शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

ऐरोलीत स्पर्धा परीक्षार्थ्यांसाठी व्याख्यान, महापालिकेचा उपक्रम

By योगेश पिंगळे | Updated: March 5, 2024 16:46 IST

तरुणाईचा उत्साही प्रतिसाद

नवी मुंबई : भारतीय संविधान दिनाच्या अमृतमहोत्सवी पर्वानिमित्त ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामधील एक अभिनव उपक्रम तरुणाईच्या उत्साही उपस्थितीत झाला. यामध्ये वर्धा येथील नालंदा अकॅडमीचे संस्थापक अनुप कुमार यांनी ‘स्पर्धा परीक्षा आणि उच्च शिक्षण' या विषयावर युवकांशी थेट संवाद साधत अनेक बाबींवर प्रकाशझोत टाकला.

सर्वसाधारणपणे आपल्याकडील युवकांचे ध्येय सरकारी नोकरी हे असते. यासाठी यूपीएससी, एमपीएससी अशा स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी जीवनातील महत्त्वाची चार ते पाच वर्षे द्यावी लागतात. या पलीकडेही मोठे विश्व असून, तिथेही करिअरच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत, त्यांचा लाभ घेतला पाहिजे, असे अनुप कुमार यांनी सांगितले. मुलांनी चांगले उच्च शिक्षण घ्यावे, ज्ञानी व्हावे, हे लक्ष्य नजरेसमोर ठेवून वाटचाल केली पाहिजे, असे सांगत त्यांनी उच्च शिक्षणाच्या तसेच नोकरी-व्यवसायाच्या अनेक पर्यायांचा खजिना उपस्थितांसमोर खुला केला.

यावेळी त्यांनी उपस्थित युवकांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली व युवकांच्या माहिती आणि ज्ञानात भर टाकली. यावेळी समाजविकास विभागाचे उपायुक्त किसनराव पलांडे, दिघा विभागाचे विभाग अधिकारी डॉ. कैलास गायकवाड, कार्यकारी अभियंता प्रवीण गाडे, समाजविकास अधिकारी सर्जेराव परांडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई