवारी कामगार संघटनेच्या वतीने रेल्वेच्या स्थानिक अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. मात्र, त्यांच्या अधिकार क्षेत्रात या गोष्टी येत नसल्याने मुंबई येथील डीआरएम कार्यालयात जाऊन पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे माथाडी नेते राजेंद्र बनकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.स्ट्री मार्केट परिसरात अनेक समस्या भेडसावत आहे. मंगळवारी भाजपा माथाडी कामगार संघटनेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष रामदास महानवर यांच्यासह माथाडी कामगारांनी मुख्य वाणिज्य निरीक्षक संजय गुप्ता आणि मुख्य माल पर्यवेक्षक बी. प्र. कुजुर यांची भेट घेतली आणि येथील समस्या सोडविण्याची मागणी केली.>ंनिवारा शेड धक्क्यापासून दूररेल्वेने माथाडी कामगारांकरिता निवारा शेड बांधून दिले आहे; परंतु धक्का आणि हे अंतर जास्त आहे. स्वच्छतागृहही लांब असल्याने कामगारांची गैरसोय होत असल्याचे रामदास महानवर यांनी सांगितले. रात्रीच्या वेळी अनेकदा परिसरातील दिवे बंद असतात. कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी कोणतीही खबरदारी घेण्यात आली नसल्याचे प्रशांत रणवरे यांनी सांगितले. रेल्वे धक्क्यावर ट्रक आल्याने मोठ्या प्रमाणात माती, धूळ उडते. त्यामुळे काही माथाडी कामगारांना श्वसनाचे विकार जडले आहेत, तसेच क्रेन व कंटेनरचालकांनाही तोच त्रास होत आहे. पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहाचा अभाव आहे. या ठिकाणी एक नादुरुस्त निवारा शेड असून, लवकरच जमीनदोस्त करण्यात येणार आहे.मालधक्क्यावर धुळीचे साम्राज्य आहेच. या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने क्रेन आणि कंटेनर पलटी होण्याच्या घटनाही घडल्या आहेत.>रेल्वेधक्का परिसरात काँक्रीटीकरणाचा प्रस्ताव अभियांत्रिकी विभागाला पाठविण्यात आला आहे. निवारा शेडही त्याच विभागाच्या अखत्यारीत आहेत. आमचाही पाठपुरावा सुरू आहे. शिवाय, पिण्याच्या पाण्याची टाकी त्वरित साफ करण्यात येईल.- संजय गुप्ता,मुख्य वाणिज्य निरीक्षक, रेल्वे>रेल्वेने जो निवारा बांधून दिला आहे, त्याचा स्टील मार्केटमधील कामगारांना फायदा होतो. रेल्वे धक्क्यावरील टोळीकरिता त्याचा काहीच फायदा नाही. तसेच धुळीच्या त्रासामुळे कामगारांचे आरोग्य धोक्यात आले असून, अनेकांना श्वसनाचा त्रास होत आहे. याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून रेल्वेच्या वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करणार आहोत.- राजेंद्र बनकर,भाजपा माथाडी कामगार ज्येष्ठ नेते