शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वीटभट्टी कामगाराची गुलामगिरीतून सुटका, खांदेश्वरमधील घटना

By सूर्यकांत वाघमारे | Updated: March 3, 2024 16:44 IST

पनवेल परिसरातील नेवाळी गावातील वीटभट्टीच्या ठिकाणी ही घटना घडली आहे. याप्रकरणी वीटभट्टी चालवणाऱ्या बबन काथारा याच्या विरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवी मुंबई - उसन्या घेतलेल्या २९ हजार ५०० रुपयांसाठी दांपत्याला ५ वर्षे गुलामगिरीत ठेवून राबवल्याची घटना समोर आली आहे. दांपत्याच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन त्यांना उसने दिलेल्या पैशाच्या बदल्यात वीटभट्टी कामगार त्यांना राबवून घेत होते. त्यातच काम न केल्यास अमानुष मारहाण देखील केल्याने अखेर या प्रकरणाला वाचा फुटली आहे. 

पनवेल परिसरातील नेवाळी गावातील वीटभट्टीच्या ठिकाणी ही घटना घडली आहे. याप्रकरणी वीटभट्टी चालवणाऱ्या बबन काथारा याच्या विरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरात झोपडीत राहणाऱ्या दत्तू हिलम (४५) याने काही वर्षांपूर्वी बबनकडून टप्प्या टप्प्याने एकूण २९ हजार ५०० रुपये उसने घेतले होते. मुलाच्या लग्नासह इतर कारणांसाठी दांपत्याने हि उचल घेतली होती. त्या बदल्यात बबन याने २०१९ मध्ये दोघा पती पत्नीला त्याच्या वीटभट्टीवर कामाला ठेवून घेतले होते. त्यांना केवळ जेवण बनवायचे वेळेत रिकामे सोडले जात होते. शिवाय कामावर गैरहजर राहिल्यास अमानुष मारहाण केली जायची.

१ मार्चला दत्तूची तब्बेत ठीक नसल्याने कामावर न आल्याच्या रागात बबन याने फावड्याने त्याला मारहाण केली होती. यामध्ये रक्तबंबाळ होऊनही अशिक्षित असल्याने व बबनच्या दहशतीमुळे जखमी अवस्थेतच ते झोपडीत पडून होता. याची माहिती मिळताच श्रमजीवी संघटनेचे रामदास वाघ, हिरामण नाईक यांनी त्यांना पोलिसांकडे नेले असता पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार बबन काथारा याच्यावर बंधबिगार पद्धती (उच्चाटन) अधिनियम अंतर्गत खांदेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCrime Newsगुन्हेगारी