शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ ऑगस्ट… बुलेट ट्रेन मुहूर्त ठरला! पहिला रुट कोणता, मुंबईत कधी सुरू होणार? मोठी माहिती समोर
2
मराठी की हिंदू, महापौर कोण होणार? भाजपा नेते कृपाशंकर सिंह पुन्हा बोलले; "मुंबईचा महापौर..."
3
केवळ १६ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा १ कोटींहून अधिक परतावा; SIP ठरतेय वरदान, सोपं गणित पाहा
4
भाजपाचा विजयरथ सुसाट! मतदानाआधी ११ उमेदवार बिनविरोध जिंकले, कुठे-कुठे फुलले कमळ?
5
पुण्यात भाजपाला धक्का, अधिकृत उमेदवाराने अर्ज घेतला मागे; माघारीनंतर पूजा मोरेंना अश्रू अनावर
6
Vastu Tips : नवीन वर्षाचे कॅलेंडर या दिशेला ठेवू नका; नाही तर अडचणी येऊ शकतात
7
Ahilyanagar Election 2025: मतदानाआधीच 'बिनविरोध' निकालांचा पाऊस; अहिल्यानगरमध्ये अजित पवारांचे दोन उमेदवार विजयी
8
ठरले! स्लीपर वंदे भारत ‘या’ तारखेपासून प्रवासी सेवेत, तिकीट दरही आले; PM मोदी करणार लोकार्पण
9
या देशात पत्र पाठवण्याची सेवा बंद, ४०१ वर्षांची परंपरा संपली; असे करणारा जगातील पहिलाच देश ठरला
10
२०२६ मध्ये राज्यसभेतील गणित बदलणार; महाराष्ट्रातील एका जागेसह ७५ जागांचं भवितव्य ठरणार
11
आयटी रिटर्नची मुदत संपली तरी आशा कायम! 'या' मार्गाने मिळवू शकता रखडलेला टॅक्स रिफंड
12
निवडणुकीसाठी अपक्षांना पाव, वाटाणे अन् अक्रोड अशी १९४ मुक्त चिन्हे, 'रिक्षा' चिन्हाची मोठी मागणी
13
नवीन वर्षाच्या पार्टीदरम्यान बारमध्ये भीषण स्फोट, १० जणांचा होरपळून मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
शौचालयाच्या खाली असलेल्या पाण्याच्या मुख्य पाईपलाईनमध्ये गळती, दूषित पाण्यामुळे ७ जणांचा मृत्यू, १४९ जण गंभीर; अधिकारी निलंबित
15
झगमगाटाच्या जगात 'कंफर्ट फूड'चा विजय; न्यू इयरच्या रात्री फूड अँपवर ९,४१० लोकांची 'खिचडी'ला पसंती 
16
बाथरुममध्ये गेली अन् जीव गमावून बसली; वाढदिवसाच्या आदल्या दिवशी तरुणीसोबत काय घडलं?
17
खामेनेईंची सत्ता धोक्यात! इराणमध्ये लोक रस्त्यावर का उतरले? जाणून घ्या कारण...
18
नील सोमय्यांविरोधात दोन्ही ठाकरे, काँग्रेसने उमेदवारच दिला नाही?, किरीट सोमय्यांनी मानले देवाचे आभार
19
Team India ODI Schedule 2026: रोहित-विराटची क्रेझ! नव्या वर्षात टीम इंडिया किती वनडे खेळणार?
20
वॉरेन बफेंची 'एनर्जी मशीन' आज पासून अ‍ॅक्शन मोडमध्ये, कोण आहेत ग्रेग एबेल, ज्यांच्या हाती आलीये बर्कशायर हॅथवेची धुरा
Daily Top 2Weekly Top 5

कळंबोलीतील मालधक्का हरवला धुळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 23:39 IST

कळंबोली येथील मालधक्क्यावर सिमेंटीकरण नसल्याने धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे माथाडी कामगारांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे.

पनवेल : कळंबोली येथील मालधक्क्यावर सिमेंटीकरण नसल्याने धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे माथाडी कामगारांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही रेल्वेकडून उपाययोजना केल्या जात नसल्याने मंगळवारी कामगार संघटनेच्या वतीने रेल्वेच्या स्थानिक अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. मात्र, त्यांच्या अधिकार क्षेत्रात या गोष्टी येत नसल्याने मुंबई येथील डीआरएम कार्यालयात जाऊन पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे माथाडी नेते राजेंद्र बनकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.स्ट्री मार्केट परिसरात अनेक समस्या भेडसावत आहे. मंगळवारी भाजपा माथाडी कामगार संघटनेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष रामदास महानवर यांच्यासह माथाडी कामगारांनी मुख्य वाणिज्य निरीक्षक संजय गुप्ता आणि मुख्य माल पर्यवेक्षक बी. प्र. कुजुर यांची भेट घेतली आणि येथील समस्या सोडविण्याची मागणी केली.>ंनिवारा शेड धक्क्यापासून दूररेल्वेने माथाडी कामगारांकरिता निवारा शेड बांधून दिले आहे; परंतु धक्का आणि हे अंतर जास्त आहे. स्वच्छतागृहही लांब असल्याने कामगारांची गैरसोय होत असल्याचे रामदास महानवर यांनी सांगितले. रात्रीच्या वेळी अनेकदा परिसरातील दिवे बंद असतात. कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी कोणतीही खबरदारी घेण्यात आली नसल्याचे प्रशांत रणवरे यांनी सांगितले. रेल्वे धक्क्यावर ट्रक आल्याने मोठ्या प्रमाणात माती, धूळ उडते. त्यामुळे काही माथाडी कामगारांना श्वसनाचे विकार जडले आहेत, तसेच क्रेन व कंटेनरचालकांनाही तोच त्रास होत आहे. पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहाचा अभाव आहे. या ठिकाणी एक नादुरुस्त निवारा शेड असून, लवकरच जमीनदोस्त करण्यात येणार आहे.मालधक्क्यावर धुळीचे साम्राज्य आहेच. या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने क्रेन आणि कंटेनर पलटी होण्याच्या घटनाही घडल्या आहेत.>रेल्वेधक्का परिसरात काँक्रीटीकरणाचा प्रस्ताव अभियांत्रिकी विभागाला पाठविण्यात आला आहे. निवारा शेडही त्याच विभागाच्या अखत्यारीत आहेत. आमचाही पाठपुरावा सुरू आहे. शिवाय, पिण्याच्या पाण्याची टाकी त्वरित साफ करण्यात येईल.- संजय गुप्ता,मुख्य वाणिज्य निरीक्षक, रेल्वे>रेल्वेने जो निवारा बांधून दिला आहे, त्याचा स्टील मार्केटमधील कामगारांना फायदा होतो. रेल्वे धक्क्यावरील टोळीकरिता त्याचा काहीच फायदा नाही. तसेच धुळीच्या त्रासामुळे कामगारांचे आरोग्य धोक्यात आले असून, अनेकांना श्वसनाचा त्रास होत आहे. याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून रेल्वेच्या वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करणार आहोत.- राजेंद्र बनकर,भाजपा माथाडी कामगार ज्येष्ठ नेते