शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाउनमुळे पनवेलमधील नद्या झाल्या स्वच्छ; जलचर प्राण्यांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 01:25 IST

किनारी भागातील पिकांसाठीही पाण्याचा उपयोग

कळंबोली : गेल्या अनेक दशकांपासून रसायनमिश्रित पाणी, गटाराचे सांडपाणी, मैलायुक्त पाणी, औद्योगिक वसाहतींचे प्रदूषित पाणी त्याचबरोबर शहरातला कचरा, जैविक कचरा अशा अनेक दूषित घटकांना आपल्यात सामावून घेणाऱ्या कासाडी, काळुंदे, गाढी आणि पाताळगंगा नदीचे पात्र लॉकडाउनमुळे स्वच्छ झाले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. मात्र पनवेल परिसरातील चारही नद्या या काळात निर्मळ झाल्या आहेत. नदी पात्राचे एक प्रकारे शुद्धीकरणच झाले आहे. नद्या प्रदूषणमुक्त झाल्याने जलचर प्राण्यांनाही जीवदान मिळाले आहे.

पनवेल तालुक्यातून गाढी, कासाडी, काळुंद्रे, पाताळगंगा अशा चार नद्या वाहतात. या नद्यांपैकी गाढी नदी महत्त्वाची मानली जाते. माथेरानच्या डोंगरातून उगम पावणाºया या नदीकिनारी ग्रामीण तसेच शहरी लोकवस्ती मोठ्या प्रमाणात आहे. इतरही जोडनद्या गाढी नदीतूनच तयार झाल्या आहेत. कासाडी नदी औद्योगिक वसाहतीमुळे प्रदूषित झाली आहे. शिरवलीच्या डोंगरातून उगम पावून तळोजा एमआयडीसी परिसरातून वाहत खाडीला मिळते. या नदीकिनारी काही कारखाने आहेत. अनेक कंपन्यांमधून नदीपात्रात रसायनमिश्रित पाणी सोडले जाते. त्यामुळे मासे तसेच इतर जलचर प्राणी मृत पावत आहेत. नदीपासून दोन किलोमीटरच्या परिसरात उग्र वास येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

काळुंद्रे व गाढी नदीतही कचरा, सांडपाणी, डेब्रिज, प्लास्टिक कचरा सर्रास टाकला जातो. दूषित पाण्यामुळे दुर्गंधी पसरते. याशिवाय डोळे चुरचुरणे, डोके दुखणे, दमा, अस्थमा, मलेरिया, डेंग्यू अशा आजारांनी अनेक नागरिक त्रस्त होतात. मात्र लॉकडाउनमुळे उद्योगधंदे, औद्योगिक वसाहतीतील बहुतांश कारखाने बंद असल्याने प्रदूषण घटले आहे. परिणामी रसायनमिश्रित सांडपाणी, कचरा नदीपात्रात मिसळणे बंद झाले आहे. त्यामुळे या चारही नद्या स्वच्छ झाल्या आहेत. नदी पात्रातील काळपटपणा, उग्र वास पूर्णपणे नष्ट झाला आहे. त्यामुळे हे पाणी नदीकिनारी पिकासाठी उपयुक्त ठरत आहे.

पर्यावरणप्रेमींकडून स्वागत

गाढी तसेच कासाडी नदी वाचवण्याकरिता पर्यावरणपे्रमींकडून परिश्रम केले जातात. सामाजिक संस्थेच्या माध्यमातून साफसफाई केली जाते. नदी पात्रातील पाणी दूषित होऊ नये यासाठी विविध उपाययोजना केल्या जातात. परंतु यंदा लॉकडाउनमुळे नदी पात्रातील पाणी शुद्ध झाले आहे. लॉकडाउननंतरही पाणी स्वच्छ, साफ राहील यासाठी प्रत्येक नागरिकाने प्रयत्न करावेत, असे मत पर्यावरणप्रेमी संतोष चिखलकर यांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याriverनदीNavi Mumbaiनवी मुंबई