शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

एपीएमसीत कामगारांसाठी विश्रांती कक्षांची कमतरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 23:56 IST

तीव्र उकाड्याचा सर्वाधिक त्रास मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कामगारांना होऊ लागला आहे. एक आठवड्यापासून उन्हाच्या झळा असह्य होऊ लागल्या आहेत.

- नामदेव मोरेनवी मुंबई : तीव्र उकाड्याचा सर्वाधिक त्रास मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कामगारांना होऊ लागला आहे. एक आठवड्यापासून उन्हाच्या झळा असह्य होऊ लागल्या आहेत. पुरेसे विश्रांती कक्ष नसल्यामुळे जागा मिळेल तेथे कामगार विसावा घेताना दिसत असून, एपीएमसी आवारांमधील पाणपोर्इंमधील कुलरही बंद आहेत.नवी मुंबईचे तापमान ४१ अंशावर पोहचले असून वाढत्या गरमीमुळे शहरवासी त्रस्त झाले आहेत. बाजार समितीमध्ये गोणी वाहण्याचे काम करणाऱ्या माथाडी कामगारांनाही याची झळ बसत आहे. पाच मार्केटमध्ये २५ हजारपेक्षा जास्त कामगार काम करत आहेत. उकाड्यामुळे दिवसभर घामाच्या धारा सुरू आहेत. कामगारांना ठरावीक वेळेनंतर विश्रांती घ्यावी लागत आहे. गाळ्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गोडाऊनमध्ये क्षणभर विश्रांती घेता येते. पण गाळ्यांच्या बाहेर काम करणाºयांसाठी निवारा शेडही नाहीत. फळ मार्केटमधून २०० पेक्षा जास्त पाटीवाला कामगार आहेत. ५० किलोपेक्षा जास्त वजन घेऊन हे कामगार मार्केट ते सानपाडा स्थानक व तेथून मुंबईमधील विविध ठिकाणी जातात. तापमानवाढीमुळे या सर्वांना काम करणे अशक्य होऊ लागले आहे. कामगारांसाठी विश्रांती कक्षच नसल्याने जागा मिळेल तिथे कामगार बसलेले दिसतात. हातगाडी ओढणाºया कामगारांची अवस्थाही सारखीच असून आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. वारणार कामगार वगळता इतरांच्या विश्रांतीसाठी पुरेशी जागा नाही. यामुळे कांदा, फळ मार्केटमध्ये गाळ्यातील गोडाऊनसह लिलावगृहामध्ये आश्रय घ्यावा लागत आहे.बाजार समितीमध्ये कामगार व इतरांच्या सुविधेसाठी प्रत्येक मार्केटमध्ये पाणपोई उभारल्या आहेत. पाणपोईमध्ये कुलर बसविले आहेत; पण बहुतांश कुलर बंद आहेत. यामुळे सकाळी ११ नंतर पाणपोईमधील पाणीही गरम होत असून त्याचा पिण्यासाठी वापर करता येत नाही. कांदा व फळ मार्केटमधील पाणपोईच्या परिसराची स्वच्छता होत नाही. मसाला मार्केटच्या पाणपोईमधील पाणी दुपारनंतर संपत असल्यामुळे कामगार व इतर नागरिकांची गैरसोय होऊ लागली आहे.काम करण्याला पर्याय नाहीमार्केटमधील पाटीवाला कामगारांशी संवाद साधला असता त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, तापमान वाढल्यामुळे ओझे घेऊन जाताना खूप त्रास होत आहे; परंतु उत्पन्नाचे दुसरे साधन नसल्यामुळे हे काम केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मार्केटमध्ये निवाºयासाठी थोडी जागा मिळावी व इतर गैरसोयी दूर व्हाव्या अशी अपेक्षाही अनेक कामगारांनी व्यक्त केली.प्रत्येक मार्केटमध्ये पाणपोई उभारण्यात आल्या आहेत. त्यांची देखभाल केली जात असते. कुलर बंद असल्यास किंवा इतर काही समस्या असल्यास माहिती घेऊन योग्य कार्यवाही केली जाईल.- व्ही. बी. बिरादार,अधीक्षक अभियंता, एपीएमसीमार्केटमध्ये सर्व घटकांसाठी आवश्यक सुविधा दिल्या जातात. गरमीमुळे कामगार किंवा इतरांना काही समस्यांना सामोरे जावे लागत असल्यास त्याची माहिती घेण्यात येईल. पाणपोर्इंपासून सर्व सुविधांचा आढावा घेऊन योग्य उपाययोजना केल्या जातील.- अनिल चव्हाण, सचिव, एपीएमसी

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई