शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
2
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
3
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
4
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
5
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
6
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
7
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
8
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
9
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
10
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
11
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
12
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
13
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
14
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
15
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
16
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
17
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
18
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
19
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
20
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका

‘त्या’ शाळेलाही अखेरची घरघर

By admin | Updated: October 1, 2015 01:40 IST

कल्याण-डोंबिवली महापालिके च्या बहुतांश शाळांना पटसंख्येअभावी अखेरची घरघर लागली असताना त्यात आता पूर्वेकडील संत रोहिदास

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिके च्या बहुतांश शाळांना पटसंख्येअभावी अखेरची घरघर लागली असताना त्यात आता पूर्वेकडील संत रोहिदास प्राथमिक विद्यालयाचीदेखील भर पडली आहे. येथील घटती पटसंख्या पाहता ही शाळादेखील शेवटच्या घटका मोजत आहे.काटेमानिवली परिसरातील मराठी माध्यमाच्या शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण दिले जाते. सद्य:स्थितीला येथील विद्यार्थी पटसंख्या अवघी ३८ इतकी आहे. इयत्तांच्या पटसंख्येनुसार पहिली आणि दुसरीत ३, तिसरीत २, चौथीत ७, पाचवीत ४, सहावीमध्ये ८ तर सातवीत ११ अशी विद्यार्थी संख्या आहे. या ठिकाणी बालवाडी असून येथील मुलांची संख्या १० आहे. २००८ च्या आसपास विद्यार्थी पट हा दीडशेच्या आसपास होता. सध्या तो ३८ वर येऊन ठेपला आहे. विद्यार्थी पटसंख्या किमान २० असणे बंधनकारक आहे. या शाळेतील पटसंख्या ३८ वर आल्याने शाळेला अखेरची घरघर लागल्याचे दिसत आहे. परंतु, यावर उपाय म्हणून शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षणातून यंदा ८ ते १० विद्यार्थ्यांची वाढ झाल्याचा दावा येथील शिक्षक करीत आहेत. शाळेच्या एक किमी परिसरात अन्य दुसरी शाळा असू नये, असा नियम आहे. मात्र, या नियमाकडे येथेही दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. परिसरात ९ ते १० खाजगी शाळा असून याचा फटका पटसंख्येला बसला आहे. येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये काही जण बहुभाषिक आहेत. शाळेची स्थापना १९४७ सालची असून नूतनीकरण २००९ मध्ये केले. वर्गखोल्या ६ आहेत. परंतु, येथे शिक्षक दोनच असल्याने इयत्ता पहिली ते चौथी आणि पाचवी ते सातवी अशा इयत्ता एकत्रितपणे दोन खोल्यांमध्ये भरविल्या जात आहेत. यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.