शहरं
Join us  
Trending Stories
1
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
2
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
3
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
4
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
5
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
6
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
7
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
9
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
10
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
11
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
12
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
13
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
14
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
15
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
16
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
17
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
18
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
19
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांचा मंगळवारी मंत्रालयावर लाँग मार्च; मागण्यांसाठी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 23:53 IST

सिडको महामंडळ बरखास्त करण्याची मागणी

नवी मुंबई : नवी मुंबई शहर वसविताना सिडको महामंडळाने स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय केला असून विविध प्रलंबित बाबी पूर्ण करण्यासाठी सिडकोकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. नवी मुंबई ९५ गाव व इतर प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती आणि इतर संलग्न संस्था यांच्या माध्यमातून मंगळवारी १७ मार्च रोजी पनवेल ते आझाद मैदान लॉँग मार्च काढून मंत्रालयावर धडक दिली जाणार असल्याची माहिती शुक्र वारी १३ मार्च रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत सुरेश ठाकूर यांनी दिली.

मुंबई शहरात नागरिकांच्या वाढत्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबई शहराची निर्मिती करण्यात आली. शहराची निर्मिती करताना स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी सिडकोने संपादित केल्या, परंतु त्या जमिनीचा मोबदला अद्याप पूर्णपणे मिळालेला नाही. तसेच प्रकल्पग्रस्तांना अन्याय सहन करावा लागत असल्याची भावना ठाकूर यांनी व्यक्त केली.

प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चामध्ये सर्व प्रकल्पग्रस्त संघटना एकत्र आल्या असून समाजाची ताकद वाढली असल्याचे त्यांनी सांगितले. मोर्चाच्या माध्यमातून सुमारे २१ मागण्या मांडण्यात आल्या आहेत. यामध्ये नवी मुंबईतील प्रत्येक गावामध्ये विस्तारित गावठाणांचा सिटी सर्व्हे करून प्रॉपर्टी कार्डचे वाटप करणे. तसेच त्या जमिनींवरील बांधकामे संरक्षित व नियमित करण्यात यावीत, त्यांच्यावर कारवाई करण्यात येऊ नये, सिडकोची क्लस्टर योजना रद्द करून त्याऐवजी स्वयंविकास योजना प्रस्तावित करण्यात यावी, साडेबारा टक्के योजनेतील बेकायदेशीररीत्या राखून ठेवलेले पावणेचार टक्के जागा शेतकऱ्यांना परत देण्यात यावी, एस.ई.झेड.मधील जमिनींचा वापर न झाल्याने त्या परत देण्यात याव्यात, नैना प्रकल्प रद्द करावा, नवी मुंबई क्षेत्रात दोन महापालिका असल्याने या क्षेत्रातून सिडको महामंडळ बरखास्त करणे, अशा विविध मागण्यांचा समावेश आहे. याबाबत शासनाने निर्णय घेऊन प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडविण्याची मागणी करण्यात येणार आहे.

या पत्रकार परिषदेला सुरेश पवार, वामन शेळके, विजय गडगे, दीपक पाटील, निग्रेश पाटील, आर.बी. घरत, दशरथ भगत आदी विविध प्रकल्पग्रस्त संघर्ष समित्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. १७ मार्च रोजी पनवेलहून लॉँग मार्च प्रस्थान होणार असून १८ मार्च रोजी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन केले जाणार आहे.

टॅग्स :Mantralayaमंत्रालय