शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पाणजेसह नेरूळ, माहुल-शिवडी पक्षी अभयारण्याचा महाराष्ट्र शासनास पडला विसर!

By नारायण जाधव | Updated: February 8, 2024 15:59 IST

नऊ वर्षे उलटले तरी निर्णय कागदावरच : पर्यावरणप्रेमींनी मुख्यमंत्र्यांना करून दिली आठवण

नवी मुंबई : पाणजे पाणथळ क्षेत्राच्या वादावर चर्चा करण्यासाठी पर्यावरण विभागाने सिडको, सेससोबत बैठक घेऊन १२ आठवड्यात निर्णय घेण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश ताजे असतानाच आता हे क्षेत्र पक्षी अभयारण्य म्हणून विकसित करण्याच्या राज्य वन्यप्राणी मंडळाने ४ डिसेंबर २०१५ आपल्या दहाव्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाचा महाराष्ट्र शासनास विसर पडला असल्याचे उघड झाले आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट केलेल्या पाणजेसह नवी मुंबईतील टीएस चाणक्य परिसर आणि मुंबईतील माहुल शिवडी परिसर असे तीन पक्षी अभयारण्यांना मान्यता दिलेल्या निर्णयाचे नवी मुंबईतील पर्यावरणप्रेमींनी स्क्रीनशॉट काढून ते विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवून या निर्णयाची आठवण करून दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर या तीन अभयारण्यांचा निर्णय बीएनएचएसने मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) साठी सुचवलेल्या शमन (mitigation) उपायांच्या अनुषंगाने घेतल्याचे म्हटले आहे.

तिन्ही पक्षी अभयारण्य कधी विकसित होणार?मुंबई उच्च न्यायालयाने २४ जानेवारी २०२४ रोजी पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिवांना सिडको, नवी मुंबई एकात्मिक औद्योगिक प्राधिकरण (NMIIA – पूर्वीचे नवी मुंबई सेझ) आणि पर्यावरण कार्यकर्ते नंदकुमार पवार यांची २८९ हेक्टर पाणथळ जमिनीच्या वादावर सुनावणी करण्याचे निर्देश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील नॅट कनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी राज्य शासनाने ९ वर्षांपूर्वी घेतलेल्या पाणजेसह नवी मुंबईतील टीएस चाणक्य परिसर आणि मुंबईतील माहुल शिवडी परिसर असे तीन पक्षी अभयारण्यांचे काय झाले, ते कधी विकसित होणार, असे प्रश्न केले आहेत. तर श्री एकवीरा आई प्रतिष्ठानचे प्रमुख नंदकुमार पवार यांनी असेही निदर्शनास आणून दिले की, नवी मुंबईतील पाणथळ जागा ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याच्या (TCFS) सॅटेलाईट वेटलँड व्यवस्थापन योजनेचा भाग असून वनविभागाच्या मँग्रोव्ह फाउंडेशनने त्या तयार केल्याचे म्हटले आहे.

नवी मुंबई विमानतळावर ये-जा करणाऱ्या विमानांना धोकानवी मुंबई पाणथळ जागा पक्ष्यांचे अधिवास ठिकाण म्हणून राखण्याच्या महत्त्वावर बीएनएचएसने वारंवार भर दिला आहे. पक्ष्यांना जर त्यांना त्यांची सवय असलेली ओलसर जागा दिसली नाही तर हजारोंच्या संख्येने येणारे पक्षी विमानतळ परिसरात उतरतील. त्यामुळे ये-जा करणाऱ्या विमानांना त्यांचा फटका बसून धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती बी. एन. कुमार यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई