शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

मलनि:सारणचा कचरा मोकळ्या भूखंडावर; पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 00:34 IST

कोपरखैरणेमधील महापालिकेच्या मलनि:सारण केंद्राला समस्यांचा विळखा पडला आहे. येथील संरक्षण कुंपण नादुरुस्त झाल्यामुळे या परिसरामध्ये गर्दुल्ल्यांचा अड्डा बनला आहे.

नवी मुंबई : कोपरखैरणेमधील महापालिकेच्या मलनि:सारण केंद्राला समस्यांचा विळखा पडला आहे. येथील संरक्षण कुंपण नादुरुस्त झाल्यामुळे या परिसरामध्ये गर्दुल्ल्यांचा अड्डा बनला आहे. केंद्रामधील कचरा ठेकेदार येथील मोकळ्या भूखंडावर टाकत असल्याचे निदर्शनास आले असून, प्रशासन याकडे दुर्लक्ष करू लागले आहे.नवी मुंबई महानगरपालिकेने शहरामध्ये अत्याधुनिक मलनि:सारण केंद्र उभारली असून, प्रमुख केंद्रामध्ये कोपरखैरणेचाही समावेश आहे. येथे प्रक्रिया केलेले पाणी खाडीत सोडून दिले जात आहे. दोन दिवस केंद्रामध्ये बिघाड झाल्यामुळे प्रक्रिया न करताच पाणी खाडीत सोडून द्यावे लागले. रविवार व सोमवार दोन्ही दिवस पाण्यावर प्रक्रिया केली नाही, याविषयी नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर प्रत्यक्ष केंद्रामध्ये जाऊन पाहणी केली असता अनेक धक्कादायक गोष्टी निदर्शनास आल्या आहेत. केंद्रामध्ये येणाऱ्या व जाणाºया नागरिकांची कोणतीही नोंद ठेवण्यात येत नाही. प्रशासनाने केंद्राच्या दोन्ही बाजूला संरक्षण कुंपण म्हणून पत्र्याचे शेड तयार केले होते. कुंपणाचे पत्रे चोरीला गेले आहेत, उर्वरित गंजले आहेत. कुंपणासाठीचे लोखंडही गायब झाले आहे. प्रशासनाने कुंपणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे या ठिकाणी असणाºया मोकळ्या जागेवर अमली पदार्थांचे सेवन करणाºयांनी अड्डा तयार केला आहे. मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन तरुण येथे दिवसभर बसलेले असतात. मलनि:सारण केंद्रामधील पाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर शिल्लक राहिलेला स्लज क्षेपणभूमीवर टाकणे आवश्यक आहे; परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ठेकेदार हा स्लज मोकळ्या भूखंडावर टाकत आहे. पालिकेची कोणतीही परवानगी न घेतला सर्व कचरा बिनधास्तपणे येथे टाकला जात असून, पालिकेचे कर्मचारी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. ठेकेदाराच्या कामावर कोणतेही नियंत्रण नसल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे.दोन दिवसांपासून मलनि:सारण केंद्रातील पाणी प्रक्रिया न करताच सोडल्याविषयी माहिती घेण्यासाठी अभियांत्रिकी विभागाशी संपर्क साधला असता, दुरुस्तीची कामे सुरू असल्यामुळे पाणी काही वेळ खाडीत सोडून द्यावे लागले होते; परंतु सद्यस्थितीमध्ये दुरुस्ती पूर्ण झाली असून, पूर्ववत प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.ठेकेदार शेजारील भूखंडावर कचरा टाकत असल्याबद्दल विचारणा केली असता, अधिकाºयांनाच त्याची माहिती नव्हती.कचरा क्षेपणभूमीवर टाकला जात असल्याचे सांगण्यात आले. यामुळे पालिकेच्या अधिकाºयांचे येथील कामावर नियंत्रण नसल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे.विनाविलंब कुंपण बसवावेमलनि:सारण केंद्राच्या आवारामध्ये विनापरवाना कोणीही येणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे. यासाठी चारही बाजूला संरक्षण भिंत किंवा पत्र्याचे शेड टाकून कुंपण घालणे आवश्यक आहे. यासाठी नागरिक व लोकप्रतिनिधींनीही वारंवार मागणी केली असून, पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई