शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पनेवलमध्ये आजपासून मल्हार महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 02:30 IST

‘मल्हार महोत्सव’ म्हणजे पनवेलकरांसाठी विविध कलागुणांचा आविष्कार पाहण्याची संधी उपलब्ध करून देणारा महोत्सव. शनिवार, २० जानेवारी ते बुधवार, २४ जानेवारीपर्यंत नवीन पनवेल येथे

पनवेल : ‘मल्हार महोत्सव’ म्हणजे पनवेलकरांसाठी विविध कलागुणांचा आविष्कार पाहण्याची संधी उपलब्ध करून देणारा महोत्सव. शनिवार, २० जानेवारी ते बुधवार, २४ जानेवारीपर्यंत नवीन पनवेल येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा होणाºया महोत्सवाचे माध्यम प्रायोजक ‘लोकमत’ आहे. या महोत्सवाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पालिकेतील सभागृहनेते परेश ठाकूर व रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष व भाजपाचे तालुकाध्यक्ष अरु ण भगत यांनी केले आहे.रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व भारतीय जनता पार्टी, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या १०व्या मल्हार महोत्सवाच्या नियोजनासंदर्भातील माहिती देण्यासाठी नवीन पनवेल येथील सीकेटी विद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेला भाजपाचे रायगड जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, शहर अध्यक्ष व महोत्सवप्रमुख जयंत पगडे उपस्थित होते.विविध राज्यांतील संस्कृती, मनोरंजन, कलाविष्काराची पर्वणी रसिक प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. शनिवार, २० जानेवारी रोजी सांयकाळी ६ वाजता नवीन पनवेलमधील सीकेटी विद्यालयात माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. या वेळी उपमहापौर चारुशीला घरत व जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी उपस्थित राहणार आहेत.मराठी अभिनेत्री ‘माझ्या नवºयाची बायको’फेम अनिता दातार यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. रविवार, २१ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता राज्याचे सार्वजनिक बांधकाम, महसूल, मदत कार्य व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती लाभणार आहे. या वेळी ते केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अभियान योजनेअंतर्गत ‘स्वच्छ, सुंदर सोसायटी’ स्पर्धेची घोषणा करणार आहेत. तर २४ जानेवारीला महोत्सवाचा समारोप होणार असून राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान, अन्न व नागरी पुरवठामंत्री रवींद्र चव्हाण आणि राज्याचे पर्यटन व रोजगार हमी योजनामंत्री जयकुमार रावल यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. त्यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाºया गुणिजनांचा (व्यक्ती व संस्था) पनवेल गौरव व रायगड गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये सुकाणू, स्वागत, सांस्कृतिक, साहित्य, निमंत्रण, बक्षीस वितरण अशा विविध समित्या कार्यरत असून, विविध संस्कृती, कला-आविष्कारांची पर्वणी असलेल्या या महोत्सवास नागरिकांनी अवश्य भेट देऊन महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन या वेळी आयोजकांच्या वतीने करण्यातआले.