शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
3
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
4
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
5
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
6
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
7
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
8
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
9
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
10
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
11
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
12
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
13
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
14
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
15
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
16
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
17
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
18
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
19
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
20
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत इफेक्ट - वसतिगृहात नवीन गृहपालांची नियुक्ती, विद्यार्थ्यांमध्ये समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 03:45 IST

गोंधळपाड्यात जिल्हाधिकाऱ्यांकडून चोवीस तासांत कारवाई

अलिबाग : तालुक्यातील गोंधळपाडा येथील मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहात महिला गृहपालांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाºयांना केली होती. याबाबत जिल्हाधिकाºयांनी त्वरित कारवाई केली आहे. महिला गृहपाल एम. जे. नरहरे यांना बदलून त्यांच्या जागी समाज कल्याण निरीक्षक अनिल मोरे यांची गृहपाल म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांची भेट घेऊन केली होती. शनिवारी ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच रायगड जिल्हा समाज कल्याण कार्यालयात एकच धावपळ उडाली होती तर सहायक समाज कल्याण आयुक्त रविकिरण पाटील सकाळीच वसतिगृहात पोहोचले.

महिला गृहपाल एम. जे. नरहरे गेल्या चार वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहाच्या महिला गृहपाल म्हणून कार्यरत आहेत. मात्र, मुलांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणे आणि मुलांच्यारूममध्ये जाऊन त्यांना मारहाण करणे, मुलांना वसतिगृहातून काढून टाकणे आदी प्रकारे सातत्याने मुलांना त्रास देत होत्या. वसतिगृहातील मुलांनी याबाबत समाज कल्याण अधिकाºयांना भेटून अनेक निवेदने दिली. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही गेल्या चार वर्षांत झाली नव्हती. अलीकडे महिला गृहपाल एम. जे. नरहरे यांच्याकडून मुलांना त्रास अधिक प्रमाणात वाढल्याने, त्रस्त झालेल्या ४० विद्यार्थ्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांच्या कार्यालयात त्यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्या वेळी डॉ.सूर्यवंशी यांनी या मुलांच्या तक्रारी व प्रश्न अत्यंत संवेदनशीलतेने जाणून घेऊन, चौकशी करून तत्काळ कार्यवाही करण्यात येईल, असा विश्वास या सर्व मुलांना दिला होता.जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी सहायक समाजकल्याण आयुक्त रविकिरण पाटील यांना आपल्या कार्यालयात तातडीने बोलावून घेऊन मुलांना होणाºया त्रासाबाबत विचारणा करून महिला गृहपाल एम. जे. नरहरे यांना बदलून तत्काळ पुरुष गृहपाल नियुक्तीचे आदेश दिले. त्यानुसार समाज कल्याण निरीक्षक अनिल मोरे यांची गृहपाल म्हणून तत्काळ नियुक्ती करण्यात आली. दरम्यान, आमच्या समस्येची अत्यंत काळजीने दखल घेऊन केवळ २४ तासांच्या आत महिला गृहपाल एम. जे. नरहरे यांना बदलून अनिल मोरे यांची गृहपाल म्हणून तत्काळ नियुक्तीकेल्याबद्दल सर्व मुलांनी आनंद व्यक्त करून जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांचे आभार मानले. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई