शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

कर्जत-कल्याण राज्यमार्ग वाहतुकीस धोकादायक

By admin | Updated: July 5, 2017 06:40 IST

कर्जत-कल्याण राज्यमार्गावर कर्जत ते नेरळ दरम्यान मोठमोठे खड्डे पडले असून, काही भागांत रस्त्याची अक्षरश: दयनीय अवस्था झाली

लोकमत न्यूज नेटवर्कनेरळ : कर्जत-कल्याण राज्यमार्गावर कर्जत ते नेरळ दरम्यान मोठमोठे खड्डे पडले असून, काही भागांत रस्त्याची अक्षरश: दयनीय अवस्था झाली आहे. पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. या रस्त्यावर एकेरी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे या मार्गावर अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे; परंतु या रस्त्यावरील खड्डे कधी भरणार? असा प्रश्न वाहनचालकांना पडला असून, बांधकाम विभागाने मात्र याकडे दुर्लक्ष केले आहे.कर्जत-कल्याण राज्यमार्गाच्या चौपदरीकरणाचे काम कोट्यवधी रुपये खर्च करून मुंबई विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून २०१४मध्ये पूर्ण करण्यात आले होते; परंतु दोन वर्षांतच या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले. मागच्या वर्षी एमएमआरडीएने हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग कर्जत यांच्याकडे वर्ग केल्याने मागील वर्षी कर्जत बांधकाम विभागाने या रस्त्यावर खड्डे भरण्याचे काम केले होते; परंतु यावर्षीही पावसाळ्यात या राज्यमार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्याने हे खड्डे भरत असल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. या मार्गावरील किरवली, डिकसळ, वडवली, बेकारे, नेरळ पेट्रोलपंप, दीपक हॉटेल, नेरळ विद्यामंदिर परिसर, दामत अशा अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने हे खड्डे अपघातांना आमंत्रण देत आहेत. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती कधी होणार? असा प्रश्न प्रवासी व चालकांकडून विचारला जात आहे. तसेच डिकसळ गावाजवळील दुकानांसमोरील अर्धवट गटारे ठेवल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर येत आहे. तसेच या गटारांची कामे अर्धवट केल्याने रस्त्याच्या कडेला कचरा मोठ्या प्रमाणात साचल्याने दुर्गंधी पसरली आहे. याच रस्त्यावरील डिकसळ येथीलच भाऊसाहेब राऊत विद्यालयाच्या संरक्षक भिंतीचे काम अपूर्ण ठेवण्यात आले आहे. ही सर्व कामे पूर्ण करावीत, अशी मागणीदेखील अनेक वर्षांपासून होत आहे. यासाठी डिकसळ ग्रामस्थांनी अनेक वेळा पाठपुरावाही केला आहे; परंतु याकडेही दुर्लक्ष केले जात आहे. तरी बांधकाम विभागाने या राज्यमार्गावरील अनेक अर्धवट असलेली कामे पूर्ण करावीत, तसेच कर्जत-कल्याण राज्यमार्गावरील अनेक ठिकाणी पडलेले खड्डे लवकरात लवकर भरावे, अशी मागणी प्रवासी-वाहनचालक आणि स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे.कर्जत-कल्याण राज्यमार्गावर खड्डे भरण्यासाठी मंजुरी प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. नवीन सिस्टीमप्रमाणे अ‍ॅन्युएल मेन्टन्स कॉन्ट्रॅक्ट आॅनलाइन टेंडर निघणार आहेत. प्रस्ताव मंजूर झाल्यावर वर्कआॅर्डर होईल. त्यानंतर पावसाळ्यात व दिवाळीत असे दोन वेळा संबंधित ठेकेदार खड्डे भरणार आहे. दहा-पंधरा दिवसांत काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे.- चंद्रशेखर सहनाल, उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कर्जतकर्जत-कल्याण राज्यमार्गावरील अनेक ठिकाणी पडलेले खड्डे लवकर भरावे, अशी मागणी प्रवासी-वाहनचालक आणि स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे.कर्जत ते नेरळपर्यंत या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने या खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. वाहकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघात घडत आहेत. त्यामुळे बांधकाम विभागाने लवकरात लवकर खड्डे भरावेत.- भगवान कराळे, स्थानिक ग्रामस्थ