शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावरील कामोठे सर्व्हिस रोड पाच वर्षांपासून अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 00:02 IST

कामोठे येथील नागरिकांना पाच वर्षांपासून पनवेल-सायन महामार्गावर अंधारातूनच मार्ग काढावा लागत आहे.

कळंबोली : कामोठे येथील नागरिकांना पाच वर्षांपासून पनवेल-सायन महामार्गावर अंधारातूनच मार्ग काढावा लागत आहे. कामोठे ते खारघरपर्यंतचा सर्व्हिस रोड गेल्या पाच वर्षांपासून अंधारात आहे. यामुळे कित्येक नागरिकांना अपघातास सामोरे जावे लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार तक्र ार करूनही दखल घेतली जात नाही.पनवेल-सायन महामार्गावर कामोठे ते खारघर टोलनाकापर्यंत असलेला सर्व्हिस रोड गेल्या पाच वर्षांपासून अंधारात आहे. कामोठेकरांना मुंबईला जाण्यासाठी या अंधारातूनच मार्ग काढावा लागत आहे. २००४ साली कामोठे सर्व्हिस रोडचे काम टीआयपीएल या कंपनीने पूर्ण केले. त्यानंतर या कंपनीकडून विजेचे खांबही बसवण्यात आले. चार दिवस दिवे पेटलेही त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून यांची देखभाल न झाल्याने साडेपाच वर्षे नुसते खांब आहेत; पण यातून मिळणारा प्रकाश गायब झाला आहे. रात्री अंधाराचा फायदा घेऊन लुटमारीचे प्रकार घडत आहेत. महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कामोठे बसस्टॉप या ठिकाणी बाहेर गावी गेलेले रहिवासी रात्री-अपरात्री प्रवास करून उतरतात. महामार्गावर अंधार असल्याने नागरिकांना कामोठे शहरात जाण्याकरिता त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत कामोठे येथील सिटिजन युनिटी फोरमच्या सचिव रंजना सडोलीकर यांनी वारंवार पाठपुरावा केला आहे. ३१ आॅगस्टला कफ व एकता सामाजिक संस्थेबरेबर कामोठेकर नागरिकांनी उपोषण करण्याचे जाहीर करताच, सा.बा. अधिकाऱ्यांनी पथदिवे चालू करणार असल्याचे सांगताच उपोषण मागे घेण्यात आले. तीन महिने झाले तरी सार्वजनिक विभागाकडून कोणत्याही हालचाली होत नाहीत.>कामोठे भुयारीमार्गही बंद अवस्थेतसर्व्हिस रोड अंधारात आहेच; पण पुणे जाणाºया महामार्गावर जाण्याकरिता बांधण्यात आलेला भुयारीमार्गही बंद अवस्थेत आहे. यात पाणी साचले आहे. या भुयारीमार्गाचा कामोठेकरांना कोणताही उपयोग होत नाही. महामार्गावरील कामोठे येथे अंधार असल्याने वाहनांना जवळ आल्याशिवाय समोरील व्यक्ती दिसत नाही, त्यामुळे महामार्ग ओलांडताना दररोज अपघात घडत आहेत. याबाबत सा.बा. विभाग दुर्लक्ष करत असून याचे त्यांना काहीच देणे-घेणे नाही. अधिकाऱ्यांना विचारणा केली तर उडवा उडवीची उत्तरे देत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.>कामोठे ते खारघर सर्व्हिस रोडवरील पथदिव्यांचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे यांना देण्यात आले आहे. याबाबत त्यांना आम्ही सांगितले आहे. पथदिव्यांची सा.बा. ठाणे इलेक्ट्रिकल विभागाची जबाबदारी आहे.- किशोर पाटील, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकामविभाग, नवी मुंबई