शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

कुकशेतवासीयांना भूखंडांची करारपत्रे

By admin | Updated: July 2, 2017 06:28 IST

कुकशेत येथील प्रकल्पग्रस्तांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी भूखंडांच्या करारपत्रांचे प्रतिनिधिक स्वरूपात वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : कुकशेत येथील प्रकल्पग्रस्तांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी भूखंडांच्या करारपत्रांचे प्रतिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले. मागील २० वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागल्याने कुकशेतवासीयांनी समाधान व्यक्त केले आहे. हार्डिलिया कंपनीमुळे कुकशेत गाव विस्थापित करण्यात आले होते. नेरुळ सेक्टर-१४ येथील या विस्थापित गावाचे पुनर्वसन करण्यात आले होते. या स्थलांतरित झालेल्या कुकशेतमधील ग्रामस्थांना त्यांच्या मूळ जागेच्या प्रमाणात जागा मिळणे अपेक्षित होते; परंतु एमआयडीसीने अल्प भूखंड देऊन त्यांची बोळवण केली होती. विशेष म्हणजे, त्या भूखंडांची कागदपत्रेही देण्यात आली नाहीत. त्यामुळे नकाशा मंजुरीला अडथळा निर्माण होत होता. परिणामी, नव्याने घर बांधण्यासाठी वित्तसंस्थांकडून कर्ज मिळणे जिकरीचे झाले होते. या सर्व पार्श्वभूमीवर येथील रहिवासी मेटाकुटीला आले होते. या प्रश्नासाठी प्रकल्पग्रस्तांचा मागील २० वर्षांपासून लढा सुरू होता. अखेर बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी पुढाकार घेऊन हा प्रश्न मार्गी लावला आहे. त्यामुळे या स्थलांतरित गावातील २८४ कुटंबांना आपल्या जागेचा मालकी हक्क प्राप्त होणार आहे. आमदार मंदा म्हात्रे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे राज्य सरकारने येथील ग्रामस्थांना त्यांच्या भूखंडाच्या मालकी हक्काची करारपत्रे देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते काही कुटंबांना प्रतिनिधिक स्वरूपात करारपत्रांचे वाटप करण्यात आले. यात सोनुबाई चांगो ठाकूर, सुमन मंगळ्या ठाकूर, सविता मणिलाल सोलंकी, गुरुनाथ शिमग्य ठाकूर, देवराम वासुदेव पाटील, हिरूबाई परशुराम पाटील आदी प्रकल्पग्रस्तांचा समावेश होता. आमदार मंदा म्हात्रे यांच्या उपस्थितीत या करारपत्रांचे वाटप करण्यात आले.२४0 कुटुंबांना दिलासा२० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कुकशेत गावातील २४0 कुटुंबांना त्यांच्या जमिनीच्या मालकी हक्काची करारपत्रे देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. हा करार ९९ वर्षांसाठी आहे. त्यासाठी प्रत्येक भूखंडामागे (प्रति १00 चौ.मी.) लागणारे मुंद्राक शुल्क व नोंदणीचा खर्च राज्य शासनामार्फत करण्यात येणार आहे. ही रक्कम पाच लाख तीस हजार रुपये इतकी आहे. त्यामुळे २४0 कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.