शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे तिकिटांचा काळाबाजार, खासगी एजंटकडून प्रवाशांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 02:45 IST

जुईनगर स्थानकाबाहेर रेल्वेची तिकिटे विक्री करणा-या खासगी एजंटकडून प्रवाशांची लूट होत आहे.

नवी मुंबई : जुईनगर स्थानकाबाहेर रेल्वेची तिकिटे विक्री करणा-या खासगी एजंटकडून प्रवाशांची लूट होत आहे. अधिकृत प्रवास भाड्याव्यतिरिक्त जादा आकारणी हे एजंट करत आहेत. वास्तविक प्रवाशांकडून घेतले जाणारे तिकिटांचे कमिशन रेल्वे व्यवस्थापनाने देण्याची गरज आहे. प्रवाशांवर पडणारा हा नाहक बोजा रेल्वेने कमी करावा व सिनेमाच्या तिकिटाच्या काळाबाजाराप्रमाणे प्रवासी तिकिटांचा चाललेला हा काळाबाजार त्वरित थांबवावा, अशी मागणी प्रवासी वर्गातून जोर धरू लागली आहे.हार्बर मार्गावरून दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. प्रत्येक रेल्वेस्थानकावर चारहून अधिक तिकीटघरे आहेत, तरीही या तिकीट खिडक्यांवर प्रचंड गर्दी असते. एटीव्हीएम मशिन, कूपनची सोय केली आणि मासिक पासधारक असले तरीही शेकडो प्रवासी दैनंदिन तिकीट खरेदी करत असतात. त्यांना वेळेत तिकीट मिळाले नाही, तर त्यांची नियमित गाडी चुकण्याची शक्यता असते. त्यामुळे रेल्वे प्रशासनावरचा तिकीटविक्रीचा वाढता बोजा कमी करण्यासाठी रेल्वेने खासगी एजंटांची स्टेशन परिसरात नेमणूक केलेली आहे. जुईनगर, वाशी, सानपाडा रेल्वे स्टेशन परिसरात अनेक एजंट संगणक घेऊन तिकीट विक्री करत असतात. या एजंटांकडेही भरपूर गर्दी होत असते; परंतु प्रत्येक तिकिटामागे हे एजंट १ ते २ रुपये जादा आकारणी करतात. त्यापैकी काही स्थानकांवरील आकारणी अधिकृत नाही. त्यामुळे रेल्वेने एक तर या एजंटना कमिशन वाढवून द्यावे, नाही तर आपल्या आवारात अतिरिक्त खिडक्या सुरू करण्याची मागणी होत आहे. या एजंटमुळे रेल्वेच्या कर्मचाºयांचा पगार, खिडकीची व्यवस्था आदी खर्च कमी होतो. त्यामुळे त्यांनी त्या खर्चाचा विचार करता एजंटला योग्य कमिशन दिले, तर प्रवाशांकडून होणारी अनधिकृत लूट थांबेल.प्रत्येक तिकिटामागे २ ते ५ रुपये कमिशन हे एजंट घेतात. अगदी ५ रुपयांचे तिकीट काढायचे असेल तरी हे पैसे द्यावे लागतात. त्यामुळे प्रवाशांना बसणारा हा नाहक भुर्दंड कमी करावा, अशी मागणी प्रवासी वर्गाकडून होत आहे. या रेल्वेस्थानकाबाहेर असलेल्या एजंटने आपल्या फलकावरही १ रुपया सर्व्हिस चार्ज लागेल, असे लिहिले आहे. रिटन तिकीटला २ रुपये द्यावे लागतील, असे लिहिले आहे; परंतु सरसकट प्रत्येक तिकिटामागे हे एजंट ५ रुपये घेतात. रेल्वेने या एजंटना योग्य कमिशन देऊन प्रवाशांवर पडणारा अतिरिक्त बोजा कमी करावा. तिकीट खिडकी बंद जुईनगर रेल्वेस्थानकाच्या पूर्वेकडील तिकीट खिडक्या बंद असून, या ठिकाणी प्रवाशांची गैरसोय होत आहे. रेल्वेस्थानकातील तिकीट खिडकी बंद असल्याने प्रवाशांना एजंटकडून तिकीट खरेदी करावे लागत असल्याची तक्रारदेखील प्रवाशांनी केली आहे. प्रवाशांना पश्चिमेकडील तिकीट खिडकीचा वापर करावा लागतो.

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासी