शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

तीन वर्षांत १७०० वाहनांची चोरी, गतवर्षात ३५६ वाहनांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 03:16 IST

गतवर्षी शहरातून ३५६ वाहने चोरीला गेली असून त्यामध्ये २१७ दुचाकींचा समावेश आहे. गतवर्षी वाहनचोरीच्या घटना कमी असल्या तरीही गुन्ह्यांची समाधानकारक उकल करण्यात मात्र पोलिसांना अपेक्षित यश आलेले नाही. बहुतांश वाहने वाहनचालक अथवा मालकांच्या निष्काळजीमुळे चोरीला गेलेली आहेत.

नवी मुंबई : गतवर्षी शहरातून ३५६ वाहने चोरीला गेली असून त्यामध्ये २१७ दुचाकींचा समावेश आहे. गतवर्षी वाहनचोरीच्या घटना कमी असल्या तरीही गुन्ह्यांची समाधानकारक उकल करण्यात मात्र पोलिसांना अपेक्षित यश आलेले नाही. बहुतांश वाहने वाहनचालक अथवा मालकांच्या निष्काळजीमुळे चोरीला गेलेली आहेत.पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातून मागील तीन वर्षात १७०० हून अधिक वाहने चोरीला गेली आहेत. २०१५ मध्ये ५९४ तर २०१६ मध्ये ६७६ वाहन चोरीचे गुन्हे घडले आहेत. त्यापैकी सुमारे पाचशे गुन्हे तीन वर्षात उघड झाले आहेत. वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण इतर गुन्ह्यांच्या तुलनेत कमी आहे. अनेकदा चोरीची वाहने राज्याबाहेर नेली जात असल्याने त्यांचा शोध घेण्यात पोलिसांना अपेक्षित यश येत नाही. मागील दोन वर्षात पोलिसांनी दुचाकीचोरांच्या मुसक्या आवळलेल्या आहेत. त्यामुळे गतवर्षात वाहनचोरीच्या गुन्ह्यांना काही प्रमाणात आळा बसलेला आहे. त्यानुसार वर्षभरात परिमंडळ एकमध्ये ३५६ गुन्हे घडले असून २०१६ साली ४८० गुन्हे घडले होते. चोरीला गेलेल्या वाहनांमध्ये ट्रक, टेंपो, कार यासह दुचाकींचा समावेश आहे. इतर वाहनांच्या तुलनेत दुचाकीची चोरी सहज शक्य असते. यामुळे परिमंडळ एकमध्ये गतवर्षी झालेल्या गुन्ह्यांमध्ये २१७ गुन्हे दुचाकी चोरीचे आहेत.शहरात नियोजनबध्द वाहन पार्किंग नसल्याने रस्त्यालगत, मोकळ्या जागेवर वाहने उभी केली जातात. त्यात दुचाकी म्हणजे वाटेल तिथे उभे करण्याचे वाहन असा काहींचा समज आहे. यामुळे नो पार्किंगमधून अथवा रस्त्यालगत उभ्या असलेल्या दुचाकीचोरीचे प्रमाण अधिक आहे. वाहन चालकांकडून योग्यती खबरदारी घेतली जात नसल्याने असे प्रकार घडत आहेत. त्याची पोलिसांना देखील डोकेदुखी होत आहे. गतवर्षात उघड झालेल्या काही गुन्ह्यांमध्ये बालगुन्हेगारांचाही समावेश असल्याचे समोर आलेले आहे. मौज म्हणून चोरलेली दुचाकी वापरून आडोशाच्या ठिकाणी टाकली जाते, अथवा विकली जाते. त्यामुळे चोरीला गेलेले वाहन परत मिळेल याची शाश्वती कमी झालेली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई