शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

मलनि:सारणचा कचरा मोकळ्या भूखंडावर; पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 00:34 IST

कोपरखैरणेमधील महापालिकेच्या मलनि:सारण केंद्राला समस्यांचा विळखा पडला आहे. येथील संरक्षण कुंपण नादुरुस्त झाल्यामुळे या परिसरामध्ये गर्दुल्ल्यांचा अड्डा बनला आहे.

नवी मुंबई : कोपरखैरणेमधील महापालिकेच्या मलनि:सारण केंद्राला समस्यांचा विळखा पडला आहे. येथील संरक्षण कुंपण नादुरुस्त झाल्यामुळे या परिसरामध्ये गर्दुल्ल्यांचा अड्डा बनला आहे. केंद्रामधील कचरा ठेकेदार येथील मोकळ्या भूखंडावर टाकत असल्याचे निदर्शनास आले असून, प्रशासन याकडे दुर्लक्ष करू लागले आहे.नवी मुंबई महानगरपालिकेने शहरामध्ये अत्याधुनिक मलनि:सारण केंद्र उभारली असून, प्रमुख केंद्रामध्ये कोपरखैरणेचाही समावेश आहे. येथे प्रक्रिया केलेले पाणी खाडीत सोडून दिले जात आहे. दोन दिवस केंद्रामध्ये बिघाड झाल्यामुळे प्रक्रिया न करताच पाणी खाडीत सोडून द्यावे लागले. रविवार व सोमवार दोन्ही दिवस पाण्यावर प्रक्रिया केली नाही, याविषयी नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर प्रत्यक्ष केंद्रामध्ये जाऊन पाहणी केली असता अनेक धक्कादायक गोष्टी निदर्शनास आल्या आहेत. केंद्रामध्ये येणाऱ्या व जाणाºया नागरिकांची कोणतीही नोंद ठेवण्यात येत नाही. प्रशासनाने केंद्राच्या दोन्ही बाजूला संरक्षण कुंपण म्हणून पत्र्याचे शेड तयार केले होते. कुंपणाचे पत्रे चोरीला गेले आहेत, उर्वरित गंजले आहेत. कुंपणासाठीचे लोखंडही गायब झाले आहे. प्रशासनाने कुंपणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे या ठिकाणी असणाºया मोकळ्या जागेवर अमली पदार्थांचे सेवन करणाºयांनी अड्डा तयार केला आहे. मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन तरुण येथे दिवसभर बसलेले असतात. मलनि:सारण केंद्रामधील पाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर शिल्लक राहिलेला स्लज क्षेपणभूमीवर टाकणे आवश्यक आहे; परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ठेकेदार हा स्लज मोकळ्या भूखंडावर टाकत आहे. पालिकेची कोणतीही परवानगी न घेतला सर्व कचरा बिनधास्तपणे येथे टाकला जात असून, पालिकेचे कर्मचारी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. ठेकेदाराच्या कामावर कोणतेही नियंत्रण नसल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे.दोन दिवसांपासून मलनि:सारण केंद्रातील पाणी प्रक्रिया न करताच सोडल्याविषयी माहिती घेण्यासाठी अभियांत्रिकी विभागाशी संपर्क साधला असता, दुरुस्तीची कामे सुरू असल्यामुळे पाणी काही वेळ खाडीत सोडून द्यावे लागले होते; परंतु सद्यस्थितीमध्ये दुरुस्ती पूर्ण झाली असून, पूर्ववत प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.ठेकेदार शेजारील भूखंडावर कचरा टाकत असल्याबद्दल विचारणा केली असता, अधिकाºयांनाच त्याची माहिती नव्हती.कचरा क्षेपणभूमीवर टाकला जात असल्याचे सांगण्यात आले. यामुळे पालिकेच्या अधिकाºयांचे येथील कामावर नियंत्रण नसल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे.विनाविलंब कुंपण बसवावेमलनि:सारण केंद्राच्या आवारामध्ये विनापरवाना कोणीही येणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे. यासाठी चारही बाजूला संरक्षण भिंत किंवा पत्र्याचे शेड टाकून कुंपण घालणे आवश्यक आहे. यासाठी नागरिक व लोकप्रतिनिधींनीही वारंवार मागणी केली असून, पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई