शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
4
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
5
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
6
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
7
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
8
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
9
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
10
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
11
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
12
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
13
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
14
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
15
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
16
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
17
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
18
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
19
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
20
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट

लॉकडाउनमुळे पनवेलमधील नद्या झाल्या स्वच्छ; जलचर प्राण्यांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 01:25 IST

किनारी भागातील पिकांसाठीही पाण्याचा उपयोग

कळंबोली : गेल्या अनेक दशकांपासून रसायनमिश्रित पाणी, गटाराचे सांडपाणी, मैलायुक्त पाणी, औद्योगिक वसाहतींचे प्रदूषित पाणी त्याचबरोबर शहरातला कचरा, जैविक कचरा अशा अनेक दूषित घटकांना आपल्यात सामावून घेणाऱ्या कासाडी, काळुंदे, गाढी आणि पाताळगंगा नदीचे पात्र लॉकडाउनमुळे स्वच्छ झाले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. मात्र पनवेल परिसरातील चारही नद्या या काळात निर्मळ झाल्या आहेत. नदी पात्राचे एक प्रकारे शुद्धीकरणच झाले आहे. नद्या प्रदूषणमुक्त झाल्याने जलचर प्राण्यांनाही जीवदान मिळाले आहे.

पनवेल तालुक्यातून गाढी, कासाडी, काळुंद्रे, पाताळगंगा अशा चार नद्या वाहतात. या नद्यांपैकी गाढी नदी महत्त्वाची मानली जाते. माथेरानच्या डोंगरातून उगम पावणाºया या नदीकिनारी ग्रामीण तसेच शहरी लोकवस्ती मोठ्या प्रमाणात आहे. इतरही जोडनद्या गाढी नदीतूनच तयार झाल्या आहेत. कासाडी नदी औद्योगिक वसाहतीमुळे प्रदूषित झाली आहे. शिरवलीच्या डोंगरातून उगम पावून तळोजा एमआयडीसी परिसरातून वाहत खाडीला मिळते. या नदीकिनारी काही कारखाने आहेत. अनेक कंपन्यांमधून नदीपात्रात रसायनमिश्रित पाणी सोडले जाते. त्यामुळे मासे तसेच इतर जलचर प्राणी मृत पावत आहेत. नदीपासून दोन किलोमीटरच्या परिसरात उग्र वास येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

काळुंद्रे व गाढी नदीतही कचरा, सांडपाणी, डेब्रिज, प्लास्टिक कचरा सर्रास टाकला जातो. दूषित पाण्यामुळे दुर्गंधी पसरते. याशिवाय डोळे चुरचुरणे, डोके दुखणे, दमा, अस्थमा, मलेरिया, डेंग्यू अशा आजारांनी अनेक नागरिक त्रस्त होतात. मात्र लॉकडाउनमुळे उद्योगधंदे, औद्योगिक वसाहतीतील बहुतांश कारखाने बंद असल्याने प्रदूषण घटले आहे. परिणामी रसायनमिश्रित सांडपाणी, कचरा नदीपात्रात मिसळणे बंद झाले आहे. त्यामुळे या चारही नद्या स्वच्छ झाल्या आहेत. नदी पात्रातील काळपटपणा, उग्र वास पूर्णपणे नष्ट झाला आहे. त्यामुळे हे पाणी नदीकिनारी पिकासाठी उपयुक्त ठरत आहे.

पर्यावरणप्रेमींकडून स्वागत

गाढी तसेच कासाडी नदी वाचवण्याकरिता पर्यावरणपे्रमींकडून परिश्रम केले जातात. सामाजिक संस्थेच्या माध्यमातून साफसफाई केली जाते. नदी पात्रातील पाणी दूषित होऊ नये यासाठी विविध उपाययोजना केल्या जातात. परंतु यंदा लॉकडाउनमुळे नदी पात्रातील पाणी शुद्ध झाले आहे. लॉकडाउननंतरही पाणी स्वच्छ, साफ राहील यासाठी प्रत्येक नागरिकाने प्रयत्न करावेत, असे मत पर्यावरणप्रेमी संतोष चिखलकर यांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याriverनदीNavi Mumbaiनवी मुंबई