शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

साहित्त्यव्रती, ज्येष्ठ साहित्यिक गजानन दर्णे यांचे ९३ व्या वर्षी निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2022 16:26 IST

उरण-केगाव येथील साहित्त्यव्रती ज्येष्ठ साहित्यिक गजानन दर्णे यांचे शुक्रवारी (११)  वयाच्या ९३ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आहे.

मधुकर ठाकूर

उरण  : उरण-केगाव येथील साहित्त्यव्रती ज्येष्ठ साहित्यिक गजानन दर्णे यांचे शुक्रवारी (११)  वयाच्या ९३ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. दांडा-केगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले, मुलगी,जावई सुना, नातवंडे असा परिवार आहे.

उरण-केगाव येथील ज्येष्ठ साहित्यिक गजानन दर्णे यांचा वयाच्या ९३ व्या वर्षीही साहित्याचा प्रवास अखंडपणे सुरू होता.तरुणांनाही लाजवेल अशा उत्साही या साहित्त्यव्रती साहित्यिकांचा " दोन एकर जमीन " हा शेवटचा कथा संग्रह  प्रकाशित झाला होता. गजानन दर्णे यांचे १२ कथांचे हे प्रकाशित झालेले १६ वे पुस्तक पुष्प होय.

  गेली ७३ वर्षाहून अधिक काळ ते सातत्याने लिखाण करीत आहेत.दै. चित्रामधून त्यांच्या गोष्टी प्रसिद्ध व्हायच्या. बाल दोस्तांसाठीही दै. नवशक्तीमधून नियमित लिखाण करायचे. त्यांच्या ‘कोळ्याचे जाळे’ या कथेवर ज्येष्ठ व्यंगचित्रकार दिवंगत हिंदूहद्य सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ६२ वर्षापूर्वी चितारले होते. त्यांची आतापर्यंत कुसुम गुच्छ ,खोटी आदेली,चिमणे चंडोल, ज्येष्ठ पर्व,देवदूत, लाल्या, गणपतीच्या गोष्टी,कथा गणेशाच्या, कोळ्यांचे जाळे, महादेवाचा नंदी, चांदोबाची दिवाळी, हत्ती शाळेत जातो,दिक्षा, सुट्टीची कमाई, आणि डोंगर चालत आला,दोन एकर जमीन आदी १६ पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. त्यांच्या कथा, कवितांची संख्या बरीच मोठी आहे.ब्रेल लिपित (अंध भाषा) त्यांची ७ पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. मागील ७२ वर्षाहून अधिक काळ ते सातत्याने लिखाण करीत आहेत. वयाच्या ९३ व्या वर्षी ते विविध वर्तमान पत्रांसाठी लघुकथा व  इतरत्रही लिखाण सुरुच होते.

आकाशवाणी मुंबई केंद्रानेही ‘गम्मत जम्मत’ या कार्यक्रमात त्यांचे ३४ कार्यक्रम प्रसारित केलेले होते. त्यांच्या ‘ज्येष्ठपर्व’ या पुस्तकाला टाईम्स ऑफ इंडियाने त्यांना विशेष प्रसिद्धी दिली होती. पंचक्रोशीतल्या ३४ जेष्ठांची माहिती असलेल्या या पुस्तकाला ‘डीएनए’ने वर्डस्मीत (शब्दाचे सोनार) अस म्हटलं आहे. तर दै. सामनाने त्यांना उरणचे गुणी लेखक असे संबोधले आहे. अनेकांनी त्यांना साहित्य तपस्वी म्हटलं आहे. मुंबई परळ येथे अ.भा. पत्रकार संघटनेने दामोदर नाट्यगृहात ‘साहित्यरत्न’ हा बहुमानाचा पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले होते. 

 दर्णेना नाटकात काम करण्याची आवड होती.त्यांनी स्थानिक पातळीवर काही नाटकातही काम केले होते.क्रिकेटची आवड असलेल्या दर्णे यांनी उरण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष पदही भुषविले आहे. राष्ट्रसेवादलाचे त्यांनी काम केले आहे.काही काळ ते उरण पूर्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. नव्वदीनंतरही हा युवा साहित्यिक " ना कधी थकला ना कधी दमला.  गजानन दर्णे यांची साहित्य सेवा नित्यनेमाने सुरुच होती.नुकताच " दोन एकर जमीन " हा कथा संग्रह प्रकाशित करुन 'अभी तक तो मैं जवान हूॅ ' ची झलक त्यांनी तरुणाईला दाखवून दिली होती. अशा या साहित्त्यव्रती गजानन दर्णे यांची एक्झिट साहित्यिकांना चटका लावणारी आहे.

टॅग्स :MumbaiमुंबईNavi Mumbaiनवी मुंबई