शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शहरात विजेचा लपंडाव सुरू

By admin | Updated: June 3, 2016 02:04 IST

मान्सूनपूर्व उकाडा, त्यात सुरु असलेल्या विजेच्या खेळामुळे नवी मुंबईकर त्रस्त झालेत. कोपरखैरणे, तुर्भे, सानपाडा, घणसोली, बेलापूर या परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत

नवी मुंबई : मान्सूनपूर्व उकाडा, त्यात सुरु असलेल्या विजेच्या खेळामुळे नवी मुंबईकर त्रस्त झालेत. कोपरखैरणे, तुर्भे, सानपाडा, घणसोली, बेलापूर या परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. तुर्भे, कोपरखैरणे परिसरात तर दिवसातून तीन ते चार वेळा वीजपुरवठा खंडित होत असल्याने या परिसरातील नागरिक घामाच्या धारांनी त्रस्त झाले आहे. आठवडाभरापासून सुरु असलेल्या विजेच्या खेळामुळे दुकानदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यापूर्वी आठवड्यातून एक दिवस वीजपुरवठा खंडित केला जात होता मात्र आता सोमवारपासून दररोज विजेचा लपंडाव सुरु आहे. याबाबत परिसरातील नागरिकांनी तक्रार केली असून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या समस्येबाबत महावितरणशी संपर्क साधला असता त्यांनी मान्सूनपूर्व काम सुरु असल्याचे सांगितले. बेलापूर परिसरातही बुधवारी दुपारी तीन ते चार वेळा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. विजेच्या लपंडावामुळे संतप्त नागरिकांनी वेळ आल्यास आंदोलन करण्याचा इशारा महावितरणला दिला आहे. तुर्भे, कोपरखैरणे परिसरात तर दोन आठवड्यांपासून विजेचा खेळ सुरु असून काही महिन्यांपूर्वीदेखील या परिसरात दिवसा तसेच रात्रीही वीजपुरवठा खंडित केला जात असल्याची माहिती नागरिकांनी दिली.भारनियमनामुळे ग्रामीण नागरिक त्रस्तपनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात दररोज सहा ते सात तास भारनियमन करण्यात येत आहे. आधीच उकाड्याने हैराण झालेले नागरिक त्यामुळे भायनियमनामुळे आणखी हैराण झाले आहेत. वीज तुटवडा भरून न निघाल्यास या भारनियमनात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे भारनियमन किती दिवस करण्यात येणार आहे, याबाबतही महावितरणकडून सांगण्यात आलेले नाही. गव्हाण, नेरे, पनवेल १, पारगाव, वावंजे या पाच फिडरमध्ये महावितरणचे जवळपास ७० हजार ग्राहक असून त्यांना भारनियमनाचा फटका बसत आहे. तालुक्यातील ५ फिडरवर दररोज सहा ते सात तास भारनियमन करण्यात येणार असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे. आधीच उन्हाचा उकाडा त्यात भारनियमन केल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. पनवेलमधील ग्रामीण भागातील नागरिकांना एकीकडे पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे तर दुसरीकडे भारनियमनामुळे ते त्रस्त आहेत. यासंदर्भात महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अनिल मस्के यांच्याकडे विचारणा केली असता, तांत्रिक अडचणींमुळे भारनियमन घेण्यात येत असून ते तीन ते चार दिवस असेल असे सांगण्यात आले.