शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

तीन वर्षांत १७०० वाहनांची चोरी, गतवर्षात ३५६ वाहनांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 03:16 IST

गतवर्षी शहरातून ३५६ वाहने चोरीला गेली असून त्यामध्ये २१७ दुचाकींचा समावेश आहे. गतवर्षी वाहनचोरीच्या घटना कमी असल्या तरीही गुन्ह्यांची समाधानकारक उकल करण्यात मात्र पोलिसांना अपेक्षित यश आलेले नाही. बहुतांश वाहने वाहनचालक अथवा मालकांच्या निष्काळजीमुळे चोरीला गेलेली आहेत.

नवी मुंबई : गतवर्षी शहरातून ३५६ वाहने चोरीला गेली असून त्यामध्ये २१७ दुचाकींचा समावेश आहे. गतवर्षी वाहनचोरीच्या घटना कमी असल्या तरीही गुन्ह्यांची समाधानकारक उकल करण्यात मात्र पोलिसांना अपेक्षित यश आलेले नाही. बहुतांश वाहने वाहनचालक अथवा मालकांच्या निष्काळजीमुळे चोरीला गेलेली आहेत.पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातून मागील तीन वर्षात १७०० हून अधिक वाहने चोरीला गेली आहेत. २०१५ मध्ये ५९४ तर २०१६ मध्ये ६७६ वाहन चोरीचे गुन्हे घडले आहेत. त्यापैकी सुमारे पाचशे गुन्हे तीन वर्षात उघड झाले आहेत. वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण इतर गुन्ह्यांच्या तुलनेत कमी आहे. अनेकदा चोरीची वाहने राज्याबाहेर नेली जात असल्याने त्यांचा शोध घेण्यात पोलिसांना अपेक्षित यश येत नाही. मागील दोन वर्षात पोलिसांनी दुचाकीचोरांच्या मुसक्या आवळलेल्या आहेत. त्यामुळे गतवर्षात वाहनचोरीच्या गुन्ह्यांना काही प्रमाणात आळा बसलेला आहे. त्यानुसार वर्षभरात परिमंडळ एकमध्ये ३५६ गुन्हे घडले असून २०१६ साली ४८० गुन्हे घडले होते. चोरीला गेलेल्या वाहनांमध्ये ट्रक, टेंपो, कार यासह दुचाकींचा समावेश आहे. इतर वाहनांच्या तुलनेत दुचाकीची चोरी सहज शक्य असते. यामुळे परिमंडळ एकमध्ये गतवर्षी झालेल्या गुन्ह्यांमध्ये २१७ गुन्हे दुचाकी चोरीचे आहेत.शहरात नियोजनबध्द वाहन पार्किंग नसल्याने रस्त्यालगत, मोकळ्या जागेवर वाहने उभी केली जातात. त्यात दुचाकी म्हणजे वाटेल तिथे उभे करण्याचे वाहन असा काहींचा समज आहे. यामुळे नो पार्किंगमधून अथवा रस्त्यालगत उभ्या असलेल्या दुचाकीचोरीचे प्रमाण अधिक आहे. वाहन चालकांकडून योग्यती खबरदारी घेतली जात नसल्याने असे प्रकार घडत आहेत. त्याची पोलिसांना देखील डोकेदुखी होत आहे. गतवर्षात उघड झालेल्या काही गुन्ह्यांमध्ये बालगुन्हेगारांचाही समावेश असल्याचे समोर आलेले आहे. मौज म्हणून चोरलेली दुचाकी वापरून आडोशाच्या ठिकाणी टाकली जाते, अथवा विकली जाते. त्यामुळे चोरीला गेलेले वाहन परत मिळेल याची शाश्वती कमी झालेली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई