शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
2
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
3
एखाद्याला खासदार करायचं म्हटल्यावर करतो अन् पाडायचं म्हटलं तर पाडतोच' अजित पवारांची टोलेबाजी
4
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
5
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
6
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
7
ग्रावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी
8
"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल
9
ना दीपिका, ना कतरिना अन् नाही आलिया, सर्वात आधी या प्रसिद्ध क्रिकेटरच्या पत्नीच्या प्रेमात होता रणबीर
10
जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश
11
5 महिन्यात 3 बैठका; भारत-अफगाणिस्तानची वाढती जवळीक, पाक सरकारची डोकेदुखी वाढणार
12
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीचा उपास सोडताना 'या' चुका टाळा नाहीतर उपासना जाईल वाया!
13
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
14
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न
15
आम्ही भारतात गुंतवणूक करतच राहू; भारत सरकारला.., Apple चा ट्रम्पना मोठा झटका
16
सैन्याला मिळणार ₹50,000 कोटींचा बुस्टर डोस; ऑपरेशन सिंदूरनंतर सरकार तिजोरी उघडणार
17
Sankashthi Chaturthi 2025: मन अस्थिर, अशांत असेल त्याक्षणी म्हणा किंवा ऐका 'हे' गणेशस्तोत्र!
18
मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतर मेहता नरमले; गेल्या दोन वर्षांपासून बंद पडलेले काशिगाव मेट्रो स्थानकाच्या जिन्याचे काम सुरु झाले
19
घर आणि गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! RBI रेपो रेट ०.७५% ने कमी करू शकते; किती येईल EMI
20
भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार... 

पनवेलमध्ये आघाडीचे वर्चस्व

By admin | Updated: February 24, 2017 08:02 IST

जिल्हा परिषद व पनवेल पंचायत समितीच्या निवडणुकीत शेतकरी कामगार

 पनवेल : जिल्हा परिषद व पनवेल पंचायत समितीच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीने वर्चस्व राखले आहे, तर भाजपाने दुसरा क्र मांक गाठला असून, शिवसेनेला मात्र भोपळाही फोडता आला नाही. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी जल्लोष करत विजयोत्सव साजरा केला.जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक २१ फेब्रुवारी रोजी पार पडली होती. रायगड जिल्हा परिषदेच्या आठ व पनवेल पंचायत समितीच्या सोळा जागांसाठी निवडणूक रिंगणात ६२ उमेदवार होते. पनवेलमधून ८०.३३ टक्के मतदान झाल्याने कुणाचा विजय व कुणाचा पराभव होणार हे पाहण्यासाठी पनवेल शहरातील व्ही.के. हायस्कूल येथे मतमोजणी झाली. जिल्हा परिषदेवर शेकाप आघाडीने ६ जागा मिळवल्या तर भाजपाला दोन जागांवर समाधान मानावे लागले. तर पंचायत समितीच्या निवडणुकीत शेकाप आघाडीला १० जागा तर भाजपाने जोरदार मुसंडी मारत ६ जागांवर विजय मिळवला. या ६ जागांमुळे तालुक्यात भाजपा आपले पाय पसरत असल्याचे दिसून आले. मात्र स्वबळावर लढणाऱ्या शिवसेनेला एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही. जिल्हा परिषद व पंचायत समितीत ते भोपळा देखील फोडू शकले नाहीत.जिल्हा परिषदेच्या ८ जागांसाठी शेकापने ८ उमेदवार , भाजपाने ६, काँग्रेसने ०, शिवसेनेने ५, बसपा १, भारिप १, अपक्ष २ असे २३ उमेदवार तर पंचायत समितीच्या १६ जागांसाठी शेकापने १२, भाजपा १४, काँग्रेस ४, शिवसेना ७, अपक्ष २ असे ३९ उमेदवार उभे केले होते. यापैकी गुरु वारी झालेल्या मतमोजणीत जिल्हा परिषदेत शेकाप आघाडीचे ६ तर भाजपाचे २ उमेदवार विजयी झाले. यात भाजपाचे माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील यांच्या पत्नी लीना पाटील यांचा राजेश्री भोपी यांनी ५२० मतांनी पराभव केला. राजेश्री भोपी यांनी सुकापूर गण सोडून पळस्पे गणातून उमेदवारी लढवली. तर शेकापचे माजी सभापती काशिनाथ पाटील यांनी भाजपाच्या प्रकाश खैरे यांचा पंधराशेहून अधिक मतांनी पराभव करत एकतर्फी विजय संपादन केला. शेकापमधून भाजपामध्ये गेलेले एकनाथ देशेकर यांच्या पत्नी कमला देशेकर यांना पंचायत समितीच्या चिंध्रण गणातून पराभव पत्करावा लागला आहे. शेकापच्या वृषाली देशेकर यांनी त्यांचा ३७६ मतांनी पराभव केला आहे. पंचायत समितीच्या आदई गणातून भाजपाचे भूपेंद्र पाटील विजयी झाले असून २०१२ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. भाजपाचे विनोद साबळे यांना देखील गुळसुंदे गणातून पराभव पत्करावा लागला. भाजपातर्फे पंचायत समितीच्या गुळसुंदे गणातून उमेदवारी लढवणारे एकमेव पीएचडी उमेदवार पराभूत झाले आहेत. शेकापच्या जगदीश पवार यांनी त्यांचा १३०० हून अधिक मतांनी पराभव केला आहे.जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शेकापने वावंजे, पळस्पे, गुळसुंदे, वडघर, गव्हाण, केळवणे तर भाजपाने नेरे, पाली देवद येथे विजय प्राप्त केला. पंचायत समितीच्या निवडणुकीत शेकापने पाली देवद, विचुंबे, केळवणे, कोन, गुळसुंदे, वावंजे, चिंध्रण येथे तर भाजपाने आदई, वहाळ, गव्हाण, आपटा, वडघर, नेरे आणि काँग्रेसने पळस्पे, पोयंजे, करंजाडे या गणात विजय संपादन केला. भाजपाने गव्हाण (उलवा) येथे प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आणले होते, मात्र पनवेलमध्ये ते कोणताही करिष्मा करू शकलेले नाहीत. काही महिन्यांतच पनवेल महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत शेकाप काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी होणार आहे. मात्र शिवसेना व भाजपा यांची युती होणार की नाही हे येणारा काळच ठरविणार आहे. पनवेलमधून शेकापने निवडणुकीत आपला गड राखला आहे.