शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांना केराची टोपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 00:12 IST

सिडकोने नवी मुंबईसाठी ठाणे जिल्ह्यातील बेलापूर पट्टा व रायगडमधील पनवेल व उरण तालुक्यातील ९५ गावांतील सर्व जमिनी संपादित केल्या.

- अनंत पाटील नवी मुंबई : सिडकोने नवी मुंबईसाठी ठाणे जिल्ह्यातील बेलापूर पट्टा व रायगडमधील पनवेल व उरण तालुक्यातील ९५ गावांतील सर्व जमिनी संपादित केल्या. मात्र, येथील प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी गावठाणाबाहेर राहण्यासाठी बांधण्यात आलेली हजारो घरे अनधिकृत ठरविण्यात आलेली आहेत. नवी मुंबईच्या उभारणीसाठी आपले सर्वस्व असलेल्या जमिनी देणाऱ्या भूमिपुत्रांनी गावठाणाबाहेरील घरे नियमित करण्याच्या घोषणा राज्य शासनाने केल्या. मात्र, त्याची अंमलबजावणी ४२ वर्षांचा कालावधी उलटूनही झालेली नाही, त्यामुळे येथील भूमिपुत्रांकडून संताप व्यक्त केला जात आहे.१७ मार्च १९७० साली मुंबईचा भार कमी करण्यासाठी सरकारने नवी मुंबई उभारणीचा निर्णय घेतला होता. संपूर्ण जमिनी संपादित केल्याने शेतकºयांकडे जमीनच शिल्लक नसल्याने त्यांच्या वारसांनी वाढत्या लोकसंख्येनुसार सिडको संपादित जागेवर राहण्यासाठी घरे बांधली. जमिनी सिडकोच्या मालकीच्या असल्याने सिडकोने ही घरे अनधिकृत ठरवली. तर दुसरीकडे वाढत्या लोकसंख्येला घरांची व्यवस्था व्हावी, याकरिता दर दहा वर्षांनी दिल्या जाणाºया गावठाण कायद्याची अंमलबजावणी सरकारने केली नाही, त्यामुळे या घरांची संख्या वाढत गेली. अनेक बांधकामे सिडकोच्या आराखड्यातच बांधण्यात आलेली आहेत. २५ फेब्रुवारी १९७६ रोजी नवी मुंबईतील तुर्भे, वाशी, सानपाडा, कोपरखैरणे आणि शिरवणे या पाच गावांचा गावठाण विस्तार करण्यात आला.३ आॅक्टोबर १९८४ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्यासोबत नवी मुंबई आणि रायगड येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनाच्या पदाधिकाºयांची मंत्रालयात बैठक झाली. त्या बैठकीत संपादित जमिनीच्या १५ टक्के भूखंडाची मागणी करण्यात आली होती. मात्र, तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी १५ टक्केऐवजी अखेर साडेबारा टक्के योजना लागू करण्याचा निर्णय ६ मार्च १९९० रोजी घेतला आणि २८ आॅक्टोबर १९९४ रोजी कोपरखैरणे येथे आयोजित शेतकरी भूमिपुत्रांच्या मेळाव्यात जाहीर केले. तेव्हापासून साडेबारा टक्के योजना नवी मुंबईत लागू झाली आहे. त्याची अंमलबजावणी मागील २८ वर्षांत आजही अपूर्ण अवस्थेत आहे.>कुटुंबाच्या वाढत्या लोकसंख्येमुळे प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी गावठाणाबाहेर घरे बांधलेली असून पर्यायाने काही मोडकळीस आलेली घरे दुरु स्ती करायचे ठरवले तर सिडको कारवाई करते,यासाठी राज्य शासनाने त्वरित गावठाण विस्तार योजनेचे सर्वेक्षण युद्धपातळीवर सुरू केले पाहिजे.- मनोहर पाटील,अध्यक्ष,सिडको आणि एमआयडीसी प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती समिती>नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकरिता २२६८ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली असून त्यापैकी उलवे, तरघर, कोंबडभुजे, गणेशपुरी, चिंचपाडा, कोल्हीकोपर, वरचे ओवळे, पारगाव-डुंगी, वाघिवली-वाडा आणि वाघिवली या दहा गावच्या प्रकल्पग्रस्तांची ६७१ हेक्टर जमीन भूसंपादित करण्यात आली आहे. मात्र, सिडकोने दिलेल्या आश्वासनानुसार अनेक लोकांचे पुनर्वसन झालेले नसून समस्यांना सामोरे जावे लागत आहे.- पुंडलिक म्हात्रे, उपाध्यक्ष,नवी मुंबई आंतरराष्टÑीय विमानतळ प्रकल्पग्रस्तपुनर्वसन बाधित संघर्ष समिती