शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
2
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
3
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
4
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
5
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
6
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
7
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे आयोजित रक्तदान कार्यक्रमाने रचले २ विश्वविक्रम
8
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
9
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
10
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
11
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
12
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
13
पहिल्यांदाच शेअर वाटायची तयारी, दोन दिवसांत 40% हून अधिक वधारला हा शेअर, केलं मालामाल!
14
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा, भाऊ रणजीत झा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी
15
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
16
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
17
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
18
Nana Patekar : नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
19
'झिरो फिगर'च्या होण्यासाठी केलं खतरनाक डाएटिंग! तरुणी मरता मरता वाचली; भयानकच अनुभव..
20
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर

शहरात विजेचा लपंडाव सुरू

By admin | Updated: June 3, 2016 02:04 IST

मान्सूनपूर्व उकाडा, त्यात सुरु असलेल्या विजेच्या खेळामुळे नवी मुंबईकर त्रस्त झालेत. कोपरखैरणे, तुर्भे, सानपाडा, घणसोली, बेलापूर या परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत

नवी मुंबई : मान्सूनपूर्व उकाडा, त्यात सुरु असलेल्या विजेच्या खेळामुळे नवी मुंबईकर त्रस्त झालेत. कोपरखैरणे, तुर्भे, सानपाडा, घणसोली, बेलापूर या परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. तुर्भे, कोपरखैरणे परिसरात तर दिवसातून तीन ते चार वेळा वीजपुरवठा खंडित होत असल्याने या परिसरातील नागरिक घामाच्या धारांनी त्रस्त झाले आहे. आठवडाभरापासून सुरु असलेल्या विजेच्या खेळामुळे दुकानदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यापूर्वी आठवड्यातून एक दिवस वीजपुरवठा खंडित केला जात होता मात्र आता सोमवारपासून दररोज विजेचा लपंडाव सुरु आहे. याबाबत परिसरातील नागरिकांनी तक्रार केली असून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या समस्येबाबत महावितरणशी संपर्क साधला असता त्यांनी मान्सूनपूर्व काम सुरु असल्याचे सांगितले. बेलापूर परिसरातही बुधवारी दुपारी तीन ते चार वेळा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. विजेच्या लपंडावामुळे संतप्त नागरिकांनी वेळ आल्यास आंदोलन करण्याचा इशारा महावितरणला दिला आहे. तुर्भे, कोपरखैरणे परिसरात तर दोन आठवड्यांपासून विजेचा खेळ सुरु असून काही महिन्यांपूर्वीदेखील या परिसरात दिवसा तसेच रात्रीही वीजपुरवठा खंडित केला जात असल्याची माहिती नागरिकांनी दिली.भारनियमनामुळे ग्रामीण नागरिक त्रस्तपनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात दररोज सहा ते सात तास भारनियमन करण्यात येत आहे. आधीच उकाड्याने हैराण झालेले नागरिक त्यामुळे भायनियमनामुळे आणखी हैराण झाले आहेत. वीज तुटवडा भरून न निघाल्यास या भारनियमनात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे भारनियमन किती दिवस करण्यात येणार आहे, याबाबतही महावितरणकडून सांगण्यात आलेले नाही. गव्हाण, नेरे, पनवेल १, पारगाव, वावंजे या पाच फिडरमध्ये महावितरणचे जवळपास ७० हजार ग्राहक असून त्यांना भारनियमनाचा फटका बसत आहे. तालुक्यातील ५ फिडरवर दररोज सहा ते सात तास भारनियमन करण्यात येणार असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे. आधीच उन्हाचा उकाडा त्यात भारनियमन केल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. पनवेलमधील ग्रामीण भागातील नागरिकांना एकीकडे पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे तर दुसरीकडे भारनियमनामुळे ते त्रस्त आहेत. यासंदर्भात महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अनिल मस्के यांच्याकडे विचारणा केली असता, तांत्रिक अडचणींमुळे भारनियमन घेण्यात येत असून ते तीन ते चार दिवस असेल असे सांगण्यात आले.