शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

आंब्याच्या २९ हजारासाठी अल्पवयीन मुलाचे अपहरण; नेरुळ मधील घटना

By सूर्यकांत वाघमारे | Updated: April 22, 2024 18:51 IST

ज्ञातामार्फत आंब्याची ऑर्डर देऊन रचला कट

नवी मुंबई : आंब्याच्या खरेदीचे २९ हजार रुपये वसुलीसाठी व्यक्तीच्या १५ वर्षीय मुलाचे अपहरण करून मारहाण केल्याची घटना नेरूळमध्ये घडली आहे. बनावट ग्राहक तयार करून वडाळा येथून नेरूळमध्ये आंबे मागवण्यात आले होते. हे आंबे घेऊन व्यापाऱ्याचा अल्पवयीन मुलगा नेरूळमध्ये आला असता त्याचे अपहरण करून गाळ्यावर नेवून मारहाण करण्यात आली. 

वडाळा येथील किरकोळ आंबे विक्रेते प्रेमकुमार यादव (४२) यांच्यासोबत १० एप्रिलला हि घटना घडली आहे. मात्र या घटनेनंतर भयभीत झालेल्या यादव यांनी शनिवारी रात्री याप्रकरणी नेरुळ पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यानुसार अमर उकिर्डे, वसीकुल इस्लाम व इतर एकजण अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यादव यांनी एपीएमसी मधील व्यापारी वसीकुल याच्याकडून गतवर्षी आंबे खरेदी केले होते. त्याचे २९ हजार रुपये त्यांनी दिले नव्हते. या पैशासाठी वसीकुल याच्याकडून तगादा सुरु होता. त्यानंतरही यादव आंब्याच्या बिलाचे थकीत पैसे देत नसल्याने त्याने अपहरणाचा कट रचला होता. यासाठी अमरच्या माध्यमातून यादव यांना फोन करून १० डझन आंब्याची ऑर्डर देण्यात आली होती. हे आंबे घेऊन यादव यांचा सहकारी व  मुलगा अलोक (१५) नेरूळमध्ये आला होता. स्थानकाच्या बाहेर दोघेही येताच त्याठिकाणी थांबलेल्या वसीकुल याने अलोकला जबरदस्ती दुचाकीवर बसवून अपहरण करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी अलोकने पळ काढण्याचा प्रयत्न केला असता वसीकुलचा एक सहकारी दुचाकीवर मागे बसून दोघांनी त्याला एपीएमसी मध्ये आणले. त्याठिकाणी त्याला मारहाण करत वडील प्रेमकुमार यादव यांना फोन करून थकबाकीच्या २९ हजाराची मागणी करण्यात आली. त्यानंतर पैसे देण्याचे आश्वासन दिल्यानंतर रात्री त्याला सोडण्यात आले. या घटनेनंतर भयभीत झालेल्या यादव यांनी शनिवारी रात्री नेरुळ पोलिसांकडे या घटनेबाबत तक्रार केली आहे. त्यानुसार तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.