शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

रेल्वे तिकिटांचा काळाबाजार, खासगी एजंटकडून प्रवाशांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 02:45 IST

जुईनगर स्थानकाबाहेर रेल्वेची तिकिटे विक्री करणा-या खासगी एजंटकडून प्रवाशांची लूट होत आहे.

नवी मुंबई : जुईनगर स्थानकाबाहेर रेल्वेची तिकिटे विक्री करणा-या खासगी एजंटकडून प्रवाशांची लूट होत आहे. अधिकृत प्रवास भाड्याव्यतिरिक्त जादा आकारणी हे एजंट करत आहेत. वास्तविक प्रवाशांकडून घेतले जाणारे तिकिटांचे कमिशन रेल्वे व्यवस्थापनाने देण्याची गरज आहे. प्रवाशांवर पडणारा हा नाहक बोजा रेल्वेने कमी करावा व सिनेमाच्या तिकिटाच्या काळाबाजाराप्रमाणे प्रवासी तिकिटांचा चाललेला हा काळाबाजार त्वरित थांबवावा, अशी मागणी प्रवासी वर्गातून जोर धरू लागली आहे.हार्बर मार्गावरून दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. प्रत्येक रेल्वेस्थानकावर चारहून अधिक तिकीटघरे आहेत, तरीही या तिकीट खिडक्यांवर प्रचंड गर्दी असते. एटीव्हीएम मशिन, कूपनची सोय केली आणि मासिक पासधारक असले तरीही शेकडो प्रवासी दैनंदिन तिकीट खरेदी करत असतात. त्यांना वेळेत तिकीट मिळाले नाही, तर त्यांची नियमित गाडी चुकण्याची शक्यता असते. त्यामुळे रेल्वे प्रशासनावरचा तिकीटविक्रीचा वाढता बोजा कमी करण्यासाठी रेल्वेने खासगी एजंटांची स्टेशन परिसरात नेमणूक केलेली आहे. जुईनगर, वाशी, सानपाडा रेल्वे स्टेशन परिसरात अनेक एजंट संगणक घेऊन तिकीट विक्री करत असतात. या एजंटांकडेही भरपूर गर्दी होत असते; परंतु प्रत्येक तिकिटामागे हे एजंट १ ते २ रुपये जादा आकारणी करतात. त्यापैकी काही स्थानकांवरील आकारणी अधिकृत नाही. त्यामुळे रेल्वेने एक तर या एजंटना कमिशन वाढवून द्यावे, नाही तर आपल्या आवारात अतिरिक्त खिडक्या सुरू करण्याची मागणी होत आहे. या एजंटमुळे रेल्वेच्या कर्मचाºयांचा पगार, खिडकीची व्यवस्था आदी खर्च कमी होतो. त्यामुळे त्यांनी त्या खर्चाचा विचार करता एजंटला योग्य कमिशन दिले, तर प्रवाशांकडून होणारी अनधिकृत लूट थांबेल.प्रत्येक तिकिटामागे २ ते ५ रुपये कमिशन हे एजंट घेतात. अगदी ५ रुपयांचे तिकीट काढायचे असेल तरी हे पैसे द्यावे लागतात. त्यामुळे प्रवाशांना बसणारा हा नाहक भुर्दंड कमी करावा, अशी मागणी प्रवासी वर्गाकडून होत आहे. या रेल्वेस्थानकाबाहेर असलेल्या एजंटने आपल्या फलकावरही १ रुपया सर्व्हिस चार्ज लागेल, असे लिहिले आहे. रिटन तिकीटला २ रुपये द्यावे लागतील, असे लिहिले आहे; परंतु सरसकट प्रत्येक तिकिटामागे हे एजंट ५ रुपये घेतात. रेल्वेने या एजंटना योग्य कमिशन देऊन प्रवाशांवर पडणारा अतिरिक्त बोजा कमी करावा. तिकीट खिडकी बंद जुईनगर रेल्वेस्थानकाच्या पूर्वेकडील तिकीट खिडक्या बंद असून, या ठिकाणी प्रवाशांची गैरसोय होत आहे. रेल्वेस्थानकातील तिकीट खिडकी बंद असल्याने प्रवाशांना एजंटकडून तिकीट खरेदी करावे लागत असल्याची तक्रारदेखील प्रवाशांनी केली आहे. प्रवाशांना पश्चिमेकडील तिकीट खिडकीचा वापर करावा लागतो.

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासी