शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

जात पडताळणी कार्यालयावरील भार हलका

By admin | Updated: February 14, 2017 04:27 IST

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकण भवन येथील जात पडताळणी कार्यालयाकडे जात पडताळणीसाठी ३४६ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.

सूर्यकांत वाघमारे / नवी मुंबई निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकण भवन येथील जात पडताळणी कार्यालयाकडे जात पडताळणीसाठी ३४६ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. यंदा प्रथमच शासन निर्णयानुसार केवळ विजयी उमेदवारालाच जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करायचे आहे. यामुळे जात पडताळणी कार्यालयावरील कामाचा ७० टक्के भार हलका झाला आहे. राज्यात महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. कोकण परिक्षेत्रात देखील जिल्हा परिषद व पंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीच्या रिंगणात नशीब आजमावणाऱ्या उमेदवारांना यंदा अर्जासोबत जात पडताळणी प्रमाणपत्र जोडण्याच्या प्रक्रियेतून सुटका मिळालेली आहे. यामुळे इच्छुक उमेदवार जितके सुखावले आहेत, तितकाच आनंद जात पडताळणी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना देखील झाला आहे. यापूर्वी उमेदवारी अर्ज सादर करतानाच जात पडताळणी प्रमाणपत्र जोडावे लागत होते. यामुळे जात पडताळणी कार्यालयाकडे शेकडो अर्ज दाखल व्हायचे. हे सर्व अर्ज अवघ्या १० ते १५ दिवसांत निकाली काढण्याच्या कामाचा अतिरिक्त ताण कर्मचाऱ्यांवर पडायचा. यामध्ये त्रुटी होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. शिवाय विद्यार्थ्यांकडून आलेले अर्ज देखील निश्चित मुदतीत काढण्याचे काम करावे लागायचे.परंतु यंदा प्रथमच झालेल्या शासन निर्णयाने उमेदवारांइतकाच जात पडताळणी कार्यालयातील कर्मचारी देखील सुखावला आहे. गत महिन्यात झालेल्या शासन निर्णयानुसार निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारालाच सहा महिन्यापर्यंत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. यामुळे जात पडताळणी कार्यालयावरील निवडणूक काळातला कामाचा ७० टक्के भार हलका झाला आहे. हेच चित्र कोकण भवन येथील जिल्हा जात पडताळणी कार्यालयात पहायला मिळत आहे. एरवी निवडणूक काळात नेहमी गजबजलेल्या या कार्यालय आवारातला गर्दीचा ओस घटला आहे. शिवाय निवडणूक काळात या कार्यालयाकडे जात पडताळणीसाठी सुमारे १२०० पेक्षा जास्त अर्ज प्राप्त होत असत. यंदा मात्र त्यात घट होवून रायगडमधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवघे ३४६ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी फक्त विजयी उमेदवारांचेच अर्ज निकाली काढले जाणार आहेत. ही प्रक्रिया देखील निकालानंतर सुरू होणार आहे. विजयी उमेदवाराने निकालाचे प्रमाणपत्र जात पडताळणी कार्यालयाकडे सादर केल्यानंतरच या प्रक्रियेला खऱ्या अर्थाने गती मिळणार आहे.शैक्षणिक कारणासाठी विद्यार्थ्यांकडून आलेल्या अर्जांपेक्षा निवडणुकीसाठी आलेले अर्ज निकाली काढण्यात कर्मचाऱ्यांची दमछाक व्हायची. अल्प कालावधीत हे अर्ज निकाली काढावे लागायचे.