शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
2
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
3
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
4
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
5
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
6
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
7
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
8
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
9
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
10
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
11
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
12
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
13
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
14
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
15
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
16
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
17
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
18
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
19
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
20
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

विमानतळबाधितांचे स्थलांतर अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 23:20 IST

१५ जानेवारी अंतिम मुदत : सिडकोच्या आवाहनाला ग्रामस्थांचा प्रतिसाद

नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या मार्गात अडसर ठरणाऱ्या ‘त्या’ दहा गावांच्या स्थलांतराची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. स्थलांतरासाठी सिडकोने दिलेली मुदत १५ जानेवारी रोजी संपत आहे. शेवटच्या दिवसात स्थलांतराची प्रक्रिया शंभर टक्के पूर्ण होईल, असा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे.

विमानतळाच्या गाभा क्षेत्रात येणारी दहा गावे स्थलांतरित केली जात आहेत. या गावांचे वडघर, वाहळ आणि कुंडे वाहळ या ठिकाणी पुनर्वसन व पुन:स्थापना करण्यात येत आहे. दहा गावातून स्थलांतरित होणाºया कुटुंबांची संख्या ३000 इतकी आहे. स्थलांतरित होणाºया ग्रामस्थांना यापूर्वी तीन वेळा मुदत देण्यात आली होती. पुनर्वसन पॅकेजसह प्रोत्साहन भत्ता सुध्दा जाहीर करण्यात आला होता. परंतु लहान मोठ्या मागण्यांचा रेटा पुढे करीत ग्रामस्थांनी स्थलांतराला विरोध दर्शविला. अखेर दहा गाव संघर्ष समितीच्या विनंतीनुसार उर्वरित ग्रामस्थांना स्थलांतरासाठी १५ जानेवारीची अंतिम मुदत देण्यात आली होती. ही मुदत उद्या संपत असून रविवारपर्यंत जवळपास ८0 टक्के ग्रामस्थांनी स्थलांतरासाठी अर्ज सादर केले आहे. तर दहापैकी वरचे ओवळा, वाघिवलीवाडी ही दोन गावे शंभर टक्के रिकामे झालीआहेत.

कोपर , कोल्ही व चिंचपाडा या तीन गावांचे ९५ टक्के स्थलांतर झाले आहे. तरघर ८५ टक्के तर गणेशपुरी गावातील ७0 टक्के स्थलांतर पूर्ण झाले आहे. तसेच उलवेतील ५00 ग्रामस्थांपैकी ३00 ग्रामस्थांनी स्थलांतर केले आहे. कोंबडभुजेमधील ३२५ पैकी १७0 ग्रामस्थांनी स्थलांतर केले आहे. उद्याच्या शेवटच्या दिवसात १00 टक्के स्थलांतर होईल, असा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे.स्थलांतरासाठी ग्रामस्थांना प्रोत्साहनआर्थिक नुकसान टाळण्यासाठी अंतिम मुदतीत ग्रामस्थांनी स्थलांतर करावे, यासाठी सिडकोच्या वतीने विविध स्तरावर प्रयास करण्यात आले. सह व्यवस्थापकीय संचालिका प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी याप्रकरणात विशेष लक्ष घातले होते.गाव स्तरावर बैठका घेवून ग्रामस्थांना स्थलांतरासाठी प्रोत्साहित केले. तसेच ग्रामस्थांनी वैयक्तिक पत्रे देवून अंतिम मुदतीचे स्मरण करून देण्यात आले. विशेष म्हणजे ग्रामस्थांच्या सोयीसाठी शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशीही संबंधित कार्यालय सुरू ठेवण्यात आले. याचा परिणाम म्हणून मागील अनेक महिन्यांपासून रखडलेल्या स्थलांतराला मूर्त स्वरूप प्राप्त झाले.

स्थलांतर १५ जानेवारी ही अंतिम मुदत आहे. त्यानंतर कोणतीही मुदत दिली जाणार नाही. उद्या अखेरचा दिवस असल्याने प्रकल्पग्रस्तांच्या सोयीसाठी रात्री ८ वाजेपर्यंत संबंधित कार्यालय सुरू ठेवले जाणार आहे.च्या कालावधीत सादर होणाºया अर्जाची पुढील दोन दिवसात तपासणी करून त्याचा अहवाल राज्य शासनाला सादर केला जाईल. दिलेल्या मुदतीत ज्यांनी स्थलांतर केले नाही, अशा प्रकल्पग्रस्तांच्या प्रकरणाबाबत यानंतर राज्य शासन निर्णय घेईल, असे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प मुख्य भूमी व भूमापन अधिकारी विजय पाटील यांनी स्पष्ट केले आहे.वाघिवलीच्या स्थलांतराची घाई नाहीच्तरघर, कोंबडभुजे, उलवे, गणेशपुरी, वाघिवलीवाडा, वरचे ओवळे, कोल्ही, कोपर, चिंचपाडा आणि वाघिवली अशी स्थलांतरित होणाºया गावांची नावे आहेत. यापैकी वाघिवली हे गाव गाभा क्षेत्राच्या बाहेर असल्याने सध्या सिडकोला या गावाच्या स्थलांतराची घाई नाही. त्यामुळे या गावाचे स्थलांतर अद्याप शिल्लक आहे.

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAirportविमानतळ