शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
2
अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
3
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
4
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
5
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
6
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
7
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
8
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
9
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन
10
धक्कादायक! अखेर ७ सिंहांना मृत्यूदंडाची शिक्षा; 'जंगलाच्या राजा'ला मारण्याची तयारी कोण करतंय?
11
₹१६०० पर्यंत जाणार Paytm चा शेअर; एक्सपर्ट बुलिश, आजही शेअरमध्ये मोठी तेजी
12
'एकाच ठिकाणी.. कुठे तरी राहा' राज ठाकरेंनी पिट्याभाईला सुनावले
13
...अन् व्हीलचेअरवर बसलेल्या प्रतीकासाठी PM मोदींनी स्वतः आणून दिला तिच्या आवडीचा पदार्थ (VIDEO)
14
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
15
Video - बापाची धडपड! ट्रॅफिकमध्ये अडकलेली रुग्णवाहिका, आजारी लेकीला उचलून घेऊन...
16
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
17
अमित शाहांनी म्हटलं, 'पिंटू बडा आदमी बनेगा'; काही क्षणांनी भाजपा उमेदवाराचा अश्लील व्हिडिओ व्हायरल
18
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
19
Mahabharat: शुक्राचार्यांना एकच डोळा का? ते शिवपुत्र होते? नावामागेही आहे रोचक कथा!
20
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी

रायगडमधील महामुंबई प्रकल्प गुंडाळला? राज्य सरकारचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 00:46 IST

MahaMumbai project : रायगड जिल्ह्यातील रोहा, अलिबाग, मुरूड व श्रीवर्धन या चार तालुक्यांतील चाळीस गावांत सिडकोने महामुंबई प्रकल्प प्रस्तावित केला होता.

- कमलाकर कांबळेनवी मुंबई : रायगड जिल्ह्यातील रोहा, अलिबाग, मुरूड व श्रीवर्धन या चार तालुक्यांतील चाळीस गावांत सिडकोने महामुंबई प्रकल्प प्रस्तावित केला होता. परंतु, राज्य सरकारच्या निर्देशानुसार आता हा प्रकल्प गुंडाळला आहे. या जागेवर राज्य सरकार विशेष प्रकल्प आणण्याचा विचार करीत असल्याची माहिती सूत्राने दिली.दोन वर्षांपूर्वी राज्य सरकारने रायगड जिल्ह्यात तिसऱ्या मुंबईची घोषणा केली होती. अलिबाग, रोहा, मुरूड आणि श्रीवर्धन या चार तालुक्यांतील चाळीस गावांचा या प्रकल्पात समावेश करण्यात आला होता. त्यासाठी १९,१४६ हेक्टर जमीन संपादित केली जाणार होती. त्यानुसार सिडकोने कंबर कसली होती. भूसंपादनाच्या कामासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांचीही नेमणूक करण्यात आली होती. तसेच जमिनीच्या सर्वेसाठी मेट्रो सेंटरबरोबर करारही केला होता. त्याचे शुल्कसुध्दा मेट्रो सेंटरला अदा केले होते. त्यानुसार लवकरच प्रत्यक्ष भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्याचे सिडकोने योजिले होते. परंतु गेल्या आठवड्यात राज्य सरकारने महामुंबईचा प्रकल्प स्थगित करण्याचे निर्देश सिडकोला दिले आहेत. महामुंबईच्या प्रस्तावित जागेवर विशेष प्रकल्प आणण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्राने दिली.नवी मुंबई शहराची उभारणी करण्यासाठी राज्य सरकारने सिडकोच्या माध्यमातून रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील ९५ गावांतील १८,८४२ हेक्टर जमीन संपादित केली आहे. त्यानंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसर अर्थात नैनाच्या विकासाची जबाबदारी सिडकोवर सोपविण्यात आली आहे. नैना क्षेत्रात ठाणे, उरण, कर्जत, पेण, खालापूर व पनवेल तालुक्यांतील गावांचा समावेश आहे. परंतु, आठ वर्षे उलटले तरी सिडकोला नैना क्षेत्राचा विकास करता आलेला नाही. यातच राज्य सरकारने दोन वर्षांपूर्वी रायगड जिल्ह्यातील रोहा, अलिबाग, मुरूड आणि श्रीवर्धन या चार तालुक्यांत महामुंबई या तिसऱ्या शहराची घोषणा केली. नवी मुंबईपेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेल्या या नव्या शहराची जबाबदारी सिडकोवर सोपविण्यात आली होती. त्यानुसार सिडकोने तयारीही सुरू केली. मात्र, राज्य सरकारने गेल्या आठवड्यात महामुंबई प्रकल्पाला स्थगिती दिली आहे. त्यानुसार सिडकोनेसुध्दा भूसंपादनाची प्रस्तावित प्रक्रिया गुंडाळल्याचे समजते. परिसरातील जमिनीचे भाव वधारले महामुंबईच्या घोषणेमुळे चार तालुक्यांसह परिसरातील जमिनीचे दर वधारले. जमिनी खरेदी-विक्रीच्या व्यवहार तेजीत आले. अनेक गुंतवणूकदारांनी अव्वाच्या सव्वा दराने या परिसरात जमिनी खरेदी केल्या. परंतु आता हा प्रकल्पच रद्द केल्याने गुंतवणूकदार, विकासक व स्थानिक भूधारकांची निराशा झाली आहे..

टॅग्स :Raigadरायगडcidcoसिडको