शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

महाडमध्ये महावितरणची वसुली सुरू

By admin | Updated: February 5, 2016 02:55 IST

मार्च महिन्यापूर्वी सर्वच विभागाकडून मोठ्या प्रमाणात करवसुली करण्याकरिता कारवाया केल्या जातात त्याप्रमाणे महावितरणने देखील कारवाईस प्रारंभ केला आहे

सिकंदर अनवारे, दासगांवमार्च महिन्यापूर्वी सर्वच विभागाकडून मोठ्या प्रमाणात करवसुली करण्याकरिता कारवाया केल्या जातात त्याप्रमाणे महावितरणने देखील कारवाईस प्रारंभ केला आहे. यात सर्वात आधी ग्रामीण भागात होत असलेल्या पाणीपुरवठा योजनांवरच महावितरणने टाच मारली असून तालुक्यातील जवळपास ४३ पाणीपुरवठा योजनांची वीज जोडणी तोडली. परिणामी पाणीपुरवठा ठप्प झाल्याने ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत. थकबाकीमध्ये महाड तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांना करण्यात आलेल्या वीज जोडणींची कोटीची थकबाकी असल्याने वरिष्ठांच्या आदेशाने कारवाई होत असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.विजेच्या अनेक तक्रारी असल्यातरी महावितरण याबाबत धडक निर्णय घेत नसली तरी वीज बिल थकीत कारवाईबाबत महावितरणने कधीच कुचराई केलेली नाही. महावितरणने महाड तालुक्यातील जवळपास ४३ ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा तोडला आहे. यामुळे ग्रामपंचायतीमधील पाणीपुरवठा देखील ठप्प झाला आहे. तालुक्यात एकूण २२४ पाणीपुरवठा जोडणीधारक आहेत. यापैकी १४४ ग्राहक थकबाकीदार आहेत. महावितरणने कारवाईस प्रारंभ केल्यानंतर १४४ पैकी ४३ वीज जोडण्या तोडल्या आहेत. तर १०१ वीज जोडण्या येत्या १० तारखेपर्यंत तोडण्यात येणार आहेत. या थकबाकीदार ग्रामपंचायतीमध्ये तालुक्यातील दासगाव, लाडवली, तुडील तर्फे नरवण, केंबुर्ली, खरवली, वाळण, नांदगाव बु., करंजखोल, शेल, कांबळे तर्फे महाड, नडगाव, काळकाई कोंड, वडघर, नडगाव, विन्हेरे बागवाडी, चिंभावे, आकले या ग्रामपंचायतींची लाखापेक्षा अधिक थकबाकी राहिली आहे. महाडमध्ये ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची जवळपास १ कोटी ४१ लाखांची थकबाकी झाली आहे. या थकबाकीची वसुली येत्या मार्चपूर्वी करण्यात येणारअसल्याने ग्रामपंचायतींवर ही कारवाई केली असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे.थकबाकीदार ग्रामपंचायतींमध्ये दासगाव ग्रामपंचायतीची १८ लाख ८७ हजार रुपये, लाडवली ९ लाख ७७ हजार, तुडीलतर्फे नरवण १२ लाख ३० हजार, कांबळे तर्फे महाड ७ लाख ५५ हजार, नडगाव ७ लाख ४७ हजार, करंजखोल ५ लाख ६१ हजार तरअन्य ग्रामपंचायतींची दोन ते तीन लाखांच्या आसपास थकबाकी आहे.