शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

सेमिकंडक्टरची राजधानी : नवी मुंबई

By नारायण जाधव | Updated: September 23, 2024 08:04 IST

प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर नवी मुंबई शहर देशाचे डेटा सेंटर्सचे माहेरघरच नव्हे, तर 'सेमिकंडक्टरची राजधानी' म्हणूनही ओळखले जाणार आहे. 

भारतातील पहिल्या इलेक्ट्रॉनिक्सच्या सेमिकंडक्टर प्रकल्पाचा शुभारंभ नवी मुंबईच्या टीसीसी औद्यागिक वसाहतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. या आरआरपी कंपनीच्या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात १२ हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित असून, दुसऱ्या टप्प्यात २४ हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. तत्पूर्वी गेल्या गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीने नवी मुंबईतीलच तळोजा येथेही अदानी समूह आणि टॉवर कंपनीसोबतच्या संयुक्त भागीदारीतील ८३,९४७ कोटी रुपये गुंतवणूक अपेक्षित असलेल्या सेमिकंडक्टर प्रकल्पास परवानगी दिली आहे. हे दोन्ही प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर नवी मुंबई शहर देशाचे डेटा सेंटर्सचे माहेरघरच नव्हे, तर 'सेमिकंडक्टरची राजधानी' म्हणूनही ओळखले जाणार आहे. 

आरआरपी इलेक्ट्रॉनिक्सच्या ज्या प्रकल्पाचा शुभारंभ केला तो देशातील पहिला सेमिकंडक्टर प्लांट असून, त्यामुळे चार हजार रोजगार मिळणार आहेत. शिवाय पुण्यातील वेदांताचा प्रकल्प गुजरातला हलविल्यानंतर जे वादळ उठले होते, तेही शमण्यास मदत होणार आहे. याशिवाय तळोजा औद्यागिक वसाहतीतील अदानी समूह आणि टॉवर कंपनीसोबतच्या संयुक्त भागीदारीतील ८३,९४७ कोटी रुपयांचा सेमिकंडक्टर प्रकल्प तीन ते पाच वर्षांत बांधला जाईल, असे सांगण्यात आले आहे. या ठिकाणी पहिल्या टप्प्यात ४० हजार चिप आणि आणि दुसऱ्या टप्प्यात ८० हजार चिपचे उत्पादन करण्यात येणार असून, येथे पाच हजार जणांना रोजगार मिळणार आहे. 

भारतात तयार होणाऱ्या सेमिकंडक्टर चिप्सचा वापर ड्रोन, कार, स्मार्टफोन आणि इतर प्रकल्पांमध्ये केला जाणार आहे. यामुळे 'मेक इन इंडिया' प्रकल्पाला याद्वारे चालना मिळणार असून, यातून देशी उत्पादनातून या वस्तू स्वस्त होण्याची अपेक्षा केली जात आहे. 

यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाने फेब्रुवारीमध्ये तीन सेमिकंडक्टर प्लांटला मंजुरी दिली आहे. टाटा कंपनीने यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या गुजरातच्या धोलेरा येथील प्लांटचा पायाभरणी समारंभ नुकताच झाला आहे. तसेच सानंद, गुजरात येथे दुसरा, तर मोरीगाव, आसाम येथे तिसरा प्रकल्प होणार आहे. तिन्ही प्रकल्पांमुळे २० हजार तंत्रज्ञांना नोकऱ्या व सुमारे ६० हजार अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणे अपेक्षित आहे. 

...या प्रश्नांची उत्तरे देणार कोण? 

आरआरपी कंपनीला सेमिकंडक्टर निर्मितीचा अनुभव तसेच कंपनीचे मार्केट कॅप खूपच कमी असल्याचे सांगण्यात येत आहे. कंपनीकडे मोठे भागभांडवल, अनुभवी व तज्ज्ञ कर्मचारी नसल्याची चर्चा आहे. शिवाय आरआरपी चिप्स बनवत नसून सेमिकंडक्टर असेंबल करते. मग तिला आपल्या आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स धोरणांतर्गत राज्य सरकारने दिलेल्या कोट्यवधींच्या सवलती खरेच उपयोगी पडतील काय, यासह सेमिकंडक्टर कंपनीच्या शुभारंभास क्रिकेटपटू कशासाठी, असे अनेक प्रश्न करून सचिनच्या भूमिकेविषयी सोशल मीडियावर शंका व्यक्त होत आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईEknath Shindeएकनाथ शिंदे