शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

कळंबोली खाडीपात्रात मृत माशांचा खच , जलचरांचा जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 07:11 IST

कळंबोली शहरातील सिडको कार्यालयाशेजारी असलेल्या खाडीच्या पात्रात शनिवारी मध्यरात्री हजारो मासे मृत अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे.

- शैलेश चव्हाणतळोजा - कळंबोली शहरातील सिडको कार्यालयाशेजारी असलेल्या खाडीच्या पात्रात शनिवारी मध्यरात्री हजारो मासे मृत अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. या ठिकाणी असलेल्या आंबेतारी खाडीच्या पाण्यात रासायनिक पाणी मिसळल्याने हे मासे मृत झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.कासाडी नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर असताना आता नवीन प्रकरण समोर आले आहे. कळंबोली येथील खाडीपात्रातदेखील आता मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होत असल्याच्या तक्रारी आहेत. आंबेतारी खाडीत शनिवारी मध्यरात्री हजारो मासे मृतावस्थेत आढळून आले. संपूर्ण पात्रात मृत माशांचा खच पडला होता. रसायनयुक्त पाणी खाडीत सोडल्याने त्याचा परिणाम माशांवर झाल्याचे निदर्शनास आले आहे. तळोजा औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कंपन्या रसायनयुक्त पाण्यावर कोणतीही प्रक्रि या न करता हे पाणी थेट नदीच्या खाडीपात्रात व नाल्यामध्ये सोडतात. काही दिवसांपूर्वी कासाडी नदी पात्रातदेखील मृत माशांचा खच पाहावयास मिळाला होता. कासाडी नदीच्या पात्रात होणाऱ्या जलप्रदूषणाचा मोठा फटका या ठिकाणी मासेमारी करून उपजीविका चालवणाºया कोळी बांधवांना बसला होता. या वेळी शेकडो मासे मृत झाल्याची घटना घडली होती.तळोजा एमआयडीसीच्या काही कारखान्यांतून छुप्या पद्धतीने कासाडी नदीत रासायनिक पाणी सोडले जात आहे. याबाबत वारंवार प्रदूषण मंडळाकडे तक्रारी करूनदेखील योग्य कारवाई केली जात नसल्याचा आरोप या ठिकाणच्या नागरिकांनी केला आहे.दरम्यान, या प्रकाराला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी कळंबोली विकास समितीने केली आहे. विकास समितीचे अध्यक्ष संदीप जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईnewsबातम्या