शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

आंब्याच्या २९ हजारासाठी अल्पवयीन मुलाचे अपहरण; नेरुळ मधील घटना

By सूर्यकांत वाघमारे | Updated: April 22, 2024 18:51 IST

ज्ञातामार्फत आंब्याची ऑर्डर देऊन रचला कट

नवी मुंबई : आंब्याच्या खरेदीचे २९ हजार रुपये वसुलीसाठी व्यक्तीच्या १५ वर्षीय मुलाचे अपहरण करून मारहाण केल्याची घटना नेरूळमध्ये घडली आहे. बनावट ग्राहक तयार करून वडाळा येथून नेरूळमध्ये आंबे मागवण्यात आले होते. हे आंबे घेऊन व्यापाऱ्याचा अल्पवयीन मुलगा नेरूळमध्ये आला असता त्याचे अपहरण करून गाळ्यावर नेवून मारहाण करण्यात आली. 

वडाळा येथील किरकोळ आंबे विक्रेते प्रेमकुमार यादव (४२) यांच्यासोबत १० एप्रिलला हि घटना घडली आहे. मात्र या घटनेनंतर भयभीत झालेल्या यादव यांनी शनिवारी रात्री याप्रकरणी नेरुळ पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यानुसार अमर उकिर्डे, वसीकुल इस्लाम व इतर एकजण अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यादव यांनी एपीएमसी मधील व्यापारी वसीकुल याच्याकडून गतवर्षी आंबे खरेदी केले होते. त्याचे २९ हजार रुपये त्यांनी दिले नव्हते. या पैशासाठी वसीकुल याच्याकडून तगादा सुरु होता. त्यानंतरही यादव आंब्याच्या बिलाचे थकीत पैसे देत नसल्याने त्याने अपहरणाचा कट रचला होता. यासाठी अमरच्या माध्यमातून यादव यांना फोन करून १० डझन आंब्याची ऑर्डर देण्यात आली होती. हे आंबे घेऊन यादव यांचा सहकारी व  मुलगा अलोक (१५) नेरूळमध्ये आला होता. स्थानकाच्या बाहेर दोघेही येताच त्याठिकाणी थांबलेल्या वसीकुल याने अलोकला जबरदस्ती दुचाकीवर बसवून अपहरण करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी अलोकने पळ काढण्याचा प्रयत्न केला असता वसीकुलचा एक सहकारी दुचाकीवर मागे बसून दोघांनी त्याला एपीएमसी मध्ये आणले. त्याठिकाणी त्याला मारहाण करत वडील प्रेमकुमार यादव यांना फोन करून थकबाकीच्या २९ हजाराची मागणी करण्यात आली. त्यानंतर पैसे देण्याचे आश्वासन दिल्यानंतर रात्री त्याला सोडण्यात आले. या घटनेनंतर भयभीत झालेल्या यादव यांनी शनिवारी रात्री नेरुळ पोलिसांकडे या घटनेबाबत तक्रार केली आहे. त्यानुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.