शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

लोकमत इफेक्ट - वसतिगृहात नवीन गृहपालांची नियुक्ती, विद्यार्थ्यांमध्ये समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 03:45 IST

गोंधळपाड्यात जिल्हाधिकाऱ्यांकडून चोवीस तासांत कारवाई

अलिबाग : तालुक्यातील गोंधळपाडा येथील मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहात महिला गृहपालांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाºयांना केली होती. याबाबत जिल्हाधिकाºयांनी त्वरित कारवाई केली आहे. महिला गृहपाल एम. जे. नरहरे यांना बदलून त्यांच्या जागी समाज कल्याण निरीक्षक अनिल मोरे यांची गृहपाल म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांची भेट घेऊन केली होती. शनिवारी ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच रायगड जिल्हा समाज कल्याण कार्यालयात एकच धावपळ उडाली होती तर सहायक समाज कल्याण आयुक्त रविकिरण पाटील सकाळीच वसतिगृहात पोहोचले.

महिला गृहपाल एम. जे. नरहरे गेल्या चार वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहाच्या महिला गृहपाल म्हणून कार्यरत आहेत. मात्र, मुलांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणे आणि मुलांच्यारूममध्ये जाऊन त्यांना मारहाण करणे, मुलांना वसतिगृहातून काढून टाकणे आदी प्रकारे सातत्याने मुलांना त्रास देत होत्या. वसतिगृहातील मुलांनी याबाबत समाज कल्याण अधिकाºयांना भेटून अनेक निवेदने दिली. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही गेल्या चार वर्षांत झाली नव्हती. अलीकडे महिला गृहपाल एम. जे. नरहरे यांच्याकडून मुलांना त्रास अधिक प्रमाणात वाढल्याने, त्रस्त झालेल्या ४० विद्यार्थ्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांच्या कार्यालयात त्यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्या वेळी डॉ.सूर्यवंशी यांनी या मुलांच्या तक्रारी व प्रश्न अत्यंत संवेदनशीलतेने जाणून घेऊन, चौकशी करून तत्काळ कार्यवाही करण्यात येईल, असा विश्वास या सर्व मुलांना दिला होता.जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी सहायक समाजकल्याण आयुक्त रविकिरण पाटील यांना आपल्या कार्यालयात तातडीने बोलावून घेऊन मुलांना होणाºया त्रासाबाबत विचारणा करून महिला गृहपाल एम. जे. नरहरे यांना बदलून तत्काळ पुरुष गृहपाल नियुक्तीचे आदेश दिले. त्यानुसार समाज कल्याण निरीक्षक अनिल मोरे यांची गृहपाल म्हणून तत्काळ नियुक्ती करण्यात आली. दरम्यान, आमच्या समस्येची अत्यंत काळजीने दखल घेऊन केवळ २४ तासांच्या आत महिला गृहपाल एम. जे. नरहरे यांना बदलून अनिल मोरे यांची गृहपाल म्हणून तत्काळ नियुक्तीकेल्याबद्दल सर्व मुलांनी आनंद व्यक्त करून जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांचे आभार मानले. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई