शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावरील कामोठे सर्व्हिस रोड पाच वर्षांपासून अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 00:02 IST

कामोठे येथील नागरिकांना पाच वर्षांपासून पनवेल-सायन महामार्गावर अंधारातूनच मार्ग काढावा लागत आहे.

कळंबोली : कामोठे येथील नागरिकांना पाच वर्षांपासून पनवेल-सायन महामार्गावर अंधारातूनच मार्ग काढावा लागत आहे. कामोठे ते खारघरपर्यंतचा सर्व्हिस रोड गेल्या पाच वर्षांपासून अंधारात आहे. यामुळे कित्येक नागरिकांना अपघातास सामोरे जावे लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार तक्र ार करूनही दखल घेतली जात नाही.पनवेल-सायन महामार्गावर कामोठे ते खारघर टोलनाकापर्यंत असलेला सर्व्हिस रोड गेल्या पाच वर्षांपासून अंधारात आहे. कामोठेकरांना मुंबईला जाण्यासाठी या अंधारातूनच मार्ग काढावा लागत आहे. २००४ साली कामोठे सर्व्हिस रोडचे काम टीआयपीएल या कंपनीने पूर्ण केले. त्यानंतर या कंपनीकडून विजेचे खांबही बसवण्यात आले. चार दिवस दिवे पेटलेही त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून यांची देखभाल न झाल्याने साडेपाच वर्षे नुसते खांब आहेत; पण यातून मिळणारा प्रकाश गायब झाला आहे. रात्री अंधाराचा फायदा घेऊन लुटमारीचे प्रकार घडत आहेत. महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कामोठे बसस्टॉप या ठिकाणी बाहेर गावी गेलेले रहिवासी रात्री-अपरात्री प्रवास करून उतरतात. महामार्गावर अंधार असल्याने नागरिकांना कामोठे शहरात जाण्याकरिता त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत कामोठे येथील सिटिजन युनिटी फोरमच्या सचिव रंजना सडोलीकर यांनी वारंवार पाठपुरावा केला आहे. ३१ आॅगस्टला कफ व एकता सामाजिक संस्थेबरेबर कामोठेकर नागरिकांनी उपोषण करण्याचे जाहीर करताच, सा.बा. अधिकाऱ्यांनी पथदिवे चालू करणार असल्याचे सांगताच उपोषण मागे घेण्यात आले. तीन महिने झाले तरी सार्वजनिक विभागाकडून कोणत्याही हालचाली होत नाहीत.>कामोठे भुयारीमार्गही बंद अवस्थेतसर्व्हिस रोड अंधारात आहेच; पण पुणे जाणाºया महामार्गावर जाण्याकरिता बांधण्यात आलेला भुयारीमार्गही बंद अवस्थेत आहे. यात पाणी साचले आहे. या भुयारीमार्गाचा कामोठेकरांना कोणताही उपयोग होत नाही. महामार्गावरील कामोठे येथे अंधार असल्याने वाहनांना जवळ आल्याशिवाय समोरील व्यक्ती दिसत नाही, त्यामुळे महामार्ग ओलांडताना दररोज अपघात घडत आहेत. याबाबत सा.बा. विभाग दुर्लक्ष करत असून याचे त्यांना काहीच देणे-घेणे नाही. अधिकाऱ्यांना विचारणा केली तर उडवा उडवीची उत्तरे देत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.>कामोठे ते खारघर सर्व्हिस रोडवरील पथदिव्यांचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे यांना देण्यात आले आहे. याबाबत त्यांना आम्ही सांगितले आहे. पथदिव्यांची सा.बा. ठाणे इलेक्ट्रिकल विभागाची जबाबदारी आहे.- किशोर पाटील, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकामविभाग, नवी मुंबई