शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

कोकणवासीयांनो उद्योजक व्हा! दीपक केसरकर यांचा तरुणांना सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 05:38 IST

कोकणाला जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून, लवकरच सागरी मार्गाने कोकण जोडले जाणार आहे. त्यामुळे व्यवसायाचे अनेक पर्याय खुले होणार असल्याने कोकणवासीयांना उद्योजक होण्याचा सल्ला गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिला.

नवी मुंबई : कोकणाला जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून, लवकरच सागरी मार्गाने कोकण जोडले जाणार आहे. त्यामुळे व्यवसायाचे अनेक पर्याय खुले होणार असल्याने कोकणवासीयांना उद्योजक होण्याचा सल्ला गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिला. ग्लोबल कोकण महोत्सवाच्या सांगता समारंभप्रसंगी ते वाशीत उपस्थित होते. तर येत्या काळात भातशेती लागवडीची जुनी पद्धत मोडीत काढून आरोग्याच्या दृष्टीने तंत्रज्ञानाचा वापर करण्याचाही सल्ला त्यांनी दिला.कोकण आणि केरळची जडणघडण समान आहे. त्यानुसार केरळप्रमाणचे कोकणला विकसित करण्याचा प्रयत्न येत्या काळात सरकार करणार असल्याचे केसरकर यांनी कार्यक्रमप्रसंगी सांगितले. या दरम्यान उच्चशिक्षित तरुणांसह अल्पशिक्षितांच्याही रोजगाराचा प्रश्न सोडवला जाणार असल्याचे ते म्हणाले. त्यामध्ये खादी ग्रामोद्योग, मँग्रोजमध्ये खेकडा पालन, नीरा उद्योगांसह इतर अनेक उद्योगांचा समावेश असेल. कोकणचा पर्यटन विकास केला जात असताना तिथे येणाºया पर्यटकांच्या सोईसाठी मोठ्या प्रमाणात निवासाची गरज निर्माण होऊ शकते. याकरिता पर्यटकांच्या पसंतीची सर्वच वैशिष्टे लक्षात घेऊन आवश्यक तिथे हॉटेल्स, रिसॉर्ट तयार केली जाणार आहेत. त्याशिवाय हॉप आॅन हॉप आॅफ या ए.सी. बोटी उपलब्ध करून त्याद्वारे खाडीकिनारची गावे पर्यटकांसाठी खुली केली जाणार असल्याचेही केसरकर यांनी सांगितले. तर पुढील सहा महिन्यांत कोकणमध्ये पंचतारांकित बोटीही उपलब्ध केल्या जाणार असल्याचेही ते म्हणाले; परंतु या सर्व सुविधा दिल्या जात असताना त्या चालवणार कोण? असा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता कोकणातील तरुणांनी पुढाकार घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला. भातशेतीसाठी चालत आलेल्या पद्धतीमुळे महिलांना पाठीचे आजार होत आहेत. हे टाळण्यासाठी तत्रज्ञानाचा वापर करण्याचेही त्यांनी सुचवले. अशा वेळी कोकणचे निसर्ग टिकून राहील व प्रदूषण होणार नाही, असे प्रकल्प कोकणात यावे, अशी सूचना त्यांनी केली.या वेळी माजी आमदार प्रमोद जठार यांनी कोकणातील प्रत्येक प्रकल्पाला राजकीय विरोध होत असल्याची खंत व्यक्त केली. तर ग्रिन रिफायनरी प्रकल्पाबाबत जनतेमध्ये गैरसमज निर्माण केला जात आहे. यामुळे कोकणची नकारात्मकता जगभर पसरत आहे. तर ज्यांनी प्रकल्प पाहिलाही नाही, त्यांच्याकडून राखरांगोळीच्या टीका होत असल्याचा अप्रत्यक्ष टोला जठार यांनी उद्धव ठाकरे यांना मारला. त्यामुळे त्रयस्थ संस्थेने कोकणवासीयांना चांगल्या-वाईट गोष्टी सांगण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. तसेच कोकणात आरोग्यसुविधा नसल्याने उपचारांसाठी गोवा अथवा मुंबईला जावे लागते. त्यामुळे शासनाने सुपरस्पेशलिटी रुग्णालय सुरू करून कोकणवासीयांना मोफत आरोग्यसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Navi Mumbaiनवी मुंबई