शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

मुसळधार पावसामुळे ४०० टन भाजीपाला वाया, ग्राहकांनी मार्केटकडे फिरविली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 00:17 IST

मुंबईसह राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीचा परिणाम मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यवहारावर झाला आहे. किरकोळ विक्रेते-ग्राहकांनी पाठ फिरविल्याने मोठ्या प्रमाणात भाजीपाला शिल्लक राहिला असून सुमारे ४०० टन माल फेकून द्यावा लागला आहे.

नवी मुंबई : मुंबईसह राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीचा परिणाम मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यवहारावर झाला आहे. किरकोळ विक्रेते-ग्राहकांनी पाठ फिरविल्याने मोठ्या प्रमाणात भाजीपाला शिल्लक राहिला असून सुमारे ४०० टन माल फेकून द्यावा लागला आहे.अतिवृष्टीचा मोठा फटका राज्यातील शेतकºयांना बसला आहे. बुधवारी मुंबई बाजार समितीमध्ये तब्बल ५१५ ट्रक व टेम्पोमधून शेतमाल विक्रीसाठी आला होता. परंतु मुंबई जलमय झाल्याने किरकोळ विक्रेते मालखरेदीसाठी कमी प्रमाणात आले. परिणामी, एक हजार टनांपेक्षा जास्त कृषी मालाची विक्रीच झाली नाही. पावसामुळे भिजून खराब झाल्याने मोठ्या प्रमाणात भाजीपाला फेकून द्यावा लागला. सडलेल्या मालाचे ढीग मार्केटमध्ये सर्वत्र पाहावयास मिळत होते. शिल्लक राहिलेला माल उद्या कमी किमतीमध्ये विकला जाईल.कांदा-बटाटा मार्केटमध्येही १२५ वाहनांची आवक झाली होती; परंतु त्यामधील फक्त २७ वाहनांमधील मालाचीच विक्री झाली आहे. फळ मार्केटमध्ये २०८ वाहनांची आवक झाली त्यात ८३ वाहनांमधील फळांचीच विक्री झाली आहे. गुरुवारी व्यवहार सुरळीत होतील, असा विश्वास व्यापाºयांनी व्यक्त केला आहे.मुंबईमध्ये अतिवृष्टी झाल्याने ग्राहकांनी मार्केटकडे पाठ फिरविली होती. जवळपास २० ते २५ टक्के माल शिल्लक राहिला असून, गुरुवारी सर्व व्यवहार सुरळीत होतील.- शंकर पिंगळे, व्यापारी एपीएमसीमार्केटचे नाव आवककांदा-बटाटा मार्केट १२५ गाड्याफळ मार्केट २०८ गाड्याभाजीपाला मार्केट ५१५ गाड्यामसाला मार्केट ०८४ गाड्याधान्य बाजार १८० गाड्या