शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

पावसामुळे लाल मिर्ची भडकली, बाजारसमितीमध्ये भाववाढ; मसाल्यांचेही दर वाढल्याने खर्च वाढला

By नामदेव मोरे | Updated: March 27, 2023 18:35 IST

देशभर झालेल्या अवकाळी पावसामुळे मिर्चीच्या उत्पादनावरही परिणाम झाला असून बाजारभाव वाढण्यास सुरुवात झाली आहे.

नवी मुंबई : देशभर झालेल्या अवकाळी पावसामुळे मिर्चीच्या उत्पादनावरही परिणाम झाला असून बाजारभाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई बाजार समितीमध्ये लाल मिर्ची २०० ते ८५० रुपयापर्यंत पोहचले आहेत. मसाल्यांचे दरही वाढल्यामुळे यावर्षी मिर्ची पावडर तयार करण्याचा खर्चही वाढणार आहे.

मुंबई, नवी मुंबई परिसरातील नागरिक मार्च ते मे महिन्यामध्ये पुढील वर्षभर पुरेल एवढी मिर्ची पावडर तयार करून ठेवत असतात. वर्षभराच्या चटणीची सोय या महिन्यात केली जाते. बाजार समितीमध्ये मागील आठवड्यात सरासरी १०० ते १२५ टन मिर्चीची आवक होत होती. मिर्चीचे दरही स्थिर होते. परंतु पावसामुळे आंध्रप्रदेश, कर्नाटकमधील मिर्ची उत्पादनावरही परिणाम झाला असून त्यामुळे भाव वाढण्यास सुरूवात झाली आहे.

सर्वच मिर्चीचे दर ३० ते ५० रुपयांनी वाढले आहेत. मिर्चीचा हंगाम १५ एप्रीलपर्यंत चालणार आहे. त्यानंतर चांगल्या दर्जाच्या मिर्चीची आवक कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे ग्राहकांनी आत्ताच मिर्ची खरेदी करावी असे आवाहन व्यापाऱ्यांनीही केले आहे.

सद्यस्थितीमध्ये बाजार समितीमध्ये बेडगी, कश्मीरी, तेजा, पांडी, रेशमपट्टी व इतर प्रकारच्या मिर्चीची आवक सुरू आहे. आंध्रप्रदेशमधील गुंठूर , कर्नाटकमधील हुबळी, तेलंगनमधील वरंगळ परिसरातून मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. यावर्षी तीळ, जिरे, लवंग व इतर मसाल्याच्या पदार्थांच्या दरामध्येही वाढ झाली असल्यामुहे ग्राहकांना मिर्ची पावडर तयार करण्यासाठी जादा खर्च करावा लागणार आहे.

प्रतिक्रिया

मार्केटमध्ये कर्नाटक, आंध्रप्रदेश व इतर ठिकाणावरून मिर्चीची आवक होत आहे. पावसाचा फटका बसल्यामुळे बाजारभाव वाढले आहेत. १५ एप्रिल पर्यंत आवक भरपूर राहणार आहे.

अमरीश बरोत, मिर्ची व्यापारीबाजार समितीमधील मिर्ची व मसाल्यांचे दरवस्तू - बाजारभाव

बेडगी मिर्ची - ३५० ते ४५०कश्मीरी - २०० ते ८५०

तेजा - २५० ते २८०पांडी २५० ते २८०

रेशमपट्टी ७०० ते ८५०तीळ १६० ते २६०

जिरे २४० ते ३८०लवंग ८५० ते १०००

दालचीनी १५० ते २००