शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला उपस्थित ८ श्रीसेवकांचा उष्माघाताने मृत्यू, २४ जणांवर उपचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2023 22:41 IST

जखमींवरील उपचाराचा खर्च शासन करणार आहे. तर उपचारादरम्यान जे मृत झालेत त्यांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली

नवी मुंबई - महाराष्ट्र भूषण पुरस्कारावेळी लाखोंच्या संख्येने श्रीसेवक खारघरच्या मैदानात जमले होते. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अनेक नेते, आमदार उपस्थित होते. या पुरस्कार सोहळ्याला लाखो श्रीसेवकांचा जनसमुदाय भरउन्हात जमा झाला होता. परंतु उष्माघाताचा त्रास झाल्याने ८ श्रीसेवकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. 

या सोहळ्याला उपस्थित राहिलेल्या श्रीसेवकांना उष्माघाताचा त्रास झाला. त्यातील अनेकांवर सध्या नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जात जखमींची विचारपूस केली. त्यानंतर शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला, मुख्यमंत्री म्हणाले की, आजच्या सोहळ्याला जे श्रीसेवक आले होते. त्यातील काहींना उष्माघाताचा त्रास झालेला आहे. ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्यांची भेट घेऊन मी विचारपूस केली. चांगल्यात चांगले उपचार देण्याची सूचना डॉक्टरांना केली आहे. यात ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली. 

त्याचसोबत जखमींवरील उपचाराचा खर्च शासन करणार आहे. तर उपचारादरम्यान जे मृत झालेत त्यांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. झालेली दुर्घटना अतिशय दु:खद आहे. लाखो लोकांचा जनसमुदाय आला. कार्यक्रम सुरळीत पार पडला. परंतु शेवटी अशाप्रकारे घटना घडणे हे खूप दुर्दैवी आहे. मी राजकीय भाष्यावर बोलणार नाही. श्रीसेवक जे उपचार घेतायेत त्यांची सुविधा, सोय करणे हे प्राधान्य आहे. विशेष अधिकारी नेमणूक करण्यात आली आहे. कुठलीही गैरसोय होणार नाही अशी सूचना प्रशासनाला दिले आहेत. सध्या २४ लोकांवर उपचार सुरू आहेत. ५० जणांवर उपचार करून घरी सोडले आहेत. महिला, पुरुषांचा मृतांमध्ये सहभाग आहे अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.  

श्रीसदस्यांच्या मृत्यूची घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायीज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहोळ्यात सहभागी काही श्रीसदस्यांचे उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. मी या साधकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जे लोक उपचार घेत आहेत, त्यांच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.  

सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा - काँग्रेसदरम्यान, सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम भर दुपारी एप्रिल महिन्यात ठेवला. या निष्काळजीपणामुळे निष्पाप लोकांचा जीव गेला. अनेकजण गंभीर आहेत. सरकारने केलेला हा मनुष्यवध आहे. सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे