शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

रायगडमधील महामुंबई प्रकल्प गुंडाळला? राज्य सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 00:46 IST

MahaMumbai project : रायगड जिल्ह्यातील रोहा, अलिबाग, मुरूड व श्रीवर्धन या चार तालुक्यांतील चाळीस गावांत सिडकोने महामुंबई प्रकल्प प्रस्तावित केला होता.

- कमलाकर कांबळेनवी मुंबई : रायगड जिल्ह्यातील रोहा, अलिबाग, मुरूड व श्रीवर्धन या चार तालुक्यांतील चाळीस गावांत सिडकोने महामुंबई प्रकल्प प्रस्तावित केला होता. परंतु, राज्य सरकारच्या निर्देशानुसार आता हा प्रकल्प गुंडाळला आहे. या जागेवर राज्य सरकार विशेष प्रकल्प आणण्याचा विचार करीत असल्याची माहिती सूत्राने दिली.दोन वर्षांपूर्वी राज्य सरकारने रायगड जिल्ह्यात तिसऱ्या मुंबईची घोषणा केली होती. अलिबाग, रोहा, मुरूड आणि श्रीवर्धन या चार तालुक्यांतील चाळीस गावांचा या प्रकल्पात समावेश करण्यात आला होता. त्यासाठी १९,१४६ हेक्टर जमीन संपादित केली जाणार होती. त्यानुसार सिडकोने कंबर कसली होती. भूसंपादनाच्या कामासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांचीही नेमणूक करण्यात आली होती. तसेच जमिनीच्या सर्वेसाठी मेट्रो सेंटरबरोबर करारही केला होता. त्याचे शुल्कसुध्दा मेट्रो सेंटरला अदा केले होते. त्यानुसार लवकरच प्रत्यक्ष भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्याचे सिडकोने योजिले होते. परंतु गेल्या आठवड्यात राज्य सरकारने महामुंबईचा प्रकल्प स्थगित करण्याचे निर्देश सिडकोला दिले आहेत. महामुंबईच्या प्रस्तावित जागेवर विशेष प्रकल्प आणण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्राने दिली.नवी मुंबई शहराची उभारणी करण्यासाठी राज्य सरकारने सिडकोच्या माध्यमातून रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील ९५ गावांतील १८,८४२ हेक्टर जमीन संपादित केली आहे. त्यानंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसर अर्थात नैनाच्या विकासाची जबाबदारी सिडकोवर सोपविण्यात आली आहे. नैना क्षेत्रात ठाणे, उरण, कर्जत, पेण, खालापूर व पनवेल तालुक्यांतील गावांचा समावेश आहे. परंतु, आठ वर्षे उलटले तरी सिडकोला नैना क्षेत्राचा विकास करता आलेला नाही. यातच राज्य सरकारने दोन वर्षांपूर्वी रायगड जिल्ह्यातील रोहा, अलिबाग, मुरूड आणि श्रीवर्धन या चार तालुक्यांत महामुंबई या तिसऱ्या शहराची घोषणा केली. नवी मुंबईपेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेल्या या नव्या शहराची जबाबदारी सिडकोवर सोपविण्यात आली होती. त्यानुसार सिडकोने तयारीही सुरू केली. मात्र, राज्य सरकारने गेल्या आठवड्यात महामुंबई प्रकल्पाला स्थगिती दिली आहे. त्यानुसार सिडकोनेसुध्दा भूसंपादनाची प्रस्तावित प्रक्रिया गुंडाळल्याचे समजते. परिसरातील जमिनीचे भाव वधारले महामुंबईच्या घोषणेमुळे चार तालुक्यांसह परिसरातील जमिनीचे दर वधारले. जमिनी खरेदी-विक्रीच्या व्यवहार तेजीत आले. अनेक गुंतवणूकदारांनी अव्वाच्या सव्वा दराने या परिसरात जमिनी खरेदी केल्या. परंतु आता हा प्रकल्पच रद्द केल्याने गुंतवणूकदार, विकासक व स्थानिक भूधारकांची निराशा झाली आहे..

टॅग्स :Raigadरायगडcidcoसिडको