शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
3
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
4
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
5
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
6
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
7
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
8
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
9
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
10
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
11
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
12
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
13
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
14
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
15
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
16
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
17
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
18
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
19
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
20
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...

शहरात विजेचा लपंडाव सुरू

By admin | Updated: June 3, 2016 02:04 IST

मान्सूनपूर्व उकाडा, त्यात सुरु असलेल्या विजेच्या खेळामुळे नवी मुंबईकर त्रस्त झालेत. कोपरखैरणे, तुर्भे, सानपाडा, घणसोली, बेलापूर या परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत

नवी मुंबई : मान्सूनपूर्व उकाडा, त्यात सुरु असलेल्या विजेच्या खेळामुळे नवी मुंबईकर त्रस्त झालेत. कोपरखैरणे, तुर्भे, सानपाडा, घणसोली, बेलापूर या परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. तुर्भे, कोपरखैरणे परिसरात तर दिवसातून तीन ते चार वेळा वीजपुरवठा खंडित होत असल्याने या परिसरातील नागरिक घामाच्या धारांनी त्रस्त झाले आहे. आठवडाभरापासून सुरु असलेल्या विजेच्या खेळामुळे दुकानदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यापूर्वी आठवड्यातून एक दिवस वीजपुरवठा खंडित केला जात होता मात्र आता सोमवारपासून दररोज विजेचा लपंडाव सुरु आहे. याबाबत परिसरातील नागरिकांनी तक्रार केली असून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या समस्येबाबत महावितरणशी संपर्क साधला असता त्यांनी मान्सूनपूर्व काम सुरु असल्याचे सांगितले. बेलापूर परिसरातही बुधवारी दुपारी तीन ते चार वेळा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. विजेच्या लपंडावामुळे संतप्त नागरिकांनी वेळ आल्यास आंदोलन करण्याचा इशारा महावितरणला दिला आहे. तुर्भे, कोपरखैरणे परिसरात तर दोन आठवड्यांपासून विजेचा खेळ सुरु असून काही महिन्यांपूर्वीदेखील या परिसरात दिवसा तसेच रात्रीही वीजपुरवठा खंडित केला जात असल्याची माहिती नागरिकांनी दिली.भारनियमनामुळे ग्रामीण नागरिक त्रस्तपनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात दररोज सहा ते सात तास भारनियमन करण्यात येत आहे. आधीच उकाड्याने हैराण झालेले नागरिक त्यामुळे भायनियमनामुळे आणखी हैराण झाले आहेत. वीज तुटवडा भरून न निघाल्यास या भारनियमनात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे भारनियमन किती दिवस करण्यात येणार आहे, याबाबतही महावितरणकडून सांगण्यात आलेले नाही. गव्हाण, नेरे, पनवेल १, पारगाव, वावंजे या पाच फिडरमध्ये महावितरणचे जवळपास ७० हजार ग्राहक असून त्यांना भारनियमनाचा फटका बसत आहे. तालुक्यातील ५ फिडरवर दररोज सहा ते सात तास भारनियमन करण्यात येणार असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे. आधीच उन्हाचा उकाडा त्यात भारनियमन केल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. पनवेलमधील ग्रामीण भागातील नागरिकांना एकीकडे पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे तर दुसरीकडे भारनियमनामुळे ते त्रस्त आहेत. यासंदर्भात महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अनिल मस्के यांच्याकडे विचारणा केली असता, तांत्रिक अडचणींमुळे भारनियमन घेण्यात येत असून ते तीन ते चार दिवस असेल असे सांगण्यात आले.