शहरं
Join us  
Trending Stories
1
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
4
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
5
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
6
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
7
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
8
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
9
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
10
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
11
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
12
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
13
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
14
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
15
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
16
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
17
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
18
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
19
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
20
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू

अतिक्रमण विभागात भूमाफियांचे खबरी

By admin | Updated: September 3, 2015 23:33 IST

शहरातील अतिक्रमणांवर धडक कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार सिडको, महापालिका आणि एमआयडीसीने कारवाईचा बडगा उगारला आहे

कमलाकर कांबळे, नवी मुंबईशहरातील अतिक्रमणांवर धडक कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार सिडको, महापालिका आणि एमआयडीसीने कारवाईचा बडगा उगारला आहे. परंतु या कारवाईला न जुमानता भूमाफियांनी अतिक्रमणांचा धडाका सुरूच ठेवला आहे. अतिक्रमण विभागातील भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांची फितुरी या भूमाफियांच्या पथ्यावर पडल्याचे दिसून आले आहे. जानेवारी २0१३ नंतर शहरात उभारलेल्या बेकायदा बांधकामांवर धडक कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार सिडको, महापालिका आणि एमआयडीसीने आपापल्या जागेवरील अतिक्रमणांना नोटिसा बजावल्या आहेत. सिडकोने तर अनधिकृत बांधकामे पाडून टाकण्याची प्रत्यक्ष कारवाई सुरू केली असली तरी ती जुजबी स्वरूपाची जाणवू लागली आहे. एमआयडीसीने कारवाईसाठी आॅक्टोबर महिन्याचा मुहूर्त शोधून काढला आहे. तर महापालिका कारवाईबाबत अद्यापि संभ्रमात असल्याचे दिसून येते. परंतु कारवाईचा सोपस्काराचा भाग म्हणून महापालिकेने टोल फ्री नंबर जाहीर केले आहेत. इतकेच नव्हे, तर नवीन अतिक्रमणांना आळा घालण्यासाठी विभाग अधिकाऱ्यांना विशेष अधिकार दिले आहेत. परंतु या सर्व उपाययोजना तकलादू व वेळकाढूपणाच्या ठरल्या आहेत. त्यामुळे कारवाईच्या धास्तीने काही काळ थंडावलेली बांधकामे पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. महापालिका व सिडकोच्या अतिक्रमण विभागातील काही भ्रष्ट अधिकारी व कर्मचारीच खबऱ्याचे काम करीत असल्याने अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे फावले आहे. कोणत्या बांधकामांवर कधी कारवाई होणार, कारवाईचे वेळापत्रक काय आहे आदीची इत्यंभूत माहिती संबंधित बांधकामधारकांना पुरविली जाते. तसेच एखाद्या सुरू असलेल्या नवीन बांधकामांचा अहवाल मागितला तरी तो आपल्या सोयीनुसार सादर केला जातो. इतकेच नव्हे, तर अनेकदा भूमाफियांना बेकायदा बांधकामांसाठी जागाही याच विभागातील कर्मचाऱ्यांकडून सुचविल्या जातात. सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांविषयी कोणी तक्रार केली तर संबंधितांना सबुरीने घेण्याचा सल्ला सुध्दा याच विभागांतील खबऱ्यांकडून दिला जातो. एकूणच अतिक्रमण विभागाच्या झारीतील शुक्राचार्यामुळेच शहरात बेकायदा बांधकामांचा भस्मासुर पोसला गेल्याचे आता सर्वश्रुत झाले आहे.न्यायालयाच्या आदेशानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शहरातील बेकायदा बांधकामांना आळा बसेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत होता. प्रत्यक्षात मात्र नवीन बांधकामांनी आणखी उचल घेतल्याचे दिसून आले आहे. ऐरोली, दिघा, गोठीवली, घणसोली, कोपरखैरणे, कोपरी, बोनकोडे, जुहूगाव, वाशीगाव, तुर्भे, सानपाडा या परिसरात आजही शेकडो नवीन बांधकामे सुरू आहेत. रातोरात उभारणाऱ्या या बांधकामांकडे संबंधित विभागाकडून सोयीस्करपणे डोळेझाक केली जात आहे. इतकेच नव्हे, तर त्या त्या विभागातील लोकप्रतिनिधीसुध्दा याबाबत मूग गिळून बसले आहेत. दिघा परिसरात तर भूमाफियांनी हैदोस घातला आहे. विशेष म्हणजे या परिसरात उभारण्यात आलेल्या बहुतांशी बांधकामांत प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष स्थानिक लोकप्रतिनिधीचा सहभाग असल्याचे दिसून आले आहे.