शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पाणजेसह नेरूळ, माहुल-शिवडी पक्षी अभयारण्याचा महाराष्ट्र शासनास पडला विसर!

By नारायण जाधव | Updated: February 8, 2024 15:59 IST

नऊ वर्षे उलटले तरी निर्णय कागदावरच : पर्यावरणप्रेमींनी मुख्यमंत्र्यांना करून दिली आठवण

नवी मुंबई : पाणजे पाणथळ क्षेत्राच्या वादावर चर्चा करण्यासाठी पर्यावरण विभागाने सिडको, सेससोबत बैठक घेऊन १२ आठवड्यात निर्णय घेण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश ताजे असतानाच आता हे क्षेत्र पक्षी अभयारण्य म्हणून विकसित करण्याच्या राज्य वन्यप्राणी मंडळाने ४ डिसेंबर २०१५ आपल्या दहाव्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाचा महाराष्ट्र शासनास विसर पडला असल्याचे उघड झाले आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट केलेल्या पाणजेसह नवी मुंबईतील टीएस चाणक्य परिसर आणि मुंबईतील माहुल शिवडी परिसर असे तीन पक्षी अभयारण्यांना मान्यता दिलेल्या निर्णयाचे नवी मुंबईतील पर्यावरणप्रेमींनी स्क्रीनशॉट काढून ते विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवून या निर्णयाची आठवण करून दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर या तीन अभयारण्यांचा निर्णय बीएनएचएसने मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) साठी सुचवलेल्या शमन (mitigation) उपायांच्या अनुषंगाने घेतल्याचे म्हटले आहे.

तिन्ही पक्षी अभयारण्य कधी विकसित होणार?मुंबई उच्च न्यायालयाने २४ जानेवारी २०२४ रोजी पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिवांना सिडको, नवी मुंबई एकात्मिक औद्योगिक प्राधिकरण (NMIIA – पूर्वीचे नवी मुंबई सेझ) आणि पर्यावरण कार्यकर्ते नंदकुमार पवार यांची २८९ हेक्टर पाणथळ जमिनीच्या वादावर सुनावणी करण्याचे निर्देश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील नॅट कनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी राज्य शासनाने ९ वर्षांपूर्वी घेतलेल्या पाणजेसह नवी मुंबईतील टीएस चाणक्य परिसर आणि मुंबईतील माहुल शिवडी परिसर असे तीन पक्षी अभयारण्यांचे काय झाले, ते कधी विकसित होणार, असे प्रश्न केले आहेत. तर श्री एकवीरा आई प्रतिष्ठानचे प्रमुख नंदकुमार पवार यांनी असेही निदर्शनास आणून दिले की, नवी मुंबईतील पाणथळ जागा ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याच्या (TCFS) सॅटेलाईट वेटलँड व्यवस्थापन योजनेचा भाग असून वनविभागाच्या मँग्रोव्ह फाउंडेशनने त्या तयार केल्याचे म्हटले आहे.

नवी मुंबई विमानतळावर ये-जा करणाऱ्या विमानांना धोकानवी मुंबई पाणथळ जागा पक्ष्यांचे अधिवास ठिकाण म्हणून राखण्याच्या महत्त्वावर बीएनएचएसने वारंवार भर दिला आहे. पक्ष्यांना जर त्यांना त्यांची सवय असलेली ओलसर जागा दिसली नाही तर हजारोंच्या संख्येने येणारे पक्षी विमानतळ परिसरात उतरतील. त्यामुळे ये-जा करणाऱ्या विमानांना त्यांचा फटका बसून धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती बी. एन. कुमार यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई