शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
3
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
4
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
5
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
6
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
7
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
8
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
10
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
11
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
12
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
13
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
14
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
16
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
17
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
18
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
19
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
20
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
Daily Top 2Weekly Top 5

ऐरोलीत स्पर्धा परीक्षार्थ्यांसाठी व्याख्यान, महापालिकेचा उपक्रम

By योगेश पिंगळे | Updated: March 5, 2024 16:46 IST

तरुणाईचा उत्साही प्रतिसाद

नवी मुंबई : भारतीय संविधान दिनाच्या अमृतमहोत्सवी पर्वानिमित्त ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामधील एक अभिनव उपक्रम तरुणाईच्या उत्साही उपस्थितीत झाला. यामध्ये वर्धा येथील नालंदा अकॅडमीचे संस्थापक अनुप कुमार यांनी ‘स्पर्धा परीक्षा आणि उच्च शिक्षण' या विषयावर युवकांशी थेट संवाद साधत अनेक बाबींवर प्रकाशझोत टाकला.

सर्वसाधारणपणे आपल्याकडील युवकांचे ध्येय सरकारी नोकरी हे असते. यासाठी यूपीएससी, एमपीएससी अशा स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी जीवनातील महत्त्वाची चार ते पाच वर्षे द्यावी लागतात. या पलीकडेही मोठे विश्व असून, तिथेही करिअरच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत, त्यांचा लाभ घेतला पाहिजे, असे अनुप कुमार यांनी सांगितले. मुलांनी चांगले उच्च शिक्षण घ्यावे, ज्ञानी व्हावे, हे लक्ष्य नजरेसमोर ठेवून वाटचाल केली पाहिजे, असे सांगत त्यांनी उच्च शिक्षणाच्या तसेच नोकरी-व्यवसायाच्या अनेक पर्यायांचा खजिना उपस्थितांसमोर खुला केला.

यावेळी त्यांनी उपस्थित युवकांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली व युवकांच्या माहिती आणि ज्ञानात भर टाकली. यावेळी समाजविकास विभागाचे उपायुक्त किसनराव पलांडे, दिघा विभागाचे विभाग अधिकारी डॉ. कैलास गायकवाड, कार्यकारी अभियंता प्रवीण गाडे, समाजविकास अधिकारी सर्जेराव परांडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई