शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

जात पडताळणी कार्यालयावरील भार हलका

By admin | Updated: February 14, 2017 04:27 IST

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकण भवन येथील जात पडताळणी कार्यालयाकडे जात पडताळणीसाठी ३४६ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.

सूर्यकांत वाघमारे / नवी मुंबई निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकण भवन येथील जात पडताळणी कार्यालयाकडे जात पडताळणीसाठी ३४६ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. यंदा प्रथमच शासन निर्णयानुसार केवळ विजयी उमेदवारालाच जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करायचे आहे. यामुळे जात पडताळणी कार्यालयावरील कामाचा ७० टक्के भार हलका झाला आहे. राज्यात महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. कोकण परिक्षेत्रात देखील जिल्हा परिषद व पंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीच्या रिंगणात नशीब आजमावणाऱ्या उमेदवारांना यंदा अर्जासोबत जात पडताळणी प्रमाणपत्र जोडण्याच्या प्रक्रियेतून सुटका मिळालेली आहे. यामुळे इच्छुक उमेदवार जितके सुखावले आहेत, तितकाच आनंद जात पडताळणी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना देखील झाला आहे. यापूर्वी उमेदवारी अर्ज सादर करतानाच जात पडताळणी प्रमाणपत्र जोडावे लागत होते. यामुळे जात पडताळणी कार्यालयाकडे शेकडो अर्ज दाखल व्हायचे. हे सर्व अर्ज अवघ्या १० ते १५ दिवसांत निकाली काढण्याच्या कामाचा अतिरिक्त ताण कर्मचाऱ्यांवर पडायचा. यामध्ये त्रुटी होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. शिवाय विद्यार्थ्यांकडून आलेले अर्ज देखील निश्चित मुदतीत काढण्याचे काम करावे लागायचे.परंतु यंदा प्रथमच झालेल्या शासन निर्णयाने उमेदवारांइतकाच जात पडताळणी कार्यालयातील कर्मचारी देखील सुखावला आहे. गत महिन्यात झालेल्या शासन निर्णयानुसार निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारालाच सहा महिन्यापर्यंत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. यामुळे जात पडताळणी कार्यालयावरील निवडणूक काळातला कामाचा ७० टक्के भार हलका झाला आहे. हेच चित्र कोकण भवन येथील जिल्हा जात पडताळणी कार्यालयात पहायला मिळत आहे. एरवी निवडणूक काळात नेहमी गजबजलेल्या या कार्यालय आवारातला गर्दीचा ओस घटला आहे. शिवाय निवडणूक काळात या कार्यालयाकडे जात पडताळणीसाठी सुमारे १२०० पेक्षा जास्त अर्ज प्राप्त होत असत. यंदा मात्र त्यात घट होवून रायगडमधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवघे ३४६ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी फक्त विजयी उमेदवारांचेच अर्ज निकाली काढले जाणार आहेत. ही प्रक्रिया देखील निकालानंतर सुरू होणार आहे. विजयी उमेदवाराने निकालाचे प्रमाणपत्र जात पडताळणी कार्यालयाकडे सादर केल्यानंतरच या प्रक्रियेला खऱ्या अर्थाने गती मिळणार आहे.शैक्षणिक कारणासाठी विद्यार्थ्यांकडून आलेल्या अर्जांपेक्षा निवडणुकीसाठी आलेले अर्ज निकाली काढण्यात कर्मचाऱ्यांची दमछाक व्हायची. अल्प कालावधीत हे अर्ज निकाली काढावे लागायचे.